Monday, September 24, 2018

साहसी सहल वासोटा किल्ला (Vasota fort)


साहसी सहल वासोटा किल्ला (Vasota fort)


साहसाची अनुभूती देणारा वासोटा किल्ला अनेक दुर्गयात्रींचा आवडता किल्ला आहे. नैसर्गिक दुर्गमता लाभलेला हा किल्ला जावळीच्या जंगलामधील एक अनोखे दुर्गरत्‍न आहे.
सह्याद्रीची मुख्य रांग ही दक्षिणोत्तर पसरलेली आहे. या रांगेला समांतर अशी धावणारी घेरा दातेगडाची रांग घाटमाथ्यावर आहे. ही रांग महाबळेश्वरपासून दातेगडापर्यंतजाते. या दोन रांगाच्या मधून कोयना नदी वाहते. या जावळी खोर्‍यामधून वाहणार्‍या कोयना नदीवर हेळवाक येथे धरण बांधलेले आहे. या जलाशयाला शिवसागर म्हणतात. या शिवसागराचे पाणी वासोटा किल्ल्याच्या पायथ्याला स्पर्श करते. शिवसागराचे पाणी तापोळापर्यंत पसरलेले आहे.
सह्याद्रीची मुख्य रांग आणि शिवसागराचे पाणी यामधील भागात घनदाट अरण्य आहे. पूर्वेला घनदाट अरण्य आणि पश्चिमेला कोकणात कोसळणारे बेलाग कडे यामुळे वासोट्याची दुर्गमता खूप वाढली आहे.
इतिहास
वासोटा ज्या डोंगरावर आहे तेथे वसिष्ठ ऋषींचा एक शिष्य राहत होता, म्हणून त्याने या डोंगराला आपल्या गुरूंचे नाव दिले, अशी आख्यायिका आहे. ’वसिष्ठ’चे पुढे वासोटा झाल असावेे, अशी कल्पना आहे. शिलाहारकालीन राजांनी या डोंगरावर किल्ला बांधला. या किल्ल्याची मूळ बांधणी ही शिलाहार वंशीय दुसर्‍या भोजराजाने केली असल्याचा उल्लेख आढळतो.
वासोट्याचे नाव महाराजांनी व्याघ्रगड असे ठेवले. याच्या दुर्गमतेबद्दल पेशवाईत सुद्धा नोंद आहे. शिवाजी महाराजांच्या काळात या किल्ल्याचा वापर 'तुरुंग' म्हणून केला जात असे. याचे कारण तेथील निर्जन व घनदाट असे अरण्य. पूर्वी तेथे वाघ, बिबट्यांसारखे प्राणीही होते. हे प्राणी अजूनही आहेत
शिवाजी महाराजांनी जावळी जिंकल्यानंतर आसपासचे अनेक किल्ले घेतले, पण वासोटा जरा दूर असल्याने घेतला नाही. पुढे शिवाजी महाराज पन्हाळगडावर अडकले असताना, आपल्या मुखत्यारीत मावळातील पायदळ पाठवून त्यांनी वासोटा किल्ला दि ६ जून १६६० रोजी घेतला.
अफझलखाच्या वधानंतर शिवाजी महाराजांच्या दोरोजी या सरदाराने राजापुरावर हल्ला करून तेथील इंग्रजांना अफझलखानाच्या गलबतांचा पत्ता विचारला. त्यांनी सांगितला नाही म्हणून इंग्रजांच्या ग्रिफर्ड नावाच्या अधिकार्‍याला अटक केली व वासोट्यावर ठेवले. .सन १६६१ मध्ये पकडलेल्या इंग्रज कैद्यांपैकी रेव्हिंग्टन, फॅरन व सॅम्युअल यांना वासोट्यावर कैदेत ठेवण्यात आले होते. पुढे १६७९ मध्ये वासोटा किल्ल्यावर २६,००० रुपये सापडले. पुढच्या काळात १७०६ मध्ये ताई तेलिणीने हा किल्ला आपल्या हातात घेतला. पुढील वर्षी पेशव्यांचे सेनापती बापू गोखले यांनी ताई तेलिणीबरोबर लढाई केली. आठदहा महिन्यांच्या प्रखर झुंजीनंतर ताई तेलिणीचा पराजय झाला आणि १७३० मध्ये वासोटा किल्ला बापू गोखल्यांच्या हाती पडला.

वासोटा गडावर

गडाच्या प्रवेशद्वाराजवळून डावीकडील तटबंदीच्या कडेने जाऊन पूर्वेकडील बाजूस पोहोचल्यावर शिवसागरजलाशयाचा आणि अथांग पसरलेल्या जंगलाचा देखावा आपल्याला मुग्ध करतो. याच बाजूला पाण्याचे टाके आहे. हे टाके भिंतीमुळे दोन भागात विभागले गेले आहे. पिण्यायोग्य पाणी गडावर येथेच आहे. येथून झाडीतून दक्षिण टोकावर गेल्यावर समोरच जुना वासोट्याचा डोंगर दिसतो. जुन्या वासोट्याच्या बाबू कड्याचे तसेच पाताळवेरी गेलेल्या दरीचे दृश्य आपल्याला खिळवून ठेवते. येथून परत पाण्याच्या टाक्यांकडे येऊन उत्तर टोकाकडे निघायचे. गडावरही सर्वत्र झाडीझाडोरा वाढला असल्यामुळे गडावरच्या वास्तू त्यात लुप्त झाल्या आहेत. वाटेवर मारुती मंदिर, मोठ्या वाड्याचे अवशेष तसेच महादेव मंदिर आहे. तेथून पुढे उत्तरेकडील माची आहे. या माचीवर बांधकाम नाही. पण येथून दूरपर्यंतचा परिसर दिसतो. नागेश्वर सुळक्याचे दर्शन उत्तम होते. कोकणातील विस्तृत प्रदेशही येथून न्याहाळता येतो. वासोटा हा गिरिदुर्गाबरोबरच वनदुर्गसुद्धा आहे. म्हणून याला 'मिश्रदुर्ग' म्हटले जाते. येथून दिसणारे नागेश्वर शिखर फारच सुंदर दिसते. नागेश्वर सुळक्याच्या अलीकडे आणखी एक सुळका आहे त्याला तुळशी वृंदावन किंवा ठेंगा असे नाव आहे. पूर्व दिशेला ठोसेघर पठारावर दिसणार्या पवनुर्जा प्रकल्पातील पवन्चक्क्याही सौंदर्यात भरच घालतात

वासोट्याला जाण्यासाठीचे रस्ते

वासोट्याला जाण्यासाठी प्रामुख्याने दोन मार्ग आहेत. एक कोकणमधून आणि दुसरा घाटमाथ्यावरुन. कोकणातील 'चिपळूण'कडून वासोट्याच्या पश्चिम पायथ्याच्या चोरवणे या गावापर्यंत गाडीमार्ग असून या मार्गावर राज्य परिवहन मंडळाच्या (एस.टी.बस) गाड्या आहेत. चोरवणेपासून नागेश्वराच्या सुळक्याकडून वासोट्याकडे येता येते. दुसरा मार्ग हा जास्त सोयीचा आहे. सातारा-कास-बामणोली असा गाडीरस्ता असून यावर रा.प. च्या बसेस आहेत. बामणोली हे गाव शिवसागर जलाशयाच्या पूर्व काठावर आहे. येथून वासोट्याकडे जाण्यासाठी शिवसागर ओलांडावा लागतो. त्यासाठी बामणोलीमध्ये लॉचेस उपलब्ध होतात. येथून वनखात्याच्या परवानगीने वासोट्याकडे जाता येते..
लॉचमधून साधारण ४० ते ५० मिनिटांच्या प्रवासानंतर आपण वासोट्याच्या जवळ पोहोचतो. पाण्याच्या फुगवट्यानुसार हा कालावधी कमी जास्त होतो. पायथ्याजवळ मेट इंदवाली नावाचे गाव होते. ते फार पूर्वीच उठून गेलेले आहे. त्याचे अवशेष अजूनही दिसतात.
या अवशेषांच्या जवळूनच गडावर जाणारा धोपट मार्ग आहे. या मार्गाने काही अंतर गेल्यावर आपण पायथ्याला पोहोचतो. पायथ्याला ओढ्याकाठी मारुतीची मूर्ती आहे. येथूनच किल्ल्याची चढण आणि जंगल सुरू होते. सोबतच्या पाण्याच्या बाटल्या ओढ्यातून भरुन घेणे गरजेचे आहे. हा चढाईचा मार्ग दुतर्फा असलेल्या घनदाट जंगलामधून जातो. यात वेगवेगळ्या प्रकारची झाडे व वनस्पती आपल्याला दिसतात. या जंगलात अनेक प्रकारची वन्य श्वापदे आहेत. श्वापदांत गवे आणि अस्वले प्रामुख्याने आहेत. त्यामुळे सावधगिरीने आणि गोंगाट न करता चढाई करावी लागते. कुठलाही प्राणी केव्हाही दर्शन देऊ शकतो. त्यातल्यात्यात गव्यापासून आणि अस्वलापासून अंतर राखणे सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्त्वाचे असते.
अर्धाअधिक किल्ला चढल्यावर एक वाट उजवीकडे जाते. ही वाट केतकीच्या गाद्याजवळून पुढे नागेश्वराकडे जाते. सरळ वाटेने वर चढल्यावर जंगल विरळ होऊन कारवीचे रान लागते. कारवीच्या रानातून वर चढल्यावर किल्ल्याच्या पायर्‍या लागतात. त्या चढून भग्न प्रवेशद्वारातून गडात प्रवेश होतो.

वासोटा किल्ल्याची गुगल पिन
https://goo.gl/maps/ogHGYegNxT32
वासोटा किल्ल्याची माहिती देणारा यु ट्युब व्हिडिओ

विनंती :- आपणास माहिती कशी वाटली प्रतिक्रिया जरुर द्या अन सदर ब्लॉग / फेसबुक पेज आपल्या मित्र परीवारात पण शेअर करा .  



शैलेश चौधरी(Shailesh Choudhari) 
( माहिती संकलक / ब्लॉगर / पर्यटण व्यवसायिक )
Blogger and Travel agent 
[Mobile number +919767591675]
WhatsApp number +918888741797
Languages :- Marathi,  Hindi and little bit English.
email address :-
Can Contact between:-
9a.m. to 9 p.m. ( Indian standard time )
Use Google Translate App. or web site to read this artical in your own language . Use Marathi as source language and translate  it in your own language.
पर्यटण एक चळवळ
पर्यटण विषयास वाहिलेला मराठी ब्लॉग
आमच्या फेसबुक पेज ला भेट द्या .
Visit our Facebook page 
Travelbirdindia
आम्हाला व्टिटर वर फॉलो करा .
Follow me on Twitter 
संदर्भ :- इंटरनेट , गुगल मॅप व यु ट्युब

Thursday, September 13, 2018

मुंबईच्या काहि महत्त्वाच्या गणपतींचे दर्शन २०१८



























संदर्भ : फेसबुक वर मला आलेले फोटो



हेदवीचा गणपती ( Hedvi Ganpati )


हेदवीचा गणपती
हेदवीचा गणपती
गुहागर पासून २५ किलोमीटर अंतरावर हेदवी हे गाव आहे. किल्लेवजा तटबंदीने वेढलेले थोड्या उंचीवरील गणेश मंदिर. वर चढून जाण्यासाठी पायऱ्या आहेत आणि थेट प्रवेशद्वारापर्यंत रस्ताही आहे. दगडी तटबंदी , आजूबाजूचा परिसर , फुलबाग आणि पाश्वभूमीवर दिसणारी मंदिराची दगडी वास्तू यामुळे प्रथम दर्शनीच पर्यटक प्रेमात पडतो. इतर पर्यटन स्थळांप्रमाणेच हेदवी गणेशाची पण काहीशी कथा सांगितली जाते.
मंदिर पेशवेकाळात केळकर स्वामी नावाचे गणेशभक्त राहत होते. त्यांची पुण्याला पेशव्यांशी भेट झाली असता त्यांना वर्तवलेल्या काही घटनांची साक्ष पटल्यामुळे पेशव्यांनी त्यांना त्या काळी मंदिर बांधण्यासाठी १ लाख रुपये दिले . त्या पैशातून केळकर स्वामिनी हे मंदिर उभारले. गणपतीची मूर्ती काश्मीर मधील पाषाणापासून बनवलेली आहे. दहा हातांच्या या मूर्तीच्या मांडीवर सिद्धलक्ष्मि विराजमान आहेत. हेदवी येथील गणेशमूर्ती `श्री दशभुजा लक्ष्मी गणेश’ म्हणून ओळखली जाते. या मंदिरातील गणेशाची मूळ मूर्ती काश्मिरात घडवली गेली असे सांगण्यात येते. मूर्तीच्या गळ्यात नागराज असून डाव्या मांडीवर लक्ष्मी बसलेली आहे.
उजव्या वरच्या हातात चक्र , दुसऱ्या हातात त्रिशूळ , तिसऱ्या हातात धनुष्य , चौथ्या हातात गदा आणि पाचव्या आशीर्वादाच्या हातात महाळूंग फळ आहे. डाव्या हाताच्या वरच्या हातात कमाल , दुसऱ्या हातात पाश , तिसऱ्या हातात नीलकमळ , चौथ्या हातात रदन (दात ) , आणि पाचव्या हातात धान्याची लोंबी आहे. सोंडेत अमृतकुंभ म्हणजे कलश आहे. मूर्तीचे कोरीवकाम उत्कृष्ट असून गळ्यात अनेक प्रकारच्या माळा आहेत. सिंव्हासनावर उंदीरही कोरलेला आहे. सभामंडपात गाभाऱ्याच्या प्रवेशभिंतीवर जय विजय या द्वारपालांच्या चतुर्भुज मूर्ती आहेत आणि बाहेरील बाजूला पिसारा फुलवलेल्या मोराच्या प्रतिमा आहेत. मंदिर आवारातच दीपमाळही आहे.
अशा वस्तू आपल्या भुजांमध्ये धारण करणारी ही संगमरवरी गणेशाची मूर्ती अतिशय सुंदर आहे. अशा प्रकारच्या शस्त्रसज्ज मूर्ती इतरत्र दिसून येत नाहीत.
कसे जाल
जवळचे ठिकाण गुहागर २५ कि . मि .
जवळचा विमानतळ : पुणे
जवळचे रेल्वे स्टेशन : रत्नागिरी
हेदवी ची गुगल पीन
गुहागर ते हेदवी रस्ता मार्गदर्शन
हेदवीचा गणपती विषयी संपुर्ण माहिती देणारा यु ट्युब
**विनंती :- आपणास माहिती कशी वाटली प्रतिक्रिया जरुर द्या अन सदर ब्लॉग / फेसबुक पेज आपल्या मित्र परीवारात पण शेअर करा .   
शैलेश चौधरी(Shailesh Choudhari) 
( माहिती संकलक / ब्लॉगर / पर्यटण व्यवसायिक )
Blogger and Travel agent 
[Mobile number +919767591675]
WhatsApp number +918888741797
Languages :- Marathi,  Hindi and little bit English.
email address :-
Can Contact between:-
9a.m. to 9 p.m. ( Indian standard time )
Use Google Translate App. or web site to read this artical in your own language . Use Marathi as source language and translate  it in your own language.
पर्यटण एक चळवळ
पर्यटण विषयास वाहिलेला मराठी ब्लॉग
http://travelbirdindia.blogspot.com/2018/09/bamanghal.html?m=1
आमच्या फेसबुक पेज ला भेट द्या .
Visit our Facebook page 
Travelbirdindia
आम्हाला व्टिटर वर फॉलो करा .
Follow me on Twitter 

Monday, September 10, 2018

बामणघळ निसर्गाचा चमत्कार (Bamanghal)


बामणघळ  निसर्गाचा  चमत्कार 


गुहागरजवळच्या बामणघळ परिसरातला निसर्गाचा चमत्कार पाहून थक्क व्हायला होतं. समुद्राच्या किनाऱ्यापासून कातळात पडलेल्या या उभ्या अरुंद भेगेतून लाटांचं पाणी वेगाने आत घुसतं आणि तसंच काही फूट वर उसळतं.
निसर्गानं काही भागांत असे चमत्कार करून ठेवले आहेत, की ते पाहताना थक्क व्हायला होतं. निसर्गाचं हे अनोखं रूप पाहताना डोळ्यांचं पारणं फिटतं. पृथ्वीच्या पाठीवर वेगवेगळ्या कारणांमुळे झालेल्या उलथापालथीत भौगोलिक रचना बदलली जाते आणि त्यातून निसर्गाचं हे अनोखं रूप समोर येतं आणि लोकांच्या आकर्षणाचं केंद्र बनून जातं. कोकणाच्या किनारपट्टीवर दृष्ट लागण्यासारखे अनेक किनारे आहेत. थोड्या आडबाजूला जाऊन शोध घेतला, तर काही विलक्षण ठिकाणं सापडतात. गुहागर तालुक्यात हेदवी या प्रसिद्ध देवस्थानाजवळची बामणघळ त्यापैकीच एक.
हेदवीच्या गणपतीच्या दर्शनाला जाणारे लोक अधिक जाणकार असतील, तर त्यांची पावलं आपोआप गणपती मंदिराच्या अलीकडे असलेल्या बामणघळीकडे वळतात. बामणघळ हा निसर्गाचा अनोखा चमत्कार आहे. हेदवीपासून तीन किलोमीटर अंतरावर उजव्या बाजूस जाणारा उतार लागतो. या रस्त्याने गेल्यास समुद्रकिनारा लागतो. किनाऱ्याच्या उजव्या बाजूचा परिसर काळ्या कातळाने आणि डोंगराने वेढलेला आहे. या संपूर्ण परिसरात समुद्राच्या उसळत्या लाटांची कातळाशी पकडापकडी सुरू असते. किनाऱ्यावरच थोड्या अंतरावर उमा-महेशाचं एक सुंदर मंदिर आहे. डोंगरावरून येणारी गोड्या पाण्याची धार मंदिरात असलेल्या कुंडात पडते. मंदिरापासून थोडं आणखी पुढे डोंगराच्या दिशेने गेल्यावर कातळामध्ये समुद्रापर्यंत पडलेली एक उभी मोठी चीर दिसते. हीच ती प्रसिद्ध बामणघळ. किनाऱ्यावरून सुरू होणाऱ्या कातळापासून काही फूट आतपर्यंत ही घळ पडलेली आहे. एखादी अरुंद दरी असावी, एवढी, म्हणजे सुमारे दहा ते पंधरा फूट एवढी तिची उंची आहे. समुद्राच्या लाटांचं वेगानं येणारं पाणी या ठिकाणी वर्षानुवर्षं घुसून ही घळ तयार झाली आहे. लाटांचं पाणी एवढ्या वेगाने आत घुसतं, की कातळात तयार झालेले वेगवेगळे आकार पार करत ते घळीच्या अगदी वरच्या टोकापर्यंत शिरतं आणि तिथून वेगानं वर उसळतं. भरतीची वेळ असेल आणि लाटांचा जोर जास्त असेल, तर एवढ्या खोल असलेल्या घळीतूनही हे पाणी वेगानं वर आकाशाच्या दिशेने फेकलं जातं आणि कातळाच्या पृष्ठभागापासून काही फूट वर उडतं. घळीच्या अगदी वरच्या टोकापर्यंत किंवा बाजूलाही आपल्याला उभं राहता येत असल्यामुळे, कधीकधी आपल्यालाही या तुषारसिंचनाचा आनंद घेता येतो; मात्र ही घळ जेवढी सुंदर, तेवढीच धोकादायक आहे. अतिउत्साह दाखवणाऱ्या पर्यटकांचा जीव धोक्यात आल्याच्या घटनाही इथे घडल्या आहेत. सतत समुद्राचं पाणी उडून पडत असल्यामुळे कातळ निसरडे असण्याची शक्यता असते. पावसाळ्यात हा धोका जास्तच असतो. घळ अतिशय अरुंद आणि खोल असल्यामुळे हा चमत्कार पाहताना पूर्ण काळजी घेऊन आणि सुरक्षित अंतरावरूनच पाहणं योग्य. याच परिसरात उमराठ आणि नरवण येथील निसर्गरम्य परिसरात असलेली मंदिरंही पाहण्यासारखी आहेत
कसे जाल
रत्नागिरी जिल्हयातील गुहागर पासून हेदवी १८ कि मी आहे . हेदवीच्या समुद्रकिनाऱ्यावरील उमामहेश्वराच्या देवळा मागे ५०० मिटर वर बामनघळ आहे .
बामनघळची गुगल पिन
https://maps.google.com/?cid=2131164845574702713
**विनंती :- आपणास माहिती कशी वाटली प्रतिक्रिया जरुर द्या अन सदर ब्लॉग / फेसबुक पेज आपल्या मित्र परीवारात पण शेअर करा .   
शैलेश चौधरी(Shailesh Choudhari) 
( माहिती संकलक / ब्लॉगर / पर्यटण व्यवसायिक )
Blogger and Travel agent 
[Mobile number +919767591675]
WhatsApp number +918888741797
Languages :- Marathi,  Hindi and little bit English.
email address :-
Can Contact between:-
9a.m. to 9 p.m. ( Indian standard time )
Use Google Translate App. or web site to read this artical in your own language . Use Marathi as source language and translate  it in your own language.
पर्यटण एक चळवळ
पर्यटण विषयास वाहिलेला मराठी ब्लॉग
आमच्या फेसबुक पेज ला भेट द्या .
Visit our Facebook page 
Travelbirdindia
आम्हाला व्टिटर वर फॉलो करा .
Follow me on Twitter 

Sunday, September 9, 2018

गणपतीपुळे(Ganapatipule)

गणपतीपुळे


गणपतीपुळे हे रत्नागिरी जिल्ह्यातल्या रत्नागिरी तालुक्यातील २७४.६४ हेक्टर क्षेत्राचे गाव आहे. ह्याच्या सर्वात जवळचे शहर रत्नागिरी २५ किलोमीटर अंतरावर आहे.

 गणपतीपुळे आणि आसपासचा परिसर अतिशय आल्हाददायक आहे.

गणपतीपुळ्याला सुंदरसा समुद्र किनारा लाभला आहे. गणपतीपुळ्याला जाण्यासाठी मुंबई आणि पुण्यावरुन एसटीची एशियाड बस सेवा आहे. जवळच भंडारपुळे हे सुंदर गाव आहे. भंडारपुळे गावचा समुद्रकिनाराही रमणीय आहे. इथून काही अंतर पुढे गेल्यावर ६ किमी अंतरावर नेवरे गाव आहे, नेवरे गावाजवळे सुरूचे बन व वाळूचा किनारा आहे. ह्या सर्व गावांत प्रामुख्याने भंडारी, कुणबी आणि कोकणस्थ ब्राह्मण समाज आहे.

इथून जवळच २ किमी अंतरावर मालगुंड ह्या गावात कवीकेशवसुत ह्यांचे स्मारक आहे.

गणपतीपुळे हे रेवस रेड्डी सागरी महामार्गावर वसलेले पर्यटन स्थळ आहे. ह्या गावाच्या इतिहासात असेही म्हटले जाते की गणपतीपुळे आणि आसपासच्या नेवरे, मालगुंड आणि भंडारपुळे ह्या गावांत गणेशोत्सव काळात गणपतीची मूर्ती आणून पूजा केली जात नाही. गणपतीपुळ्याचा लंबोदर हाच या सर्व रामस्थांचा गणपती अशी येथील ख्याती आहे.

त्याच रस्त्याला लागून रत्नागिरीच्या दिशेने ’आरे वारे’ हा सनसेट पॉइन्ट आहे. .नवीन मेणाच्या पुतळ्याचे संग्रहालय चालू केले आहे.

गणपतीपुळेचा इतिहास 

 कोकणातील रत्नागिरी जिह्यातील गणपतीपुळ्याचे गणेशस्थान पेशवेकालीन अती प्राचीन आहे. या लंबोदराच्या स्थानाचा इतिहास मुद्गल पुराणादी प्राचीन वाङमयात पश्चिमद्वार देवता या नावाने आहे. कोकणातील प्रत्येक देवस्थान आणि देवतांविषयी वेगवेगळ्या दंतकथा आहेत.

        हिंदुस्थानच्या आठ दिशांत आठ द्वार देवता आहे. त्यापैकी गणपतीपुळ्यातील देवता ही पश्चिमद्वार देवता आहे. मोगलाईच्या काळात ( सुमारे इ.स. १६०० च्या पूर्वी ) आज ज्या ठिकाणी स्वयंभू गणेश मंदिर आहे, त्या ठिकाणी डोंगराच्या पायथ्याशी केवड्याचे बन होते. त्या ठिकाणी बाळंभटजी भिडे हे ब्राह्मण रहात होते. ते गावचे खोत होते. मोगलाईच्या काळात भिडेंवर संकट कोसळले. भिडे हे दृढनिश्चयी होते. "आलेले संकट निवारण झाले तरच अन्नग्रहण करीन", असा निश्चय करुन त्यांनी आराघ्य दैवत मंगलमूर्तीची उपासना करण्यासाठी या केवड्याच्या बनात तपस्या करण्यासाठी मुक्काम केला.
        अन्नपाणी वर्ज करणाऱ्या भिडेंना एके दिवशी दृष्टांत झाला की, "मी या ठिकाणी भक्तांच्या कामना परिपूर्ण करण्यासाठी आगरगुळे (गणेशगुळे) येथून दोन गंडस्थळे व दंतयुक्त स्वरुप धारण करुन प्रकट झालो आहे. माझे निराकार स्वरुप डोंगर हे आहे. माझी सेवा, अनुष्ठान, पूजाअर्चा कर, तुझे संकट दूर होईल." असा दृष्टांत झाला. त्याच कालखंडात खोत भिडे यांची गाय सतत काही दिवस दूध देत नव्हती. म्हणून गुराख्याने बारीक लक्ष ठेवले. तेव्हा त्याला दिसले की सघ्याच्या मूर्तीच्या जागी डोंगरावरील एका शिळेवर गायीच्या स्तनातून सतत दूधाचा अभिषेक होत होता. हा प्रकार त्याने खोतांना सांगितला, त्यांनी तात्काळ सर्व परीसराची सफाई केली व त्यांना दृष्टांतातील गणेशाची मूर्ती आढळली. त्या ठिकाणी गवताचे छप्पर घालून त्यांनी छोटेसे मंदिर उभारले. सारी धार्मिक कृत्ये भिडे भटजींनी सुरु केली.
        गणपतीपुळ्याला गणपतीपुळे हे नाव कसे पडले याचीही एक कथा आहे. पूर्वी या गावात फारशी वस्ती नव्हती. वस्ती झाली ती गावाच्या उत्तरेच्या बाजूला. गाव पश्चिम दिशेने उतरण असून बराचसा भाग पुळणवट आहे. हिंदुस्थानच्या पश्चिम भागाची मुख्य सीमा जो सिंधुसागर आहे, त्या लगतचे गाव असून सकल देवतांमध्ये आराध्यदैवत अशी श्री मंगलमुर्ती तिने आपल्या निवासस्थानाला योग्य ठिकाण असे पाहून या समुद्रकिनारी निवास केला आहे. समुद्रापुढे पुळणीचे (वाळूचे) भव्य मैदानात गणपतीचे महास्थान असल्यामुळे या गावाला गणपतीपुळे म्हटले जावू लागले.

पर्यटन

गणपतीपुळे हे रत्नागिरी जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ आहे. येथील गणपतीची मूर्ती स्वयंभू आहे अशी मान्यता आहे. सह्याद्री पर्वतातील डोंगराळ भागात विराजलेली नैसर्गिक मूर्ती आणि जवळच पश्चिमेला अरबी समुद्र ह्यामुळे हे देऊळ आगळेवेगळे आहे. गणपतीची मूर्ती डोंगराच्या बाजूला असल्याने तिला प्रदक्षिणा घालण्यासाठी संपूर्ण डोंगराला प्रदक्षिणा घालणे क्रमप्राप्त असते. १ किलोमीटर लांबीचा हा प्रदक्षिणामार्ग समुद्र, वाळूचा किनारा आणिनारळ पोफळीच्या झाडांमुळे अतिशय विलोभनीय आहे. या ठिकाणी समुद्र आणि वाळूचा किनारा असल्याने तेथे पर्यटकांची गर्दी पहावयास मिळते. महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ (S.T.) मुंबई, पुणे, कोल्हापूर, नाशिक इत्यादी शहरांपासून गणपतीपुळे येथे जाण्यासाठी थेट बससेवा पुरवते.

गणपतीपुळे येथे महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळ(M.T.D.C.)चे विश्रामगृह आहे. त्याशिवाय देवळातील भटजींच्या घरीसुद्धा राहण्याची सोय होऊ शकते. पर्यटनामुळे गणपतीपुळे हे पर्यटनाचे ठिकाण झाले आहे. दरवर्षी असंख्य पर्यटक भेट देतात.

कसे जाल
रत्नागिरी हे जवळचे रेल्वेस्थानक व शहर आहे. रत्नागिरी आगारातून १०-१५ मिनिटानी गणपतीपुळे येथे जाण्यासाठी बसेस आहेत

गणपतीपुळे हे मुबईपासून ३७५ किलोमीटर अंतरावर आहे. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ वरून जाताना निवळी फाट्यावरून उजव्या हाताला वळले की ३२ किमी अंतरावर गणपतीपुळे येते. तसेच जर रेवस रेड्डी सागरी महामार्गाने गेल्यास तर व्हाया रत्नागिरी शहरातूनही पर्यायी मार्ग आहे.

गणपतीपुळे मंदिराची गुगल पीन
https://goo.gl/maps/Xq3xjQh1Ao42

गणपतीपुळे बाबत सर्व माहिती सांगणारा युट्युब् व्हिडिओ

https://youtu.be/AXzPVtO17To

**विनंती :- आपणास माहिती कशी वाटली प्रतिक्रिया जरुर द्या अन सदर ब्लॉग / फेसबुक पेज आपल्या मित्र परीवारात पण शेअर करा .




शैलेश चौधरी(Shailesh Choudhari) 

( माहिती संकलक / ब्लॉगर / पर्यटण व्यवसायिक )
Blogger and Travel agent

९७६७५ ९१६७५

[Mobile number +919767591675]
WhatsApp number +918888741797

Languages :- Marathi,  Hindi and little bit English.

email address :-

travelbirdindia@yahoo.com


Can Contact between:-

9a.m. to 9 p.m. ( Indian standard time )
Use Google Translate App. or web site to read this artical in your own language . Use Marathi as source language and translate  it in your own language.
पर्यटण एक चळवळ

पर्यटण विषयास वाहिलेला मराठी ब्लॉग

आमच्या फेसबुक पेज ला भेट द्या .
Visit our Facebook page

Travelbirdindia


आम्हाला व्टिटर वर फॉलो करा .
Follow me on Twitter

https://mobile.twitter.com/Shailesh1881975

संदर्भ : इंटरनेट
फोटो : माझी कोंकण ट्रिप २७ ते ३० ऑगस्ट २०१८ व इंटरनेट .

Sunday, September 2, 2018

रत्नागिरी: कोकणातील स्वर्ग - जुवे बेट एकदा पाहाच!

रत्नागिरी:  कोकणातील स्वर्ग - जुवे बेट एकदा पाहाच!

रत्नागिरी: एक गाव... पाण्यानं वेढलेलं... लोकसंख्या 77... आणि मतदार 71.... ग्रामपंचायतीच्या स्थापनेपासून गावानं कधी निवडणूक पाहिली नाही. अर्थात हे गाव म्हणजे एक  बेटच आहे.

रत्नागिरीच्या जैतापूरजवळ धाऊलवल्लीजवळचं जुवे बेट.

चमचमणारं पाणी. नारळी-पोफळीच्या बागा. मधोमध भुई... आणि चारी दिशांना पाणी... पाणी... आणि पाणी...

राजापूरची अर्जुना नदी अर्धचंद्राकृती आकार जिथे घेत तिथेच हा स्वर्ग उभा आहे. कांदळवनाच्या भूलभुलय्यामधून आपण वाट काढत या जुव्यात पोहोचतो.


अर्थात या बेटावर पोहोचण्यासाठी असलेला एकमेव मार्ग म्हणजे बोट.

याबेटावरची लोकसंख्या आहे अवघी 77 त्यातील 71 जणच मतदार. गावचे तब्बल सात सदस्य आणि सरपंच या केवळ 71 लोकातूनच निवडले जातात. पण गेल्या 47 वर्षात या गावाने निवडणूकच अनुभवलेली नाही.

पण मग या गावचा गाडा चालतो तरी कसा?

तर त्याचं उत्तर म्हणजे गाव एकत्र बसतो आणि चर्चेने सगळ्यांना निवडून देतो .

या बेटावर शाळा आहे... दोन मुलं... आणि एक मास्तर... पण त्या दोन मुलांच्या शिक्षणासाठी मास्तर रोजच्या रोज बोटीनं येतात... या बेटावर मतदानही होत नाही... मदतानासाठी खाडी ओलांडून जावं लागतं...

या गावात 77 माणसं असली... तरी घरं मात्र 107... पण बहुतांश बंद... वर्षातून गणपती आणि शिमग्याला मात्र गजबजतात... तशी या गावामध्ये कोणतीच समस्या नाही... पण एक समस्या मात्र या गावाच्या विकासाच्या आड येतेय... आणि तो म्हणजे... नसलेला रस्ता


खारलँड बंधारा बांधून या बेटाला जोडण्याचा प्रयत्न झाला, पण हे सरकारी काम गेल्या ३५ वर्षात कधीच पूर्ण झालेले नाही . निधी खर्ची पडतो पण रस्ता पूर्ण होत नाही. पाण्यात अर्धवट घातलेल्या आणि वाहून गेलेल्या खुणा आजही दिसतात.

इतक्या प्रतिकूल स्थितीतही या बेटाला जागतं ठेवलं आहे, ते या पाण्यानं.  सभोवताला खारं पाणी असतानाही... या बेटावर गोड्या पाण्याच्या विहिरी आहेत... पण या गावाला आणखी एक गोष्ट खास बनवते. तो म्हणजे या बेटाचा इतिहास.

छत्रपतींच्या काळापासून हे बेट अस्तित्वात होतं आणि त्याच काळात पहिल्यांदा या बेटाचा वापर झाला असल्याचे सांगितले जाते. संभाजी राजांना मोघलांनी संगमेश्वरमध्ये घेरले असताना, ताराबाईंना सुरक्षितपणे याच बेटावर ठेवण्यात आले. इथूनच या बेटाचा वावर सुरु झाला. याचवेळी हे बेट मालोजी खोत शिंदे यांच्या ताब्यात देण्यात आलं, असं इथले गावकरी सांगतात.

काय नाही या बेटावर... निसर्ग... आहे... इतिहास... आहे... दुर्गमता... आहे... खाद्यसंस्कृती... आहे... असं असतानाही... हे बेट उपेक्षित आहे..

शांतता अनुभवायची असेल... तर इथं या... माणसांच्या गोंगाटापासून... वाहनांच्या वेगापासून... आणि भौतिक सुखाच्या खुळचट कल्पनांपासून दूर असलेल्या या बेटाच्या तुम्ही प्रेमात पडाल.

कसे जाल :

रत्नागिरी जिल्ह्यातील बुहुचर्चित जैतापुर येथुन हे गाव जवळ आहे .

जवळचे रेल्वेस्टेशन : रत्नागिरी

जवळचे सोईचे विमानतळ : मुंबई अथवा पुणे

जैतापुरची गुगल पिन :

Jaitapur

http://maps.google.com/?q=Jaitapur%2C+Maharashtra&ftid=0x3bea7de1acb66499:0xeec6ca4b064c9b7b&hl=en≷=gb

जाण्याचा योग्य वेळ : ऑक्टोबर ते मे

जुवे बेटाबाबत माहिती देणारा युट्युब व्हिडिओ

https://youtu.be/xSqYId4HtBE

**विनंती :- आपणास माहिती कशी वाटली प्रतिक्रिया जरुर द्या अन सदर ब्लॉग / फेसबुक पेज आपल्या मित्र परीवारात पण शेअर करा .  

शैलेश चौधरी(Shailesh Choudhari)

( माहिती संकलक / ब्लॉगर / पर्यटण व्यवसायिक )
Blogger and Travel agent

९७६७५ ९१६७५

[Mobile number +919767591675]
WhatsApp number +918888741797

Languages :- Marathi,  Hindi and little bit English.

email address :-

travelbirdindia@yahoo.com


Can Contact between:-

9a.m. to 9 p.m. ( Indian standard time )
Use Google Translate App. or web site to read this artical in your own language . Use Marathi as source language and translate  it in your own language.
पर्यटण एक चळवळ


पर्यटण विषयास वाहिलेला मराठी ब्लॉग

http://travelbirdindia.blogspot.com/2018/08/darya-ghat.html?m=1


आमच्या फेसबुक पेज ला भेट द्या .
Visit our Facebook page

Travelbirdindia


आम्हाला व्टिटर वर फॉलो करा .
Follow me on Twitter

https://mobile.twitter.com/Shailesh1881975




लेख व फोटो ABP माझा च्या साईट वरून .