Friday, July 6, 2018

विस्मृतीत गेलेली पौराणीक चारधाम यात्रा ( Ancient Chardham Yatra )

विस्मृतीत गेलेली पौराणीक चारधाम यात्रा

सध्या चारधामांची यात्रा बरेच जण करतात . प्रवासाच्या साधनांमुळे अगदि थोडया दिवसात चारधाम यात्रा करता येते . परंतु बहुतेक लोकांना श्रावण बाळ आपल्या अंध मातापित्यास घेवून जी धर्मग्रंथात वर्णन केलेली चारधाम यात्रा करत होता व त्या दरम्यान अनावधानाने दशरथ राजाचा बाण लागुन मृत्यु पावला , ती  पौराणिक चारधाम यात्रा कोणती हेच माहित नसते . फक्त प्रसिद्धीमुळे, उत्तराखंडमधील गंगोत्री, यमुनोत्री, केदारनाथ आणि बद्रीनाथचा प्रवास चार धामांचा प्रवास मानला जातो, खरे तर  चार ठिकाणांचा ना मिळून पौराणिक चारधामांपैकी एक धामची यात्रा होते .

छोटी चारधाम यात्रा 

बद्रीनाथ येथे भाविकांची मोठ्या प्रमाणात येतात त्यामुळे इथल्या इतर तीन ठिकाणांनी मिळून केलेल्या यात्रेसच लोक चारधाम यात्रा समजतात . परंतु हि यात्रा लहान चारधाम यात्रा समजली जाते ज्यात बद्रीनाथ व्यतिरिक्त केदारनाथ (शिव ज्योतिर्लिंगांपैकी हे एक), यमुनोत्री आणि गंगोत्री यांचा समावेश आहे. मुळ पौराणीक चारधाम यात्रा बद्रीनाथ , जगन्नाथपुरी , रामेश्वर व द्वारका हि आहे . धर्मग्रंथांनुसार या चार ठिकाणांची यात्रा केली तरच चारधाम यात्रेचे पुण्य मिळते . सध्या जी यात्रा पर्यटण संस्था चारधाम यात्रा म्हणून आयोजित करतात ती केल्याने फक्त एकच धाम केल्याचे पुण्य मिळते याची नोंद घ्यावी .

बद्रीनाथ धाम :

हिमालय च्या शिखर वर बद्रीनाथ मंदिर हिन्दूचे खुप पविरा ठिकाण आहे . हे चार धामां  पैकी एक आहे .  बद्रीनाथ मंदिर उत्तराखंड राज्य त  अलकनंदा नदी च्या  किनारी  आहे . हे  मंदिर भगवान विष्णु चे  रूप  बद्रीनाथ ला समर्पित आहे . बद्रीनाथ मंदिर हे आदिकालपासून  स्थापित आहे . व ते  सतयुगातील पावन धाम आहे अशी मान्यता  आहे . त्याची स्थापना मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम ने केली आहे . बद्रीनाथ च्या दर्शना पूर्व केदारनाथ के दर्शन करने आवश्यक मानाले जाते .

बद्रीनाथ मंदिर ची दारे अक्षयत्रितियेस दर्शनासाठी खोलली  जातात . त्यानंतर ६ महीने पर्यत पूजा- अर्चना तेथे होते . त्यानंतर नोहोंबरच्या दूसऱ्या सप्ताह त  मंदिर ची दारे  बंद करून पुजारी तेथूनच काहि कि.मी. वरील जोशी मठ येथे जातात व तेथून बद्रिनाथाची पुजा होते . 

कसे जाल
ऊत्तराखंड येथे हे धाम येते ऊत्तराखंड राज्य रस्ते मार्गाने पुर्ण भारताबरोबर जोडले गेले आहे .

बद्रीनाथ येथिल विविध ठिकाणच्या गुगल पीन

बद्रीनाथ

https://goo.gl/maps/rJy4YpX2fvo

केदारनाथ

https://goo.gl/maps/mSxo51skMmz

गंगोत्री

https://goo.gl/maps/zjPAUtDgmU62

यमुनोत्री

https://goo.gl/maps/xJggh6r2qxy

जगन्नाथ पुरी :

भारत के ओडिशा राज्यात समुद्रच्या तट वर  चारधामां पैकी एक जगन्नाथपुरी हे वसले आहे . जगन्नाथपुरी ला सप्तपुऱ्यांमध्ये स्थान आहे . 'जगन्नाथ' शब्दाचाअर्थ जगाचा स्वामी होतो . हे वैष्णव सम्प्रदाय चं मंदिर आहे, जो भगवान विष्णु चा अवतार श्रीकृष्ण को समर्पित आहे .

या मंदिराची वार्षिक रथयात्रा उत्सव प्रसिद्ध आहे . ज्यात मंदिरच्या तीन मुख्य देवता, भगवान जगन्नाथ, त्यांचे मोठे बंधु बलभद्र व  भगिनी सुभद्रा आहेत , तीन वेगवेगळ्या भव्य और सुसज्जित रथांमध्ये विराजमान होऊन नगराची यात्रा हे तिघे करतात .

जगन्नाथपुरी च्या अदभुत रहस्यांना समजण्यासाठी तसेच जगन्नाथपुरी ला कसे जाल तिथली गुगल पीन साठी माझ्या खालील ब्लॉग पेज ला भेट दया .

http://travelbirdindia.blogspot.com/2018/07/blog-post_79.html?m=1


रामेश्वरम :

भारत च्या तमिलनाडु राज्याच्या  रामनाथपुरम जिल्ह्यात समुद्र किनारी स्थित आहे हिंदुचे तीसरे धाम रामेश्वरम् . हे हिंद महासागर व बंगालचा उपसागर ने चार हि दिशांनी घेरले आहे .  एक सुंदर शंख आकार द्वीप आहे हा . रामेश्वरम् मध्ये स्थापित शिवलिंग द्वादश ज्योतिर्लिंगां पैकी एक मानले जाते . भारतच्या उत्तरेत केदारनाथ व काशी ला जी मान्यता आहे .ती दक्षिणत रामेश्वरम् ला आहे .

मान्यता नुसार भगवान श्रीराम ने रामेश्वरम् शिवलिंगची स्थापना केली आहे . इथे रामाने लंका वर चढ़ाई करन्या पूर्व एक दगडाचा सेतु चे निर्माण केलं होत , ज्याला पार करून वानर सेना लंका गेलो . त्या नंतर राम ने विभीषण च्या इच्छे नुसार धनुषकोटि नामक स्थाना वर हा  सेतु तोड़ला होता .

रामायणातील एक फार लोकांना माहित नसलेली दंत कथा आहे . लंकेवर स्वारी करण्याआधी रामाने भगवान शंकराची आराधना केली . त्यासाठी रामेश्वरम् येथे वालूकामय शिवलिंगाची निर्मिती केली . आता या शिवलिंगात प्राणप्रतिस्थापना करणे गरजेचे होते पण त्यासाठी ब्राम्हणाची गरज होती . रावण ब्राम्हण होता अन त्याच्या इतका मोठा शिवभक्त कोणीच नाही . त्यासाठी मग रावणालाच बोलवावे असे ठरले . हे काम मारुतीला सोपवलं गेलं . रावण नाहि म्हणणार असेच सर्वांना वाटले . पण तो थोर शिवभक्त शिवपुजेस नकार कसा देईल . रावण रामेश्वरम् ला आला . परंतू त्याने एक अडचण सांगितली कि पत्नी शिवाय शिवलिंगाची प्राणप्रतिस्थापना करणे रामास शक्य नाहि . मग रामाने रावणासच ऊपाय सांगायला सांगितले . तेव्हा रावण म्हणाला की हे रामा मला माहित आहे कि तु येथे शिवाची आराधना का करत आहेस . सिता माझ्या ताब्यात आहे परंतु एका अटिवरच मी सितेला इथे आणेल कि हि पुजा संपल्यावर मी सितेस परत लंकेत घेऊन जाईन जे रामाने मान्य केले . यथासांग पुजा झाली . आता ब्राम्हण म्हणून दक्षिणा रावणास देणे गरजेचे होते . रामाने दक्षिणेबाबत विचारल्यावर रावण म्हणाला हे रामा मी पुढचे भविष्य जाणतो तेव्हा दक्षिणा म्हणून मला एक वचन दया कि जेव्हा माझा मृत्यु जवळ असेल तेव्हा श्रीरामा तुम्ही माझ्या सानिध्यात असावे . त्यानंतर घडले ते सर्वाना ज्ञात आहे . (कथा संदर्भ : - देव लोक विथ देवदत्त पटनायक शो एपिक चॅनल)

कसे जाल .

रामेश्वरम येथे रेल्वे स्थानक आहे . येथून जवळचा विमानतळ मदूराई येथे १४५ कि . मी . वर आहे .

रामेश्वरमची गुगल पीन

https://goo.gl/maps/Nw3wHPUZTcD2


द्वारका :

गुजरात राज्याच्या पश्चिम किनाऱ्यावर स्थित चार धामों मध्ये एक धाम व सप्तपुऱ्यांतील एक पुरी आहे- द्वारका .  मान्यता आहे कि द्वारका हि श्रीकृष्ण ने वसवली होती व  मथुरा येथून यदुवंशियांना इथे आणून या संपन्न नगरीला त्यांची राजधानी बनवली गेली .

अशी मान्यता आहे असली द्वारका तर समुद्रात बुडून गेली पण तीचे अवशेष आज बेट द्वारका और गोमती द्वारका नावाने प्रसिद्ध  स्थाने आहेत . द्वारका च्या दक्षिण ला एक लांब  तलाव आहे , त्याला गोमती तलाव म्हणतात . त्यामुळे त्या स्थानाला ला गोमती द्वारका म्हणतात .  गोमती तलावावर नऊ घाट आहेत . त्या घाटांजवळ एक कुंड आहे ज्याचे  नाव निष्पाप कुंड आहे . त्यात गोमती चे  पाणी सतत भरत असते .

द्वारकेच्या निर्मिती व ऱ्हासाची पण एक कथा आहे . कंसाच्या सततच्या आक्रमणांपासून जनतेचे रक्षण करण्यास मथुरेच्या जनतेस कुठे दुसरी कडे रहाण्यास न्यावे असा श्रीकृष्णांनी विचार केला . परंतू कंसाच्या दहशती मुळे कोणी आर्यावर्तातील राजा श्रीकृष्णास आपल्या राज्यात जागा दयायला तयार नव्हता . शेवटी श्रीकृष्णाने सुमुद्रास जागा दयायची विनंती केली . तेव्हा समुद्राने एका अटिवर जागा देण्याचे मान्य केले ती अट अशी होती की जोपर्यंत श्रीकृष्ण द्वारकेत वास्तव्यास असतील तो पर्यतच ती जागा मयुरावासीयांना वापरता येईल परंतु श्रीकृष्णाच्या मृत्यु नंतर समुद्र ती जागा स्वतःच्यात सामाऊन घेईल . त्या प्रमाणे द्वारकेची निर्मीती झाली व श्रीकृष्णांच्या मृत्यु नंतर द्वारका एका प्रलयात क्षणात समुद्रामध्ये बुडाली .

कसे जाल :-

द्वारका रस्ते मार्गाने भारतातील प्रमुख शहरांना जोडले आहे . द्वारका येथे रेल्वे स्टेशन आहे . परंतु द्वारके पासून जवळचे वेरावळ या रेल्वे स्थानकातून भारतातील प्रमुख शहरांना जाणाऱ्या रेल्वे थांबतात .
येथून जवळचा विमान तळ जामनगर आहे .

द्वारकेची गुगल पिन

https://goo.gl/maps/U1xPsVwzEPT2

शैलेश चौधरी(Shailesh Choudhari)
Languages :- Marathi,  Hindi and little bit English.

( माहिती संकलक / ब्लॉगर / पर्यटण व्यवसायिक )
Blogger and Travel agent

९७६७५ ९१६७५

[Mobile number +919767591675]
WhatsApp number +918888741797

Can Contact between:-

9a.m. to 9 p.m. ( Indian standard time )
Use Google Translate App. or web site to read this artical in your own language . Use Marathi as source language and translate  it in your own language.
पर्यटण एक चळवळ


पर्यटण विषयास वाहिलेला मराठी ब्लॉग


आमच्या फेसबुक पेज ला भेट द्या .
Visit our Facebook page

Travelbirdindia


आम्हाला व्टिटर वर फॉलो करा .
Follow me on Twitter

https://mobile.twitter.com/Shailesh1881975








No comments:

Post a Comment