Friday, May 1, 2020

गड किल्ले महाराष्ट्राचे वैभव - किल्ले शिवनेरी .




गड किल्ले महाराष्ट्राचे वैभव !
 किल्ले शिवनेरी

सर्व प्रथम आज एक मे दोन हजार वीस , तुम्हा सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !

आजच्या या मंगल् दिनी मी महाराष्ट्राचे सामर्थ्य व वैभव आहेत त्या किल्ल्यांची  माहिती चे संकलन करून माझ्या Travelbirdindia या फेसबुक पेज व ब्लॉगवर लिहिण्याचा संकल्प केला आहे . यात सदर किल्ल्याचा इतिहास , तेथे जाण्याची योग्य वेळ , त्या किल्ल्याचे  GPS लोकेशन ज्याच्या मार्फत तुम्हाला तुमच्या ठिकाणापासून तेथे जाण्याच्या मार्गाचे मार्गदर्शन होईल . गडाचे फोटो त्याचे वैशिष्ट्य हे हि सांगितले जाईल . तसेच या किल्ल्या विषयी माहिती देणारा एखादा युट्युब व्हिडिओ असेल तर त्याचा पण अँड्रेस दिला जाईल . या गडावर जाण्याच्या विविध वाटा व तेथे जाण्यासाठी जवळचे रेल्वे स्टेशन , विमानतळ अथवा पायथ्याजवळील गावाचे नाव सांगितले जाईल . महाराष्ट्रात साधारणतः ३५० किल्ले आहेत . त्यातील जितक्या किल्ल्यांची माहिती मला संकलीत करता येईल त्यासर्व किल्ल्यांची यथायोग्य माहिती मी देण्याचा प्रयत्न करेल् . मी काहि फार किल्ले फिरलो नाहि , शाररिक अडचणी आहेत . परंतू इंटरनेट वरील माहिती संकलित करून ती योग्य रित्या आपणापर्यंत पोहचवण्याचा मी प्रयत्न करत आहे. हा संकल्प पुर्ण करण्यास श्री छत्रपती शिवाजी महाराज मला सहाय्य करोत हि प्रार्थना !

देवगिरीच्या पाडावानंतर या महाराष्ट्रावर असलेल्या शेकडो वर्षाच्या भयाण यवनी अमावस्येनंतर प्रचंड कर्तुत्ववान , प्रजाहितदक्ष व शिवाचाअंश असलेले शिवाजी महाराज जन्म झाला त्या शिवनेरी किल्ल्याच्या माहिती पासून आपण श्रीगणेशा करू . ( येथे मी धर्मभेद अपेक्षीत करत नाही . )🙏

इतिहासाला जन्म देणारा शिवनेरी ! 

शिवनेरी किल्ला हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. शिवनेरीचा हा प्राचीन किल्ला महाराष्ट्र राज्यात जुन्नर शहराजवळ, पुण्यापासून अंदाजे १०५ किलोमीटरवर आहे. नाणेघाट डोंगररांगात समुद्र सपाटि पासून ३५०० फुट उंचीवर गिरीदुर्ग या प्रकारातील शिवनेरी किल्ला आहे . किल्ला सुस्थितीत असून तेथे जाण्यास थोडी कठिण चढणीची वाट आहे . किल्ल्याची निर्मिती इ . स . ११७० ची आहे .

भारत सरकारने या किल्ल्याला दिनांक २६ मे, इ.स. १९०९ रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेले आहे.

१९ फेब्रुवारी १६३० रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी गडावर झाला होता.हा किल्ला खूप प्रसिद्ध आहे.

या किल्ल्याला चारही बाजूंनी कठीण चढाव असून त्याला जिंकावयास कठीण असा बालेकिल्ला आहे. किल्ल्यावर शिवाई देवीचे छोटे मंदिर व जिजाबाई व बाल-शिवाजी यांच्या प्रतिमा आहेत.
या किल्ल्याचा आकार शंकराच्या पिंडीसारखा आहे.

शिवनेरी अगदी जुन्नर शहरात आहे. जुन्नरमधे शिरतानाच शिवनेरीचे दर्शन होते. किल्ला तसा फार मोठा नाही. १६७३मध्ये ईस्ट इंडिया कंपनीतील डॉ. जॉन फ्रायर याने या किल्ल्याला भेट दिली होती. त्याने आपल्या साधनग्रंथात, या किल्ल्यावर हजार कुटुंबांना सात वर्षे पुरेल एवढी शिधासामुग्री आहे असा उल्लेख केला आहे...

इतिहास

‘जीर्णनगर’, ‘जुन्नेर’ म्हणजेच जुन्नर हे गाव इसवी सन पूर्व काळापासून प्रसिद्ध आहे. ही शक राजा नहपानाची राजधानी होती. सातवाहन राजा गौतमीपुत्र सातकर्णी याने शकांचा नाश केला आणि जुन्नर व येथील सर्व परिसरावर आपले वर्चस्व प्रस्थापित केले. नाणेघाट हा पुरातन व्यापारी मार्ग. या मार्गावरून फार मोठ्या प्रमाणात वाहतूक चालत असे. यावर नजर ठेवण्यासाठी या मार्गावरील दुर्गांची निर्मिती करण्यात आली. सातवाहनांची सत्ता स्थिरावल्यानंतर त्यांनी येथे अनेक ठिकाणी लेणी खोदवून घेतली.

सातवाहनांनंतर शिवनेरी चालुक्य व राष्ट्रकूट या राजवटींच्या सत्तेखाली होता. ११७० ते १३०८ च्या सुमारास यादवांनी येथे आपले राज्य स्थापन केले. आणि याच काळात शिवनेरीला गडाचे स्वरूप प्राप्त झाले. नंतर इ.स. १४४३ मध्ये मलिक– उल–तुजार याने यादवांचा पराभव करून किल्ला सर केला. अशा प्रकारे किल्ला बहमनी राजवटीखाली आला. इ.स. १४७० मध्ये मलिक– उल–तुजारचा प्रतिनिधी मलिक महंमद याने किल्ला नाकेबंद करून पुन्हा सर केला. १४४६ मध्ये मलिक महंमदच्या वडिलांच्या मृत्यूनंतर निजामशाहीची स्थापना झाली. पुढे १४९३ मध्ये इथली राजधानी गडावरून अहमदनगरला हलवण्यात आली. इ.स. १५६५ मध्ये सुलतान मूर्तिजा निजामाने आपला भाऊ कासीम याला या गडावर कैदेत ठेवले होते.

यानंतर इ.स. १५९५ मध्ये किल्ला व जुन्नर प्रांत मालोजी राजे भोसले यांच्याकडे आला. जिजाबाईंचे वडील जाधवराव यांच्या हत्येनंतर १६२९ मध्ये जिजामाता गरोदर असताना शहाजीने त्यांना ५०० स्वार त्यांच्या सोबत देऊन रातोरात शिवनेरीवर नेले. ‘शिवनेरी गडावर श्रीभवानीमाता शिवाई ला जीजाऊने नवस केला जर आपल्याला पुत्र झाला तर तुझें नाव ठेवीन. त्याउप्पर, शके १५५१ शुक्ल नाम संवत्सरे, फाल्गुन वद्य तृतीयेला, शुक्रवारी सूर्यास्तानंतर शिवाजीराजे यांचा जन्म जाला. तारीख होती १९ फेब्रुवारी, इसवी सन १६३०. इ.स. १६३२ मध्ये जिजाबाईने शिवाजीसह गड सोडला आणि १६३७ मध्ये किल्ला मोगलांच्या ताब्यात गेला. १६५० मध्ये मोगलांविरूद्ध येथील महादेव कोळ्यांनी बंड केले. यात मोगलांचा विजय झाला. पुढे इ.स. १६७३ मध्ये शिवनेरीचा किल्लेदार अजीजखान याला फितवून किल्ल्याला माळ लावून सर करण्याचा अयशस्वी प्रयत्‍न राजे शिवाजीने केला. इ.स. १६७८ मध्ये जुन्नर प्रांत लुटला गेला आणि मराठ्यांनी किल्ला घेण्याचा परत एकदा प्रयत्‍न केला, मात्र अपयश पदरात पडले. पुढे ३८ वर्षांनंतर १७१६ मध्ये शाहूमहाराजांनी किल्ला मराठेशाहीत आणला व नंतर तो पेशव्यांकडे हस्तांतरित करण्यात आला.

कोळी चौथरा

शिवाजी महाराजांच्या पुणे परिसरातील कारवाया आदिलशाहीला खुपत होत्या. मोगलांना जरी त्या ठाऊक असल्या तरी अजून त्यांना त्याचा थेट उपसर्ग होत नव्हता. त्याच सुमाराला काही महादेव कोळी लोकांनी मोगलांविरुद्ध आघाडी उघडून जुन्नर व शिवनेरीचा ताबा घेतला. ह्यापूर्वी हा भाग निजामशाहीकडे होता. निजामशाही पडल्यानंतर सीमाभागाकडे आदिलशाहीचे व मोगलांचे थोडे दुर्लक्ष होत होते. कदाचित ह्याचा फायदा घेऊन ह्या महादेव कोळ्यांनी त्या प्रांतावर अधिकार स्थापित केला असावा. मोगलांनी ह्यावर लगेच उपाययोजना करण्यासाठी व महादेव कोळ्यांना परास्त करण्यासाठी एक भली मोठी फौज पाठवली. शिवनेरीला वेढा पडला व लवकरच महादेव कोळ्यांच्या नवख्या सैन्याने बलाढ्य मोगल सैन्यापुढे नांगी टाकली. सुमारे १५०० महादेव कोळ्यांना जेरबंद करण्यात आले. त्यांचे अतोनात हाल करून नंतर माथ्यावरच्या एका चौथऱ्यावर त्यांचा शिरच्छेद करण्यात आला. ह्या नरसंहाराची आठवण म्हणून आज त्या चौथऱ्याला कोळी चौथरा म्हणतात. नंतर त्या चौथऱ्यावर एक घुमटी बांधली गेली व त्यावर पारसीमधे दोन शिलालेखदेखील आहेत. दुर्दैवाने आज त्या महादेव कोळ्यांची किंवा त्यांच्या म्होरक्याची नावे उपलब्ध नाहीत.

गडावर जाण्याच्या वाटा

गडावर जाण्याच्या दोन प्रमुख वाटा जुन्नर गावातूनच जातात. पुणेकरांना तसेच मुंबईकरांना एका दिवसात शिवनेरी पाहून घरी परतता येते.

साखळीची वाट :

या वाटेने गडावर यायचे झाल्यास जुन्नर शहरात शिरल्यानंतर नव्या बसस्टँड समोरील रस्त्याने छत्रपति शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ यावे. येथे चार रस्ते एकत्र मिळतात. डाव्या बाजूस जाणार्‍या रस्त्याने साधारणतः एक किलोमीटर गेल्यावर रस्त्याच्या उजव्या कडेला एक मंदिर लागते. मंदिरासमोरून जाणारी मळलेली पायवाट थेट शिवनेरी किल्ल्याच्या एका कातळभिंतीपाशी घेऊन जाते. भिंतीला लावलेल्या साखळीच्या आणि कातळात खोदलेल्या पायर्‍यांच्या साह्याने वर पोहचता येते. ही वाट थोडी अवघड असून गडावर पोहचण्यास पाऊण तास लागतो.

सात दरवाज्यांची वाट :

छत्रपति शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून डाव्या बाजूच्या रस्त्याने चालत सुटल्यास डांबरी रस्ता आपणास गडाच्या पायर्‍यार्‍यांपाशी घेऊन जातो. या वाटेने गडावर येताना सात दरवाजे लागतात. पहिला महादरवाजा, दुसरा पीर दरवाजा, तिसरा परवानगीचा दरवाजा, चौथा हत्ती दरवाजा, पाचवा शिपाई दरवाजा, सहावा फाटक दरवाजा आणि सातवा कुलाबकर दरवाजा. या मार्गे किल्ल्यावर पोहचण्यासाठी दीड तास लागतो.

कसे जाल ?

जवळचे विमान तळ - पुणे अथवा मुंबई

जवळचे रेल्वे स्टेशन - पुणे

मुंबईहून माळशेज मार्गेः

जुन्नरला येतांना माळशेज घाट पार केल्यावर ८ ते ९ किलोमीटरवर ‘शिवनेरी १९ कि.मी.’ अशी एक पाटी रस्त्याच्या कडेला लावलेली दिसते. हा मार्ग गणेश खिंडीतून शिवनेरी किल्ल्यापर्यंत जातो. या मार्गाने गडावर पोहचण्यास मुंबईपासून एक दिवस लागतो

पुणेहून नारायणगाव मार्गेः

पुणे मधून नारायणगाव पर्यंत साधारणतः 75 कि.मी. अंतरावर पुणे-नाशिक मार्गे व त्यानंतर नारायणगाव-जुन्नर मार्गे 15 कि.मी.

किल्ल्याला भेट देण्याची योग्य वेळ --  प्रचंड पाऊस असलेले दिवस सोडून किल्ल्याला कधिहि भेट देता येते .

शिवनेरी किल्ल्याची गुगल मॅप पिन -

https://maps.app.goo.gl/E5ZBH6Xrptr8F9tn7

शिवनेरी किल्ल्याची माहिती सांगणारा युट्युब व्हिडिओ

https://youtu.be/k_T8HZChHkw

शिवनेरी किल्ला  3D  मध्ये पहाण्यास गुगल अर्थ पिन

https://earth.app.goo.gl/L5PzVC

**विनंती :- आपणास माहिती कशी वाटली प्रतिक्रिया जरुर द्या अन सदर ब्लॉग / फेसबुक पेज आपल्या मित्र परीवारात पण शेअर करा . 

शैलेश चौधरी(Shailesh Choudhari)
( माहिती संकलक / ब्लॉगर / पर्यटण व्यवसायिक )
Blogger and Travel agent

९७६७५ ९१६७५

[Mobile number +919767591675]
WhatsApp number +918888741797

Languages :- Marathi,  Hindi and little bit English.

email address :-

travelbirdindia@yahoo.com

Can Contact between:-

9a.m. to 9 p.m. ( Indian standard time )
Use Google Translate App. or web site to read this artical in your own language . Use Marathi as source language and translate  it in your own language.
पर्यटण एक चळवळ

पर्यटण विषयास वाहिलेला मराठी ब्लॉग

आमच्या फेसबुक पेज ला भेट द्या .
Visit our Facebook page

Travelbirdindia

आम्हाला व्टिटर वर फॉलो करा .
Follow me on Twitter

https://mobile.twitter.com/Shailesh1881975

संदर्भ: इंटरनेट वरिल विविध साईट , विकिपिडिया , गुगल मॅप, गुगल इमेज, गुगल अर्थ व यु ट्युब

Friday, August 23, 2019

श्री क्षेत्र तुळजापूर (तुळजाभवानी) Tulajapur


श्री क्षेत्र तुळजापूर (तुळजाभवानी)








महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी श्री तुळजाभवानी देवीचे तुळजापूर क्षेत्र हे एक पूर्ण शक्तिपीठ आहे. ही देवी भगवती (भवानी) म्हणून प्रसिद्ध आहे. महाराष्ट्र क्षात्रतेजाची स्फूर्ती देवता, प्रेरणाशक्ती व स्वराज्य संस्थापक राजे श्री शिवछत्रपती यांची आराध्यदेवता, अशी ही तुळजापूरची भवानीदेवी महाराष्ट्राची कुलस्वामीनी आहे.

मूळ नाव चिंचपूर

तुळजापूरचं मूळ नाव चिंचपूर. यमुनाचल प्रदेशातील चिंचपूर भागातील एका दरीत तुळजाभवानीचं ठाणं असून मंदिराची मूळ बांधणी किल्लेवजा असून मंदिर हे हेमाडपंथी शैलीतील आहे. प्राचीन काळी तुळजापुरात मोठय़ा प्रमाणावर चिंचेची झाडं असल्याचा संदर्भ सापडत असला तरी आज तेथे हे झाड दिसणं दुर्मीळ झालं आहे. हे गाव बालाघाटच्या एका कड्यावर वसले आहे. मंदिराच्या काही भागाची धाटणी हेमाडपंती आहे. इतिहास व पुरातत्त्वदृष्ट्या हे मंदिर राष्ट्रकुट अथवा यादवकालीन मानले जाते. तर काहींच्या मते हे १७ व्या किंवा १८ व्या शतकातील मंदिर आहे. देवीच्या गर्भगृहाच्या भिंतीवर छोटी-छोटी आकर्षक शिल्पे आहेत. सभामंडपात उत्तरेस देवीचे शयनगृह असून इथे चांदीचा पलंग आहे.

स्कंद पुराणातील सह्याद्री खंडात श्री तुळजाभवानीची अवतार कथा आहे. कृतयुगात कर्दम ऋषीपत्नी अनुभूती तपस्येत असताना, कूकर या दैत्याने तिचे पावित्र्य भंग करण्याचा प्रयत्न केला. तपस्वी अनुभूतीने पावित्र्य रक्षणासाठी देवी भगवतीचा धावा केला. देवी भगवती साक्षात प्रगटली व कूकर या दैत्याशी युद्ध करून त्याचा वध केला. साध्वी अनुभूतीच्या विनवणीवरून देवी भगवतीने या पर्वतराईत वास्तव्य केले. भक्ताच्या हाकेला त्वरित धावून येणारी व मनोरथ पूर्ण करणारी म्हणून ही देवी त्वरिता-तुरजा-तुळजा (भवानी) या नावाने ओळखली जाते.

संपूर्ण भारतात कुलदेवता म्हणून या देवीला मान आहे. कृतयुगात -अनुभूतीसाठी, त्रेत्रायुगात – श्रीरामचंद्रासाठी, द्वापारयुगात – धर्मराजासाठी व कलियुगात-छत्रपती शिवरायांसाठी आशीर्वादरूप ठरलेली ही भवानी भक्ततारिणी, वरप्रसादिनी आहे. अनेक प्रदेशांतून विविध जाती-पंथांचे भाविक इथे येतात.

येथील मंदिराच्या दक्षिणेकडील दरवाजास ‘परमार’ दरवाजा म्हणतात. जगदेव परमार या महान देवीभक्ताने आपले मस्तक सात वेळा देवीला अर्पण केले, अशी श्लोकरचना या दरवाजावर कोरली आहे. सभामंडपात पश्र्चिम दिशेला गर्भगृह असून चांदीच्या सिंहासनात, पूर्वाभिमुख अशी श्री तुळजाभवानी देवीची रेखीव व प्रसन्न मूर्ती आहे. मूर्ती गंडकी शिळेची असून प्रमाणबद्ध आहे. अष्टभुजा महिषासुरमर्दिनी असे देवीचे मनोहर रूप आहे.

साडेतीन शक्ती पीठांपैकी फक्त श्री तुळजाभवानीची मूर्ती तिच्या जागेवरून सहजपणे काढता येते व तेवढय़ाच सहजपणे पुन्हा जागेवर बसवता येते. त्यामुळे वर्षांतून तीन वेळा म्हणजे भाद्रपद वद्य अष्टमी, आश्विन शुद्ध एकादशी आणि पौष शुद्ध प्रतिपदेला देवीच्या मूर्तीला सिंहासनावरून काढून पलंगावर झोपविले जाते. ज्याला देवीचा निद्राकाल म्हटले जाते. घोरनिद्रा, श्रमनिद्रा आणि सुखनिद्रा या नावाने चालणारा देवीचा निद्राकाल आजही तेवढय़ाच परंपरेने जोपासला जातो. अन्य कुठल्याही देवाला या प्रकारे सहजपणे उचलून झोपविण्याची पद्धत नाही. 
श्री तुळजाभवानीचे पहाटेचे चरणतीर्थ, सकाळ व सायंकाळची महापूजा तसेच रात्रीची प्रक्षाळपूजा व इतर प्रत्यक्षात ज्या पूजा होत असतात, त्या वेळी देवीला प्रत्यक्ष स्पर्श करण्याचा अधिकार मात्र फक्त पानेरी मठाचे महंत व सोळाआणे कदम पुजारी या घराण्यातील स्त्री- पुरुषांना असून आजही ती परंपरा कायम आहे. यांच्याव्यतिरिक्त कुणीही असला तरी तो देवीच्या मूर्तीला स्पर्श करून दर्शन घेऊ शकत नाही.
भगताकडून सांगितलेल्या माहितीनुसार तुळजापूरची मूळ मूर्ती ही शालिवाहन म्हणजे सातवाहन कालखंडातील आहे. सातवाहनांची राजधानी पैठण ही असून त्या ठिकाणच्या राजकीय उलथापालथीमुळे या घराण्यातील शंभूराजाने ही मूर्ती अंधेरी नगरी येथे आणून तिची प्रतिष्ठापना केली. पुढे या घराण्यातील तेलंगा नावाचा राजा पराक्रमी असून तो देवीभक्त होता. अंधेरी नगरी परिसरातही आता यवनांचे आक्रमण व्हायला लागल्यानंतर स्वारीवर जाताना तेलंगाने देवीची मूर्ती आपल्यासोबत ठेवली. एकदा तो दक्षिणेत स्वारीवर असताना त्याचा मुक्काम यमुनाचल प्रांतातील चिंचपूर (तुळजापूर) येथे पडला. दुर्दैवाने याच ठिकाणी राजा तेलंगाचे निधन झाले. त्यामुळे ही मूर्ती तुळजापुरातच राहिली. आजही शुक्रवार पेठेतील जनकोजीच्या समाधीच्या बाजूला तेलंगा राजाची समाधी आहे. तेलंगा राजानंतर अंधेरी नगरीचा देवीचा भक्त जनकोजी देवकर तेली (सध्याचे भगत). पुढे बहामनी कालखंडात याच जनकोजीने देवीची मूर्ती अंधेरी नगरीला आणली. परंतु बहामनी राजवटीतून निर्माण झालेल्या अहमदनगरच्या निजामापासून त्रास व्हायला सुरुवात झाल्यानंतर परत ही मूर्ती तुळजापूरला आणण्यात आली. 

या ऐतिहासिक शक्तिपीठाबरोबरच मंदिराच्या परिसरातील कल्लोळ तीर्थ, गोमुख तीर्थ, सिद्धिविनायक मंदिर, श्री भवानी शंकर मंदिर, होमकुंड, प्रांगणातील देवीदेवता, मातंगी मंदिर इ. धार्मिक स्थळे प्रसिद्ध आहेत.

तुळजाभवानी ही महिषमर्दिनी असल्याने तिला वीरांची देवता म्हटलं जातं. त्यातही छत्रपती शिवाजी महाराजांच्या भोसले कुळाची ती कुलदेवता असल्याने तुळजाभवानीला विशेष महत्त्व प्राप्त झालं. म्हणूनच कदाचित कोल्हापूर, माहूर आणि वणीच्या मंदिरात तुळजाभवानीचं मंदिर आहे. त्याप्रमाणे तुळजाभवानी मंदिर परिसरात इतर तीन शक्तिपीठांचा समावेश करण्यात आलेला नाही. महाराष्ट्रातील बहुतेकांची ती कुलदेवता असल्याने वर्षभर भक्तांचा महापूर इथं सुरू असतो.

बालाघाट डोंगररांगातील प्राचीन काळातील यमुनाचल प्रदेशातील चिंचपूर या ठिकाणी एका दरीत तुळजाभवानीचं ठाणं आहे. तुळजाभवानी म्हणजे भक्तांच्या हाकेला त्वरित धावून जाणारी ती त्वरिता! त्वरितावरूनच तुळजापूर नामाभिधान तयार झालं.
तुळजापुरातील विविध प्रथा व त्यांचे मानकरी
तुळजाभवानीचं शारदीय आणि शाकंभरी असे दोन नवरात्र महोत्सव असून या उत्सवापूर्वी देवाला मूळ स्थानावरून उचलून शयनगृहात झोपविलं जातं. याला देवीचा निद्राकाल म्हणतात. त्यानुसार भाद्रपद वद्य अष्टमी, आश्विन शुद्ध एकादशी आणि पौष शुद्ध प्रतिपदेला देवीजींचा निद्राकाल असून त्याला अनुक्रमे घोरनिद्रा, श्रमनिद्रा आणि सुखनिद्रा म्हटलं जातं. देवीच्या निद्राकालाची परंपरा शतकानुशतकं आजही कायम आहे. एवढंच नाही तर दसऱ्याचं सीमोल्लंघन साजरं करण्याकरिता देवीला एका विशिष्ट पालखीत बसवून मिरविलं जातं. 

वर्षांतून तीन वेळा तुळजाभवानीची मूर्ती निद्राकाळाकरिता एका विशिष्ट पलंगावर झोपविली जाते. तर सीमोल्लंघनाकरिता मूळ मूर्ती पालखीत घालून मिरविली जाते. तुळजाभवानीची पूजाअर्चा करण्याचं काम वर्षभर स्थानिक पुजारी करत असले तरी पालखी आणण्याचा मान नगरजवळील भिंगारच्या भगत घराण्याकडे आहे. तर परंपरेने पालखीच्या पुढच्या खांद्यांचा मान बार्शी तालुक्यातील आगळगांव गोर माळय़ाच्या लोकांचा आहे.

याचबरोबर देवीला ज्या पालखीतून मिरविली जाते ती आणण्याचा मान नगरजवळील जनकोजी तेली (भगत) घराण्याकडे आहे. मध्ययुगीन कालखंडात भिंगारचा जनकोजी तेली तुळजापूरला येताना आपल्या घराला आग लावून निघाला. तुळजापूरला येत असताना रस्त्यातच त्याचं निधन झालं. त्याच्या भक्तीवर प्रसन्न होऊन देवीने दरवर्षी तेल्याच्या पालखीत बसून सीमोल्लंघन खेळण्याकरिता जाण्याची प्रथा आजही कायम आहे. जनकोजीची अकरावी पिढी ही सेवा अविरतपणे बजावते. जनकोजी तेल्याच्या घराण्याचा मान म्हणून पालखी तर आहेच, शिवाय देवीला सीमोल्लंघनाकरिता सिंहासनावरून हलविण्यापूर्वी तेल्याचे वंशज आपल्या करंगळीच्या रक्ताचा टिळा देवीच्या चरणाला लावण्याची प्रथा होती.

तुळजाभवानीची पालखी आणण्याचा मान भिंगारला असला तरी प्रत्यक्षात पालखी तयार करण्याचा सन्मान मात्र राहुरीकरांना लाभतो. पालखी तयार करताना सर्व समाजातील लोकांना त्यात सामावून घेतलेले आहे. पालखीचे सुतारकाम, लोहारकाम आणि रंगरंगोटीचे काम राहुरी येथे पूर्ण केले जाते. 
निद्राकालावधीत देवी ज्या पलंगावर झोपतात तो पलंग अहमदनगरमधील पलंगे नावाच्या तेली घराण्याकडून दिला जातो. तर पलंग तयार करण्याचं काम आंबे गाव-घोडेगावमधील ठाकूर घराने पार पाडते. दसऱ्यापूर्वी एक महिना अगोदर हा पलंग धुणं अहमदनगर, सोलापूर जिल्ह्यातून मिरवत तुळजापूरला येत असतो. यातही विशेष बाब म्हणजे तुळजाभवानीचा पलंग जुन्नरला गेल्यानंतर शिवनेरी किल्ल्यासमोर विश्रांतीसाठी ठेवला जातो. छत्रपती शिवरायांच्या भक्तीत तुळजाभवानीचा अग्रक्रम आहे. त्याचा हा योगायोगच. कुठल्याही मंदिरामध्ये पलंग आणि पालखी या वस्तू पवित्र असल्याने त्याचं जतन करून ठेवलं जातं. याउलट तुळजाभवानी मंदिरातील पलंग आणि पालखी एकाच वेळी वापरून त्या होमात टाकून नष्ट केल्या जातात. हे वेगळेपण आहे.
देवीच्या शिरावर मुकुट बसविण्यापूर्वी देवीच्या मस्तकी पानाची चुंबळ करावी लागते. ते पान पुरविण्याची जबाबदारी एका तांबोळी नामक मुस्लिम घराची आहे. हे तांबोळी घराणे नवरात्रीत आपल्या घरी परंपरेने घटस्थापनासुद्धा करते. त्यानुसार मंदिरातील अनेक कामे परंपरेने एकाच घराण्याकडे अखंडपणे चालत आलेली आहेत. अल्पशा मोबदल्यात ही मंडळी देवीची सेवा म्हणून दिवसरात्र राबतात. त्यामध्ये जाधव घराणे नगारा वाजविण्याचे काम करते. कदम घराण्यातील घरे घंटी वाजवितात. पलंगे देवीच्या पलंगाची सेवा करतात, न्हावी समाजाकडे सनई-चौघडा वाजविण्याचे काम आहे. याप्रमाणे हरेक जाती-धर्माला इथं परंपरेनं सेवा बजाविण्याचा अधिकार आहे.

लाखोचे दान देणारी तुळजाभवानी पहिला नैवेद्य भाजीभाकरीचा पसंत करते. तो उपरकर घराण्याकडून येतो. देवीची प्रक्षाळ, सिंहासन यांसारख्या पूजेदरम्यान हाताखाली मदत करण्याचे काम पवेकर करतात. भक्ताने सिंहासनपूजा केल्यानंतर देवीजींच्या अंगावरील चिन्हे दाखविण्याचे काम हवालदार करायचा. सकाळ, दुपार आणि सायंकाळ अशा तीन वेळा दूधखिरीचा नैवेद्य हा कोल्हापूर संस्थानच्या वतीने दिला जातो. त्यासोबत पानाचा एक विडाही दिला जातो. 

तुळजाभवानीच्या सेवेत खंड पडू नये म्हणून अनेक सेवेकरी रात्रंदिवस झटत असतात. त्यातही एक विशेष सेवा म्हणजे तुळजाभवानीला उन्हाळय़ात उकाडा लागू नये म्हणून पलंगे सलग तीन महिने देवीजींना वारा घालतात. सिंहासनारूढ देवीजींना वारा घालण्याकरिता पलंगे हातात पंखा घेऊन आपली चाकरी बजावत असतातच यासोबतच चैत्रशुद्ध बलिप्रतिपदेपासून ते मृगाच्या आगमनापर्यंत दररोज दुपारी देवीला नैवेद्यात सरबत दिले जाते. हे लिंबू सरबत पुरविण्याचे काम वंशपरंपरेने भिसे आणि दीक्षित घराण्याकडेच आहे. विनामोबदला ही मंडळी आपले काम चोखपणे करत असतात.

तुळजापुरात देवीच्या सेवेत सर्व जातीधर्माना स्थान आहे. देवीला टोपासाठी लागणारी पानं पुरविणारे तांबोळी मुस्लीम असले तरी देवीची माळ, पोत, परडी तर पाळतातच शिवाय घटस्थापनाही करतात. देवीच्या नैवेद्यात मांसाहार, तर येथील काळभैरवाला नैवेद्यानंतर गांजाची चिलीम तोंडात दिली जाते. याशिवाय अख्खे गावही अनेक परंपरा पाळते. त्यानुसार नवरात्रीत गादी पलंगाचा त्याग करतात. चप्पल घालत नाहीत. इतरही अनेक प्रथा आहेत. त्यानुसार कुंभाराचे चाक, तेलाचा घाणा गावात चालवत नाहीत. 

तुळजाभवानी म्हणजे शाक्त संप्रदायाशी निगडित असल्याने तिच्या प्रथापरंपराही काही वेगळय़ाच असणार! त्यानुसार देवीच्या नावाने गोंधळ घालणे आलेच. एका भक्ताच्या घराण्याची प्रथा तर अशी आहे की, चक्क बोंबलत जाऊन दर्शन घ्यावे लागते. एक दंतकथा अशी सांगितली जाते की मौजे रांजणी ता. घनसांगवी जि. जालना येथील तुकाराम नावाचा भक्त शेकडो वर्षांपूर्वी देवीच्या दर्शनासाठी आला असता रात्रीच्या समयी त्याला भूकंप झाल्याचा दृष्टांत होऊन भीतीने तो ओरडतच घराबाहेर पडला. त्याच्या आवाजाने सर्व जण घराबाहेर पडल्याने अनेकांचे प्राण वाचले. परंतु याच भक्ताला रस्त्यात काही जणांनी लुटले म्हणून तो देवीला साकडे घालण्याकरिता माझे काय चुकले म्हणत बोंब ठोकतच गेला. देवीला साकडे घालण्यासाठी बोंबलतच जाण्याची परंपरा निर्माण झाली. त्यानुसार दत्त जयंतीला त्याचे वंशज तुळजापुरात प्रवेश केल्यानंतर देवीच्या गाभाऱ्यापर्यंत चक्क बोंबलत जाऊन दर्शन घेतात. त्यामुळे या घराण्याला नाव पडले बोंबले! विशेष म्हणजे देवीच्या भक्तीत गढून गेलेल्या तुकारामाचा अंत तुळजापुरात व्हावा हा पण योगायोगच. त्यामुळे शहरात या तुका बोंबल्याची समाधीसुद्धा आहे. अशा अनेक चित्रविचित्र परंपरा तुळजापूरवासीयांनी जपल्या आहेत.

***आता जगातून कधी हि घ्या तुळजाभवानीचे थेट दर्शन

https://osmanabad.gov.in/shri-tuljabhavani-tuljapur-live-darshan/

तुळजापुरास केव्हा जावे .

तुळजापुरास जाण्यास कुठलाहि दिवस त्याज्य नाहि . भाविकाच्या मनात आले की मग कधि हि जाता येते . नवरात्र , दिवाळी , मंगळवार व शुक्रवारास येथे खास महत्त्व आहे . ज्यांची तुळजाभवानी कुलदैवी आहे ते लग्नाआधी लग्नपत्रिका ठेवण्यास व लग्नानंतर नवदांपत्यासह देवीच्या दर्शनास जाण्याची प्रथा आहे .

निवास व कुळोपचार

परंपरागत पद्धती नुसार बरेच जण त्यांच्या कुलाचे कार्य करणा या पुजाऱ्याच्या घरी च  रहाणे पसंत करतात . त्यामुळे त्यांना त्या घरात कुलपरंपरे नुसार देवीचा नैवेद्य तयार करून मिळतो . तसेच अनेक घराण्यात तुळजापुराला गेल्या वर जागरण - गोंधळ घालण्याची प्रथा आहे . पुजाऱ्यांच्या घरात याची चांगली सोय होते हा पण एक फायदा आहे .
अवांतर जाणाऱ्यांसाठी तुळजापुरात अनेक भक्तनिवास , लॉज व हॉटेल्स आहेत .

तुळजापुरातील इतर महत्त्वाची ठिकाणे .

घारशीळ, भारती बुवांचा मठ, पापनाश तीर्थ, धाकटे तुळजापूर, तीर्थकुंड, मंकावती तिर्थ , गरीब नाथ मठ, काळभैरव मंदिर , रामवरदायिनी मंदिर इत्यादी पवित्र धार्मिक स्थळे तुळजापुरात आहेत.

तुळजापुरास कसे जावे .

हे स्थान उस्मानाबाद जिल्ह्यात असून उस्मानाबाद व सोलापूर ही जवळची रेल्वे स्थानके आहेत. 
उस्मानाबाद – तुळजापूर अंतर १९ कि.मी. आहे. सोलापूर, उस्मानाबाद, औरंगाबाद, जळगाव, मुंबई, पुणे, कोल्हापूर या ठिकाणांहून तुळजापूरला थेट बसची सोय आहे.

तुळजापुरास जाण्यास सोईची आंतरराष्ट्रिय विमानतळे पुणे व मुंबई आहेत .

तुळजापुराची गुगल पिन

Tuljapur
Maharashtra 413601

https://maps.app.goo.gl/t4uarY8Nn5Cq85TGA

तुळजापुराबाबत माहिती सांगणारा युट्युब

https://youtu.be/JlWeLziEByw

विनंती :- आपणास माहिती कशी वाटली प्रतिक्रिया जरुर द्या अन सदर ब्लॉग / फेसबुक पेज आपल्या मित्र परीवारात पण शेअर करा .  

शैलेश चौधरी(Shailesh Choudhari)
( माहिती संकलक / ब्लॉगर / पर्यटण व्यवसायिक )
Blogger and Travel agent
९७६७५ ९१६७५

[Mobile number +919767591675]
WhatsApp number +918888741797
Languages :- Marathi,  Hindi and little bit English.
email address :-
travelbirdindia@yahoo.com
Can Contact between:-
9a.m. to 9 p.m. ( Indian standard time )
Use Google Translate App. or web site to read this artical in your own language . Use Marathi as source language and translate  it in your own language.

पर्यटण एक चळवळ

पर्यटण विषयास वाहिलेला मराठी ब्लॉग

आमच्या फेसबुक पेज ला भेट द्या .


Visit our Facebook page
Travelbirdindia

आम्हाला व्टिटर वर फॉलो करा .
Follow me on Twitter

https://mobile.twitter.com/Shailesh1881975

संदर्भ :- विकीपिडिया , इंटरनेटवरील विविध लेख , गुगल मॅप व यु ट्युब,

फोटो: - इंटरनेटवर उपलब्ध विविध व्यक्तींने काढलेले फोटो व तुळजापुर संस्थानच्या वेबसाईट वरील फोटो .

Thursday, August 22, 2019

वृंदावन धाम (Virndawan dham , Uttar Pradesh)

वृंदावन धाम








आज कृष्णजन्माष्ठमी आजच्याच दिवशी श्रीकृष्णाचा जन्म मथुरा येथे कैदेत असलेल्या देवकी व वसुदेवांच्या पोटि त्यांचा आठवी संतान म्हणून झाला . कृष्ण जन्मानंतर कारागृहातील सेवकांना गाढ झोप लागली व कारागृहाची द्वारे आपोआप उघडली गेली . त्यानंतर वसुदेव श्रीकृष्णांस घेऊन वृंदावनात गेले व श्रीकृष्णांस नंदाच्या घरी ठेवले . तेथुन नुकत्याच जन्मलेल्या आदिमाया शक्तीस घेऊन मथुरेस परत आले . त्यामुळे श्रीकृष्ण जन्म सोहळा प्रथम वृंदावन येथेच झाला . त्यामुळे आपण आज वृंदावन या ठिकाणाची माहिती घेऊ .

वृंदावन उत्तर प्रदेशातील मथुरा जिल्ह्यात स्थित एक पौराणिक शहर आहे.  ब्रज क्षेत्रातील हे एक प्रमुख ठिकाण आहे.  हिंदू धर्माच्या अनुसार भगवान श्रीकृष्ण यांनी त्यांचे बालपण येथे घालवले.  हे शहर आग्रा-दिल्ली महामार्गावरील कृष्णाचे जन्मस्थान, मथुरापासून सुमारे 10 किमी अंतरावर आहे (एनएच 2).  वृंदावन धाम राधा आणि कृष्णाची पूजा करण्यासाठी समर्पित आहे आणि बरीच मंदिरे येथे आहेत.  वृंदावन हे वैष्णव धर्माने पवित्र मानले आहेत.  वृंदावन धाम येथे वर्षभर पर्यटक भेट देत असले तरी कृष्णा जन्माष्टमीच्या वेळी कृष्णाच्या बालक्रिडा   पाहण्यासाठी येथे प्रचंड गर्दी असते.

1. वृंदावन धामचा इतिहास -

वृंदावन धामचा प्राचीन भूतकाळ हिंदू संस्कृती आणि इतिहासाशी संबंधित आहे.  वल्लभचार्य वयाच्या ११ व्या वर्षी वृंदावन येथे आल्या असा विश्वास आहे.  नंतर त्यांनी भारतात तीन तीर्थक्षेत्रांत उपदेश केला आणि अनवाणी पायात जाऊन ८४ ठिकाणी भगवद्गीतेचा उपदेश केला.  ते दरवर्षी चार महिने वृंदावनमध्ये राहत असे.  अशा प्रकारे वृंदावनमध्ये त्याच्या लोकांवर मोठा प्रभाव पाडला.

चैतन्य महाप्रभुंनी पुन्हा शोध घेतल्यावर वृंदावनचे सार १६ व्या शतकापर्यंत विलुप्त होऊ लागले.  १५१५ मध्ये भगवान श्रीकृष्णाच्या वरील उल्लेखित संबंधित गमावलेली पवित्र स्थळे शोधण्याच्या उद्देशाने चैतन्य महाप्रभु वृंदावनला गेले.  असा विश्वास आहे की आपल्या दैवी आध्यात्मिक सामर्थ्याने ते  वृंदावन आणि त्याच्या आसपासच्या कृष्णाच्या भूतकाळातील सर्व महत्वाची ठिकाणे शोधू शकले होता.  यानंतर मीराबाईंनीही मेवाड राज्य सोडले आणि वृंदावनला आल्या .   अशा प्रकारे वृंदावन धाम त्याच्या प्राचीन इतिहासासाठी प्रसिद्ध आहे.

२. वृंदावन बद्दल काही रोचक तथ्य

वृंदावन यमुना नदीने तीन बाजूंनी वेढलेले आहे आणि त्याचा नैसर्गिक रंग फारच वेगळा आहे.

वृंदावनला "विधवांचे शहर" म्हणून देखील ओळखले जाते.  येथे मोठ्या संख्येने विधवा आहेत आणि तेथे विधवा आश्रम आहेत.

वृंदावनचे वैशिष्ट्य म्हणजे त्याला अनेक ऐतिहासिक वारसा, शेकडो आश्रम आणि अनेक गौशाळा आहेत.

गौंड्या वैष्णव, वैष्णव आणि हिंदूंच्या धार्मिक कार्यासाठी वृंदावन जगभरात प्रसिद्ध आहे.

सूरदास, स्वामी हरिदास, चैतन्य महाप्रभु यांची नावे वृंदावनशी कायमची जोडली गेली आहेत.

३. वृंदावनमध्ये भेट देण्याची ठिकाणे -
असे एक शहर आहे जेथे हजारो लहान-मोठी मंदिरे आहेत.  वर्षभर पर्यटक येथे येत असतात.  वृंदावनमध्ये कोणती ठिकाणे पाहाण्यासारखी आहेत त्याचे वर्णन खालील प्रमाणे .

१ .१ बांकेबिहारी मंदिर वृंदावन

वृंदावनमध्ये स्थित हे मंदिर श्रीकृष्णाला समर्पित देशातील एक अत्यंत पूजनीय मंदिर आहे.  हे मंदिर राजस्थानी शैलीने बांधले गेले आहे आणि भगवान बाल कृष्णाची प्रतिमा मंदिरात दिसते.  जेव्हा तुम्ही वृंदावन भेटायला जाता तेव्हा बांकेबिहारी मंदिर पहायला विसरू नका.

३ .२ प्रेम मंदिर वृंदावन धाम

वृंदावनात हे भव्य धार्मिक मंदिर राधा कृष्ण आणि सीता राम यांना समर्पित आहे.  पांढर्‍या संगमरवरी वस्तूंनी निर्मित आणि अतिशय कोरीव मूर्तींनी बांधलेले हे मंदिर वास्तुशिल्पिक सौंदर्यासाठीही प्रसिद्ध आहे.  जेव्हा तुम्ही वृंदावनला भेटायला जाता तेव्हा प्रेम मंदिर पहायला विसरू नका.

3.3 इस्कॉन मंदिर वृंदावन

हे श्रीकृष्ण बलराम मंदिर म्हणूनही ओळखले जाते.  भक्तिवंत स्वामी प्रभुपाद यांच्या सूचनेवरून हे मंदिर 1975 मध्ये बांधले गेले होते.  वृंदावनमध्ये वसलेले हे भव्य मंदिर पाहण्यासारखे आहे.  जेव्हा तुम्ही वृंदावन धाम भेट देता तेव्हा इस्कॉन मंदिरात जाण्यास विसरू नका.

३ .४श्री राधा रमण मंदिर वृंदावन

हे मंदिर गोपाळ भट्ट गोस्वामी यांनी १५४२ मध्ये बनवले होते.  या मंदिरात राधाची  मुर्ती नाही, फक्त श्रीकृष्णाजवळ ठेवलेला मुकुट राधा दाखवते.  वृंदावन धाम येथे जात असताना श्री राधा रमण मंदिरास भेट देण्यास विसरू नका.

३ .५ गोपेश्वर महादेव मंदिर वृंदावन उत्तर प्रदेश

हे मंदिर भगवान शिव यांना समर्पित आहे आणि कृष्ण भगवान ला  गोपी च्या  रूपात  दाखवले आहे.  भाविक शिवलिंगावर यमुनेचे पवित्र पाणी आणून वाहतात ..  वृंदावन धामच्या मंदिरात हे मंदिर पाहण्यासारखे आहे.

३ .६  शाहजी मंदिर वृंदावन धाम

१८७६ मध्ये शाह कुंदन लाल यांनी शहाजी मंदिर बांधले होते.  हे भगवान श्रीकृष्णाला समर्पित आहे.  संगमरवरी दगडाने  बनवलेल्या या मंदिराचे मुख्य देवतास छोटे राधा रामण म्हणून ओळखले जातात.

३ .७ श्री रघुनाथ मंदिर

हे मंदिर भगवान विष्णू आणि त्यांची पत्नी लक्ष्मी यांना समर्पित आहे.  हे वृंदावनमधील सर्वात मोठे मंदिर आहे आणि त्याभोवती उंच भिंती आहेत.

३ .८ कात्यायनी शक्तीपीठ वृंदावन

कात्यायनी पीठ मंदिर शक्तीपीठांपैकी एक आहे आणि उमा शक्तीपीठ म्हणून ओळखले जाते.  हे वृंदावनमधील भुतेश्वर महादेव मंदिरात आहे.  वृंदावन धामच्या मंदिरात हे मंदिर पाहण्यासारखे आहे.

याशिवाय वृंदावनमध्ये बरीच ठिकाणे पाहायला मिळतात.  श्री राधा दामोदर मंदिर, मदन मोहन मंदिर, पागल बाबा मंदिर, कुसुम सरोवर, बरसाना, सेवा कुंज, केसी घाट, जयपूर मंदिर, यमुना नदी, श्री वृंदा कुंड इत्यादी ठिकाणे दिसू शकतात.  जर तुम्हाला पुजा पाठाची आवडत असतील तर वृंदावनमध्ये या ठिकाणांना भेट देणे खूप आनंददायक असेल.

४ . वृंदावनला भेट देण्यासाठी उत्तम वेळ -
वृंदावन हे हिंदूं साठी सर्वाधिक भेट दिले जाणारे  तीर्थक्षेत्र आहे.  इथले हवामान उत्तर भारतातील इतरांसारखेच आहे.  जानेवारी ते मार्च आणि ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत वृंदावनला भेट देण्याचा उत्तम काळ मानला जातो.  या महिन्यांमधील हवामान सौम्य आणि आनंददायी आहे आणि वृंदावनच्या प्रेक्षणीय स्थळांना भेट देण्याचा हा एक योग्य वेळ आहे.

५ . वृंदावन कसे पोहोचाल -

वृंदावन येथे थेट पोहोचण्याची सुविधा नाही.  प्रथम आपल्याला त्याच्या जवळील स्टेशन, विमानतळ आणि बस स्टँडवर पोहोचावे लागेल. तेथुन  वृंदावनला पोहोचण्यासाठी खालिल पर्याय उपलब्ध आहेत .

विमानाने वृंदावन धाम कसे जाल  -

वृंदावनला सर्वात जवळचे विमानतळ म्हणजे आग्रामधील खेरिया विमानतळ जे वृंदावनपासून ५३ कि.मी. अंतरावर आहे.  हे विमानतळ हवाई मार्गाने देशातील प्रमुख शहरांशी जोडले गेले आहे.  येथे पोहोचल्यानंतर आपण बस किंवा टॅक्सीद्वारे वृंदावनला पोहोचू शकता.

रेल्वेने वृंदावन धाम कसे जाल  -

वृंदावनमध्ये रेल्वे स्टेशन नाही.  सर्वात जवळचे रेल्वे स्थानक मथुरा येथे आहे, जे वृंदावनपासून १० किमी अंतरावर आहे.  मथुरा कॅंट आणि मथुरा जंक्शन येथुन  नियमित गाड्या धावतात.  स्टेशनवर पोहोचल्यानंतर टॅक्सी किंवा मोटार रिक्षाने वृंदावन धाम गाठता येते.

वृंदावन धाम बसने कसे जाल  -

देशातील मोठया शहरांमधून थेट वृंदावनला जाणारा कोणताही बस मार्ग नाही.  इथला सर्वात जवळचा बसस्थानक मथुरा आहे, जो वृंदावनपासून १० किमी अंतरावर आहे.  येथे आपण दिल्लीहून बसने येऊ शकता.  याशिवाय भरतपूर व राजस्थान हे मथुरापासून ४५ कि.मी. अंतरावर आहेत जिथून नियमित बस येतात. मथुरा बसस्थानक येथे आल्यावर त्यानंतर ऑटो रिक्षा किंवा टॅक्सीने वृंदावनला जाता येते.

६ .वृंदावनमध्ये कोठे रहायचे -

ब्रज भूमी असल्यामुळे वृंदावनमध्ये नेहमीच बरीच पर्यटक असतात म्हणून येथे मुक्काम करण्याचे बरेच पर्याय आहेत.  येथे हॉटेल तसेच अतिथीगृह आहे जेथे पर्यटक आणि यात्रेकरू आराम करू शकतात.  वृंदावन येथे कृधा रेसिडेन्सी द बुटीक हॉटेल, हॉटेल संतोष धाम, वृंदा पॅलेस सेवा धाम, हॉटेल बसरा वृंदावन, हॉटेल गीत गोविंद, हॉटेल देव रेसिडेन्सी इ.  या हॉटेलमध्ये सर्व प्रकारच्या सुविधा आहेत.  येथे प्री बुकिंगही केले जाते.  तुमच्या सोयीनुसार तुम्ही बुकिंग करू शकता.

वृदावन ची गुगल पिन

https://maps.app.goo.gl/Q3T5Nz3K4t19J4DX9

वृदावन ची माहिती देणारा युट्युब .

https://youtu.be/qJSCRC4-Yyo

विनंती :- आपणास माहिती कशी वाटली प्रतिक्रिया जरुर द्या अन सदर ब्लॉग / फेसबुक पेज आपल्या मित्र परीवारात पण शेअर करा . 

शैलेश चौधरी(Shailesh Choudhari)

( माहिती संकलक / ब्लॉगर / पर्यटण व्यवसायिक )
Blogger and Travel agent

९७६७५ ९१६७५

[Mobile number +919767591675]
WhatsApp number +918888741797

Languages :- Marathi,  Hindi and little bit English.

email address :-

travelbirdindia@yahoo.com

Can Contact between:-

9a.m. to 9 p.m. ( Indian standard time )
Use Google Translate App. or web site to read this artical in your own language . Use Marathi as source language and translate  it in your own language.

पर्यटण एक चळवळ

पर्यटण विषयास वाहिलेला मराठी ब्लॉग

आमच्या फेसबुक पेज ला भेट द्या .
Visit our Facebook page

Travelbirdindia

आम्हाला व्टिटर वर फॉलो करा .
Follow me on Twitter

https://mobile.twitter.com/Shailesh1881975

संदर्भ :- विकीपिडिया , इंटरनेटवरील विविध लेख , गुगल मॅप व यु ट्युब

Wednesday, August 21, 2019

शिर्डीचे साईबाबा ( Saibaba , Shirdi)


शिर्डीचे साईबाबा










साईबाबा (इ.स. १८५६ – १५ ऑक्टोबर, १९१८) एक भारतीय फ़कीर होते.   अहमदनगर  जिल्ह्यातील   राहाता तालुक्यातील शिर्डी ह्या गांवात त्यांचे वास्तव्य असल्यामुळे त्यांना ‘शिर्डीचे साईबाबा’ म्हणूनही ओळखले जाते. येथूनच बाबांनी सर्वांना श्रद्धा व सबुरी हा महामंत्र दिला. शिर्डीस आल्यावर प्राप्त होणारी मनःशांती व मिळणारा आत्मविश्वास यामुळे शिर्डी हे भारतासह जगभरातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान बनले आहे.
साईबाबा हे मोमीन वंशीय मुस्लिम होते असेही मानण्यात येते. जेव्हा पहिल्यांदा त्यांना म्हाळसा पतींनी पाहिले तेव्हा साई अशी हाक मारली कारण त्यावेळी मराठी-उर्दू-फारशी मिश्रित भाषा लोक वापरीत असत, साई चा अर्थ 'फकीर' किंवा 'यवनी संत' असा आहे. साईबाबांसाठी हिंदू - मुस्लिमांच्यासह सर्व लोक समान होते. त्यांनी धर्मनिरपेक्षतेची शिकवण दिली. “सबका मालिक एक” हे साईंचे बोल होते.

साईबाबांचे वास्तव्य व उत्तरकालीन मंदिर

साईबाबा हे वयाच्या १६ व्या वर्षी शिर्डीला आले. साईबाबालोकांना प्रथम दिसले तेव्हा ते कडुलिंबाच्या झाडाखाली बसलेले होते. तेव्हापासून ते नित्य नियमाने पाच घरी भिक्षा मागत. ते प्रथम द्वारकामाई नावाच्या पडक्या मशिदीत बसत होते व त्यानंतर चावडीत जात. श्री साईबाबाचे द्वारकामाईत ६० वर्षे वास्तव्य होते. मंगळवारी दसऱ्याच्या दिवशी १५ ऑक्टोबरइ.स. १९१८ रोजी साईबाबांनी समाधी घेतली.

साईबाबांच्या समाधीनंतर त्यांच्या भक्तांनी शिर्डीस मंदिर उभारले. या मंदिरामुळे शिर्डीस धार्मिक क्षेत्राचे महत्त्व आले असून दररोज हजारो भाविक साईबाबा मंदिरास भेट देण्यासाठी शिर्डीस येतात.दिवसेंदिवस भाविकांची संख्येत वाढ होत आहे.

शिर्डीच्या मंदिर

आयुष्यभर फकिराचे जीवन जगलेल्या साईबाबांच्या नावाने काढलेल्या संस्थानची झोळी जगभरातील लाखो भाविकांच्या दातृत्वामुळे भरली आहे. बाबांच्या नावाने सुरू करण्यात आलेले हे संस्थान करोडपती बनले आहे़. साईबाबांच्या मूर्तीवर दीड कोटींच्या हिरेजडित सुवर्ण मुकुटासह कोट्यवधींची आभूषणे घालण्यात येतात.

कार्य

साईबाबांनी भिक्षा मागून उदरनिर्वाह केला. आयुष्यभर त्यांनी सबका मलिक एक हाच उपदेश केला. ते नेहमी अल्लाह मलिक असेही म्हणायचे.

भक्त समुदाय

साईबाबांचे भक्त भारतात आणि भारताबाहेरही फार मोठ्या प्रमाणात आहेत. ठिकठिकाणी बाबांची मंदिरे उभारण्यात आली आहेत. त्यांच्या भक्तांच्या म्हणण्यानुसार ते अवतारी पुरुष होते. कुणी त्यांना दत्ताचा अवतार मानत तर कुणी विष्णूचा कुणी शिवाचा. बाबांच्या भक्त समुदायात सर्वच जातीधर्मांच्या लोकांचा समावेश होतो. यामध्ये प्रामुख्याने हिंदू व मुस्लिम धर्मीय आहेत. मुस्लिम धर्मातही सुफी संतांमध्ये साई बाबांना मानाचे स्थान आहे.

साई बाबा आणि स्वामी स्वरूपानंद
जून २०१४ मध्ये द्वारका आणि ज्योतिष पीठाचे शंकराचार्य असलेले जगद्गुरू स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांनी मात्र साई बाबांच्या पूजेला आपला विरोध दर्शवला. कारण त्यांच्या मतानुसार साई हे ईश्वर वा अवतार नसून एक सर्वसामान्य मनुष्य होते. त्यानंतर शिर्डी व काही ठिकाणी साई बाबांच्या भक्तांनी शंकराचार्यांच्या विरोधात निदर्शने केली.
साईबाबा हे मुस्लिम फकीर नसून ते जन्माने ब्राम्हण होते, त्यामुळे ते हिंदूच आहेत. असा दावा कांदिवलीच्या साईधाम चॅरिटेबल ट्रस्टने सप्टेंबर २०१४ मध्ये उच्च न्यायालयात दाखल केला होता. त्यांचा जन्म परभणी जिल्ह्यातील पाथरी या गावात २७ सप्टेंबर १८३७ रोजी दुपारी सव्वा बारा वाजता झाला, असे त्यांचे म्हणणे आहे. साईबाबांच्या आईवडिलांनी बालपणी त्यांना मुस्लिम फकिराने केलेल्या आग्रहावरून त्यांच्या हवाली केले. पण नंतर त्या फकिराने साईबाबांना वेकुंशा नावाच्या हिंदू गुरूकडे सोपवले. साईबाबा यांचे खरे नाव हरिभाऊ आहे. याबाबत सबळ पुरावे असल्याचा दावाही साईधाम चॅरिटबल ट्रस्टच्या वतीने करण्यात आला आहे .

साईबाबा संस्थान

साईबाबा संस्थान, शिर्डी हे  महाराष्ट्रातील  अहमदनगर जिल्ह्याच्या शिर्डी येथील श्री साईबाबांच्या समाधी मंदिराचे कामकाज पाहणारे व साईबाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना सोयीसुविधा पुरविणारी संस्था आहे. या संस्थानाकडून इतरही अनेक समाजोपयोगी कामे केली जातात. याची स्थापना दिनांक १३ फेब्रुवारीइ.स. १९२२रोजी  अहमदनगरच्या   सिटी सिव्हील कोर्टाकडून झाली. शिर्डी संस्थानची स्थापना झाल्यावर २८ मे १९२३ रोजी संस्थानने काही तुटलेली तांब्या-पितळेची भांडी व चांदीच्या दोन ताटल्या मोडून बाबांच्या आरतीसाठी तबक बनवले होते़. आज २०१५ साली, बाबांचे सिंहासन व मंदिराच्या शिखरासह रोजच्या पूजेतील वापराच्या जवळपास सर्वच वस्तू सोन्याच्या आहेत़.
शेवटच्या ९२ वर्षांतील संस्थानचा ताळेबंद आश्चर्यकारक आहे़ १९२३ साली संस्थानच्या इंपीरियल बँकेच्या बचत खात्यात केवळ १,४४५ रुपये ७ आणे व ६ पैसे होते़. आज २०१५ साली, पंधरा राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये संस्थानचे १,४८३ कोटी रुपये ठेवीच्या स्वरूपात आहेत़. या वर्षी ठेवींवर संस्थानला निव्वळ व्याजापोटी ९९ कोटी रुपये मिळाले़. संस्थानची स्थावर मालमत्ता पाचशे कोटींवर आहे़
याशिवाय वापरातील सोन्यासह जवळपास ३८० किलो सोने, चार हजार किलो चांदी आणि सात कोटींची हिरेमाणके तिजोरीत आहेत़.

सभा

साईबाबा संस्थानची पहिली सभा दासगणू यांच्या अध्यक्षतेखाली संस्थानच्या स्थापनेनंतरच्या पहिल्या  रामनवमीला  म्हणजेच दिनांक ६ एप्रिल, इ.स. १९२२ रोजी झाली होती.

प्रसादालय

५,५०० च्या आसन क्षमतेचे जेवणाचे हॉल, ज्यामुळे दररोज १०,००,००० भाविकांना खाणे शक्य होते.
श्री साईबाबा संस्थान ट्रस्ट शिर्डी येथे येणाऱ्या या यात्रेकरूंना खाण्यासाठी दरवर्षी सरासरी १९० दशलक्ष रुपये खर्च करते.

मंगळवारी २४० दशलक्ष रुपये खर्चून बांधलेल्या याप्रसादालयाचे उद्घाटन राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्या हस्ते मंगळवारी करण्यात आले. हे संकुल ५.५ एकर जागेवर बांधले गेले असून १,००० चौरस फूट अंगभूत क्षेत्र आहे. हे मुख्य साई बाबा मंदिरापासून ७०० मीटर अंतरावर आहे.

तळ मजल्यावर एक विशाल हॉल तयार करण्यात आला आहे, ज्यामध्ये 3,,500०० भाविक बसू शकतात. पहिल्या मजल्यावरील प्रत्येकी १,००० बसण्याची क्षमता असणारी दोन स्वतंत्र हॉल बांधली गेली आहेत.

हॉलला पुरेसे नैसर्गिक प्रकाश देण्यासाठी पॉली कार्बोनेट आणि मंगलोरियन टाईल्सचे बनविलेले चौदा घुमट बांधले गेले आहेत, जेणेकरून दिवसाच्या सुर्य प्रकाश आत येईल .

संस्थानमध्ये दिले जाणारे जेवण अनुदान स्वरूपात अल्प दर आकारून दिले जाते . भाज्या ताजी ठेवण्यासाठी प्रचंड रेफ्रिजरेटिंग रूम तयार करण्यात आल्या आहेत. बहुतेक स्वयंपाक सौर ऊर्जेने केले जाईल. स्वच्छतेला प्रथम प्राधान्य देऊन सर्व स्वयंपाक आधुनिक मशीनद्वारे केले जातील.

ट्रस्टच्या मते, आंध्र प्रदेशातील तिरुपतीनंतर शिर्डी हे भारतातील सर्वाधिक भेट दिलेल्या तीर्थस्थळांपैकी एक बनले आहे. सर्वसाधारण दिवशी सुमारे २०,००० भाविक शिरडीला भेट देतात तर उत्सवाच्या काळात ही संख्या जवळपास  १०,००,००० पर्यंत वाढते.
पूर्वीच्या जेवणाच्या हॉलमध्ये एकत्रितपणे 1,000 लोकांची क्षमता होती.

प्रसाद मध्ये डाळ, तांदूळ, चपाती, दोन भाज्या आणि एक गोड असा साधा महाराष्ट्रीयन भोजन देण्यात येतो. ज्या यात्रेकरूंना पैसे देणे परवडत नाही त्यांच्यासाठी आणखी एक हॉल आहे, ज्यामध्ये 150 लोकांची क्षमता आहे आणि ट्रस्ट विनामूल्य भोजन देते.

प्रसादालय सकाळी १० ते रात्री १० या वेळेत खुले असते. प्रथम साईबाबांना भोजन दिले जाते आणि नंतर भाविकांना दिले जाते.

इतिहास

शिर्डी हा शिलधी या शब्दाचा अपभ्रंश आहे असे समजले जाते.

शिर्डीस जाण्याचा योग्य वेळ

वर्षातील कुठल्या हि दिवशी शिर्डीला जाता येते . परंतु महत्त्वाचे सण अथवा जोडून येणाऱ्या सुट्टयांचे दिवस टाळून जावे कारण या दिवसांत लाखो लोक दर्शनास येतात .

दर्शन व्यवस्था

शिर्डीस दोन प्रकारच्या दर्शन व्यवस्था आहेत . एक मुक्त दर्शन व दुसरे सशुल्क दर्शन . दोन्ही प्रकारच्या दर्शनास तेथिल काउंटर वर नोंदणी करणे गरजेचे असते . नोंदणी झाल्यावर आपणास एक पावती दिली जाते, ज्यात तुमचा फोटो ( जो काउंटरलाच काढतात ) , बारकोड व आपल्या दर्शनाची वेळ व कुठल्या प्रवेशदाराने आपणास दर्शनास जायचे त्याचा क्रमांक याची नोंद असते .

विशेष सुचना : आपणास दिलेल्या वेळेतच आपणास प्रवेशद्वारातून प्रवेश दिला जातो . आपणास उशिर झाल्यास आपणास परत नव्याने वरिल सर्व प्रक्रिया करावी लागतं

निवास व्यवस्था

शिर्डी संस्थानचे स्वतःचे सुसज्ज भक्त निवास आहे . जे भाविक १ दिवसाच्या भेटिस येतात त्यांच्या स्नानासाठी संस्थान तर्फे अल्पदरात गरम पाणी व स्नानगृहाची व्यवस्था केली आहे . सोबत कॉल्करूम ची पण व्यवस्था आहे .

शिर्डीत प्रत्येकाच्या गरजे प्रमाणे सेवा देणारी अनेक खासगी लॉज व तारांकित हॉटेल आहेत .

शिर्डीस कसे जाल .

शिर्डी रस्तेमार्गाने देशातील मुख्य शहरांशी जोडले आहे . विविध शहरांतून शिर्डीस शासकिय अथवा खासगी बस ची चांगली व्यवस्था आहे .

शिर्डी येथे रेल्वे स्टेशन आहे . आपल्या शहरातून तेथे थेट रेल्वे सेवा आहे का याची चौकशी करावी . त्याचा स्टेशन कोड (SNSI) असा आहे . ज्यांच्या शहरांतून थेट सेवा नाहि त्यांच्यासाठी शिर्डी पासून १५ कि. मी . अंतरावरील दौंड - मनमाड रेल्वे मार्गावरील कोपरगाव स्टेशन  सोईचे आहे . त्याचा स्टेशन कोड (KPG) असा आहे .

शिर्डी येथे स्वतःचे विमानतळ असून भारतातील काहि शहरांतून येथे नियमित विमान सेवा आहे . शिर्डी पासून जवळचे आंतरराष्ट्रीय विमानतळ पुणे व मुंबई हे आहेत .

शिर्डीची गुगल पिन

Sai Baba Samadhi Mandir
Mauli Nagar, Shirdi, Maharashtra 423109
02423 258 500

https://maps.app.goo.gl/Ty7wkHiw96RhLaWA9

शिर्डीचे वर्णन करणारा युट्युब व्हिडिओ

https://youtu.be/XLyO5Hwaql8

साईबाबांच्या जिवनावरील चित्रपट

https://youtu.be/O_5NS4-K4aY

विनंती :- आपणास माहिती कशी वाटली प्रतिक्रिया जरुर द्या अन सदर ब्लॉग / फेसबुक पेज आपल्या मित्र परीवारात पण शेअर करा .  

शैलेश चौधरी(Shailesh Choudhari)
( माहिती संकलक / ब्लॉगर / पर्यटण व्यवसायिक )
Blogger and Travel agent
९७६७५ ९१६७५

[Mobile number +919767591675]
WhatsApp number +918888741797
Languages :- Marathi,  Hindi and little bit English.
email address :-
travelbirdindia@yahoo.com
Can Contact between:-
9a.m. to 9 p.m. ( Indian standard time )
Use Google Translate App. or web site to read this artical in your own language . Use Marathi as source language and translate  it in your own language.

पर्यटण एक चळवळ

पर्यटण विषयास वाहिलेला मराठी ब्लॉग

आमच्या फेसबुक पेज ला भेट द्या .

Visit our Facebook page
Travelbirdindia

आम्हाला व्टिटर वर फॉलो करा .
Follow me on Twitter

https://mobile.twitter.com/Shailesh1881975

संदर्भ :- विकीपिडिया , इंटरनेट , गुगल मॅप व यु ट्युब

Tuesday, August 20, 2019

श्री गजानन महाराज ( शेगाव ) Shri. Gajanan Maharaj ( Shegoan)


श्री गजानन महाराज ( शेगाव )












श्री गजानन महाराज हे तेलंगी ब्राह्मण होते अशी एक वदंता होती. त्याचे कारण म्हणजे श्री बिरुदुराजू रामराजू नावाच्या एका लेखकाने "आंध्रा योगुलु" नावाच्या पुस्तकात श्री महाराज हे तेलंगी ब्राह्मण असल्याचे लिहिले आहे.
परंतु २००४ साली प्रकाशित झालेल्या "श्री गजानन महाराज चरित्र कोश" ह्या दासभार्गव नावाच्या लेखकाने (लेखकाने शेगावात राहून आठ वर्षांच्या संशोधनानंतर हे पुस्तक प्रकाशित केले, असे समजते) लिहिलेल्या पुस्तकात ह्या वदंतेचे व्यवस्थित स्पष्टीकरण दिले आहे.
इ.स. २००३ मध्ये ह्या दासभार्गव नावाच्या लेखकाची १२९ वर्षे वय आहे असे सांगणार्‍या शिवानंद सरस्वती नावाच्या सत्पुरुषाशी नाशिकक्षेत्री भेट झाली, त्यावेळी सरस्वतींनी त्यांना १८८७ साली अगदी तरुणपणी गजानन महाराजांची आणि त्यांची नाशिकक्षेत्रीच भेट झाल्याचे सांगितले. शिवानंद सरस्वती हे तमिळनाडूमधील तिरुनेलवेल्लीहून आल्याचे लेखकाने लिहिले आहे. तसेच लेखकाने हेही स्पष्ट केले आहे की गजानन महाराज शेगावी प्रकट झाल्यानंतरही शिवानंद सरस्वती २५-३० वेळा त्यांना भेटावयास आले होते. अशा प्रत्येक वेळी ते अमरावती येथील श्रीयुत खापर्डे ह्यांच्या घरी राहत. शिवानंद सरस्वतींचा उल्लेख श्री बा.ग. खापर्डे ह्यांनी "श्री गजानन विजय" ह्या ग्रंथाच्या प्रस्तावनेत केला आहे.
कालांतराने शिवानंद सरस्वती तपश्चर्येकरिता हिमालयात निघून गेले आणि त्यानंतर ते प्रदीर्घ काळ कोणासही दिसले नाहीत. हा सर्व तपशील ’गजानन महाराज चरित्र कोश’ या दासभार्गव-लिखित ग्र्ण्थात पृष्ठ ३६२-३६५ दरम्यान आला आहे. ह्यावरून एक गोष्ट मात्र निश्चित होते आणि ती म्हणजे की श्री गजानन महाराज हे तेलंगी ब्राह्मण नव्हते. ते कोणीही असले तरी ते उत्तम प्रकारे वेदपठण करीत, तसेच त्यांना वेदश्रवणदेखील फार आवडे, हे सत्य असावे.
माघ वद्य ७ शके १८००, (२३ फेब्रुवारी १८७८) या दिवशी १८ वर्षाचे गजानन महाराज शेगांव जि. बुलढाणा येथे दिगंबरावस्थेत लोकांच्या दृष्टीस पडले. त्या वेळी ते देवीदास पातुरकरांच्या मठाबाहेर उष्ट्या पत्रावळीतील शिते उचलून खात होते. ह्या संदर्भात दासगणूंनी लिहिले आहे, "कोण हा कोठीचा काहीच कळेना | ब्रह्माचा ठिकाणा कोण सांगे | साक्षात ही आहे परब्रह्ममूर्ती | आलीसे प्रचिती बहुतांना ||"
बंकटलाल आगरवाल ह्याला महाराजांचे प्रथम दर्शन झाले ते असे, "दंड गर्दन पिळदार | भव्य छाती दृष्टी स्थिर | भृकुटी ठायी झाली असे ||." जेव्हा बंकटलालने त्यांना जेवणाविषयी विचारले त्यावेळी महाराजांनी नुसतेच शून्य दृष्टीने त्याच्याकडे पाहिले. कारण महाराज त्यावेळी तुर्या (जागृति म्हणजे जागे असणे, सुषुप्ति म्हणजे झोपणे आणि स्वप्नावस्था ह्या तीन अवस्थांच्या पलीकडील स्थितीस तुर्या अवस्था अथवा व्रह्मस्थिति अथवा सहजसमाधि असे म्हणतात) अवस्थेत होते. महाराज एक महान आणि असामान्य असे योगी आहेत असे बंकटलालला वाटले आणि त्याने त्यांना स्वगृही आणले.
गजानन महाराज हे फार मोठे संत आहेत अशी भावना मनी धरणार्‍या भक्तांनी बंकटलालाचे घर दुमदुमून गेले. काही महिने गजानन महाराज बंकटलालाकडे राहिले आणि त्यानंतर त्यांनी त्यांचे वास्तव्य तिथून हटवून गावातील मारुतीच्या मंदिरात आणले.

श्री गजानन महाराज हे अत्यंत परमोच्च स्थितीला पोहोचलेले असे ब्रह्मवेत्ते महान संत होते आणि त्यांचे जीवन हे एक मोठे गूढच होते. ते विदेही स्थितित वावरणारे असे परमहंस संन्यासी असून जीवनमुक्त होते. भक्तांचा उद्धार करण्याची त्यांची स्वतःचीच एक विशिष्ट अशी शैली होती. काहीच न बोलता ते सर्व काही बोलून जात आणि काहीच न सांगता ते सर्व काही सांगून जात, असा त्यांच्या भक्तांचा अनुभव होता. भक्तांवर असीम अशा कृपेचे छत्र धरून ते भक्तांच्या ह्रदयात घर करत असा सर्व भक्तांचा अनुभव होता. "गण गण गणात बोते," हा त्यांचा आवडता मंत्र, ज्याचा ते अखंड ते जप करित. या मंत्राशिवाय ते उभ्या आयुष्यात काहीही बोलले नाहीत. त्यामुळेच त्यांना 'गिणगिणेबुवा' 'गजानन महाराज' अशी नावे पडली. वर्‍हाडातील भक्त त्यांना प्रेमाने 'गजानन बाबा' म्हणतात. दासगणूंनी ह्या संदर्भात लिहिले आहे, "मना समजे नित्य | जीव हा ब्रह्मास सत्य | मानू नको तयाप्रत | निराळा त्या तोचि असे ||." ह्या मंत्राचा अर्थ असा आहे की जीव आणि ब्रह्म हे एकच आहेत आणि त्यांना निराळे समजू नये.

शरीरयष्टी

सहा फुटी सडसडीत शरीरयष्टी, रापलेला तांबूस वर्ण, तुरळक दाढी व केस, वस्त्रविहीन शरीर आणि गुडघ्यापर्यंत पोचणारे हात यातून साकारते ती श्रीगजानन महाराजांची देह चर्या. लांब लांब पावले टाकीत सदान्‌कदा घाईघाईत धावल्याप्रमाणे भासणारी चालगती, पाय अनवाणी आणि हाती असलीच तर एखादी चिलीम व तिला छापी (कपडा) गुंडाळलेली असे..

अन्नसेवन

महाराजांची अशी मूर्ती लगबगीने एखाद्याच्या घरात घुसत असे किंवा अंगणात ओसरीवर मुक्काम ठोकीत असे. मग घरधन्याने भाकरतुकडा दिला तर खावे अन्यथा तो तसाच ठेवून पुढील मुक्कामी पळावे, अशी त्यांची बालसुलभ वृत्ती होती.
महाराजांना झुणका भाकरीसोबतच  मुळ्याच्या शेंगाहिरव्यामिरच्या ,  पिठीसाखर अतिशय आवडत असे. कधी कधी अमर्यादपणे चित्रविचित्र खावे तर कधी तीन-चार दिवस उपाशी राहावे अशी त्यांची रीत होती. भक्तांकडून येणारे पंचपक्वान्नाचे ताट असो वा कुणी कुत्सितपणे दिलेला वाटलेल्या मिरच्यांचा गोळा असो, प्रसन्न भावाने त्याचेही ते सेवन करीत. गरीबाघरी जे अन्न सहजपणे उपलब्ध होऊ शकेल अशाच प्रकारचे अन्न म्हणजे ज्वारीची भाकरी, अंबाडीची भाजी, पिठले असे पदार्थ महाराज आवडीने खात. म्हणूनच आजही महाराजांच्या भंडार्‍यासाठी इतर पक्वांनांव्यतिरिक्त ज्वारीची भाकरी, पिठले आणि अंबाडीची भाजी अवश्य करतात. कुठेही बेधडकपणे घुसून पाणी प्यावे, नाहीतर ओहोळातच ओंजळी ओंजळीने पाणी पिऊन तहान शमवावी, असे त्यांचे वर्तन असे.
मुळ्याच्या शेंगा, हिरव्या मिरच्या, पिठीसाखर हे पदार्थ कोणी आणून दिले की ते लहान बालकाप्रमाणे हरखून जात. मग या पदार्थांचे ढीग रचणे वा त्यांचे लहानलहान वाटे करणे यासारख्या बाललीलांमध्ये ते गुंग होऊन जात. महाराजांना चहाविषयी विलक्षण प्रेम होते . चांदीच्या मोठ्या वाडग्यातून मिळणारा गरमागरम चहा पाहून ते खुलत असत.

भक्तगण

हरी पाटील, बंकटलाल आगरवाल, पितांबर, बाळाभाऊ प्रभू, बापुना काळे, भाऊसाहेब कवर, पुंडलीक भोकरे, बायजाबाई, भास्कर पाटील हे महाराजांचे काही श्रेष्ठ भक्त होते. बंकटलालाच्या घरून ते वेगाने निघून गेल्याने, बंकटलालाचे मन गुरुमहाराजांच्या भेटीकरिता तळमळू लागले. महाराज त्याला पुन्हा शिवमंदिराजवळ भेटले.

हरी पाटील - हरी पाटील हे महाराजांचे अत्यंत जिव्हाळ्याचे आणि अंतरंगातील भक्त होते असे म्हणणेच सार्थ ठरेल; कारण महाराजांची गूढ भाषा केवळ त्यांनाच समजत असे. हरी पाटलांची भक्ती रांगडी होती, परिपूर्ण शुद्धता, पूर्ण समर्पण आणि अत्यंत जिव्हाळ्याच्या प्रेमाने गाढ अशी ती भक्ती होती, तिथे दांभिकता आणि खोटेपणा ह्या गोष्टींना किंचितही थारा नव्हता. परंतु ह्या सर्व गोष्टी काही एका क्षणात घडल्या नाहीत. महाराज शेगांवात प्रकट झाल्यावेळी सर्वच पाटील बंधु अत्यंत मग्रूर आणि धनशक्तीने बेधुंद झालेले होते, सर्व प्रकारचे वैभव, धनसंपत्ती, गिरण्या पेढ्या व दुकाने असल्याकारणाने ते कोणालाही हवे ते बोलत आणि लोकही त्यांच्याशी शक्तीत तुल्यबळ नसल्याने सर्व गोष्टी शांतपणे सहन करीत. महाराजांचीही ते सर्वजण पुष्कळ चेष्टामस्करी व निंदानालस्ती करीत, परंतु महाराज अत्यंत कृपाळू असल्याने ह्या गोष्टींकडे पूर्णपणे दुर्लक्ष करीत. एकदा हरी पाटलांनी जेव्हा महाराजांना तालमीत येऊन स्वतःसोबत कुस्ती खेळण्याचे आवाहन केले त्यावेळी महाराज तालमीत जाऊन बसले आणि त्यांनी हरी पाटलाला त्यांना उठविण्यास सांगितले. नानाप्रकारचे पेच आणि सर्व ताकद वापरुनही जेव्हा हरी महाराजांना उठवू शकला नाही त्यावेळी त्याचा अहंकार नष्ट झाला आणि त्या दिवसापासून तो महाराजांना पूर्णपणे शरण गेला. जेव्हा महाराजांनी स्वतःच्या समाधीची जागा स्वतःच ठरविली त्यावेळी ते सर्व भक्तांना सोडून त्या जागी (ज्या जागेला त्यावेळी गाढवभुंकी असे म्हणत कारण त्या जागेवर कुंभारांची सर्व गाढवे चरण्यास जात असत) अचानक जाऊन बसले. भक्तांना काय करावे हे सुचेना व महाराज तर ती जागा सोडून येईनात. शेवटी त्यांनी हरी पाटलांना बोलावले. हरी पाटील जवळ जाऊन प्रेमळपणे महाराजांना म्हणाले, "महाराज, ही जागा अशुद्ध आहे, आपण मठात चलावे." त्यावर सदगुरु म्हणाले, "येथे राहील रे!" त्यावर हरी पाटलांना समजले की महाराजांनी स्वतःच्या समाधीकरिता ती जागा निवडली आहे. समाधी घेण्यापूर्वी महाराज एकदा हरी पाटलांना घेऊन पंढरपुरास गेले असता, त्यांनी स्वतःच स्वतःच्या समाधिदिनाबद्दल त्याला माहिती दिली. महाराजांच्या समाधिनंतर हरी पाटलांच्या दु:खाला पारावार राहिला नाही, म्हणूनच "श्री गजानन विजय" ह्या पोथीमध्ये छापलेल्या त्यांच्या फोटोमध्येसुद्धा त्यांच्या चेहर्‍यावर शोककळा दिसून येते. महाराजांच्या समाधिनंतर त्यांनी काही वर्षांतच म्हणजे १९१७ साली देह विसर्जित केला.

बाळाभाऊ प्रभु - महाराजांच्या आवडत्या भक्तगणांमधील एक. बाळापुरातील आत्माराम भिकाजी ह्यांचा भाचा म्हणजेच महाराजांचे परमभक्त श्री बाळाभाऊ प्रभु होत. "उपास्यापदी भाव उपासके ठेवावा" ह्या उक्तीप्रमाणे त्यांनी त्यांचे उपास्य दैवत म्हणून गजानन महाराजांचे चरणी पूर्ण श्रद्धाभाव अर्पण केला व ते मुंबई व तेथील त्यांच्या समस्त कुटुंबीयांना सोडून कायमचेच सद्‌गुरूंच्या चरणी सेवेस सादर झाले. स्वतः महाराजांनी त्यांचा भक्तिभाव शुद्ध असल्याचे शाबीत करून भास्कर पाटील ह्याचा संशय दूर केला आणि बाळाभाऊंना स्वत़:च्या अंतरंगातील एकनिष्ठ भक्ताची जागा दिली. समाधी घेण्यापूर्वी महाराजांनी स्वतः बाळाभाऊंचा हात धरून त्यांना स्वतःच्या गादीवर बसविले. महाराजांच्या समाधिनंतर, ज्या जागी बसून महाराजांनी संजीवन समाधि घेतली त्याच जागेवर बसून ते श्रीमद्भगवद्गीतेवर प्रवचने करीत असत, त्यावेळी देहभान हरपल्याने त्यांना देहावरील वस्त्राचेदेखिल भान राहात नसे. परंतु बाळाभाऊ हे महाराजांचे सच्चे भक्त असल्याकारणाने महाराजांच्या समाधीनंतर त्यांना ह्या भौतिक जगात आनंद वाटेना, त्यामुळे ते हळूहळू खंगू लागले आणि १९१२ साली त्यांनी कृश होऊन देह सोडला.

पितांबर - शेगांवीचाच रहिवासी असलेला पितांबर हा महाराजांचा अत्यंत प्रेमळ, भोळा आणि कपटरहित अशा मनाचा भाविक भक्त होता. बंकटलालाने सांगितलेल्या महाराजांच्या थोरवीवर त्याचा चट्कन विश्वास बसला. इथेच त्याच्या आध्यात्मिक प्रगतिची मुहूर्तमेढ रोवली गेली. त्यानंतर जुन्या शिवमंदिरात जेव्हा टाकळीकरांचे कीर्तन होते त्यावेळी अचानक महाराजांची भेट होऊन त्याचा विश्वास अधिकच गाढ झाला. महाराजांचे सदैव ध्यान आणि नामस्मरण ह्याची फलश्रुति म्हणूनच की काय एकदा महाराजांची त्याच्यावर कृपा झाली आणि परिणामी महाराजांनी त्यास पर्यटनाला जाण्यास सांगितले. त्यानंतर अकोलीच्या शिवारातील वठलेल्या आंब्याला जेव्हा पितांबराच्या सद्गुरुभक्तीच्या प्रभावाने सर्वांदेखत हिरवी पाने फुटली तेव्हा मात्र सर्वांना त्याच्या थोरवीचा प्रत्यय आला. अजूनही अकोलीत पितांबराचा मठ आहे आणि सद्गुरूंच्या कृपेने पल्लवित झालेला आंबा अजूनही तसाच हिरवागार असून त्यास इतर आंब्यांच्या झाडांपेक्षा जास्ती फळे येतात. पितांबराचा अंतदेखील अकोलीतच झाला. पितांबराच्या जीवनाचा आढावा घेता असे दिसून येते की सद्गुरूंची आज्ञा पालन करणे हेच त्याच्या श्रेष्ठ गुरुभक्तीचे मुख्य लक्षण होते.

श्रीधर गोविंद काळे - श्रीधर गोविंद काळे हे मॅट्रिकनंतर इंटरला नापास झाल्याने वर्तमानपत्रे वाचीत वेळ घालवीत असताना त्यांनी टोगो आणि यामा ह्या जपानी व्यक्तींच्या जीवनचरित्राविषयी वाचले. आपणही मायदेश सोडून विलायतेला जाऊन नाव आणि पैसा कमवावा असे त्यांना वाटू लागले. परंतु पैशाची व्यवस्था होईना त्यामुळे ते निराश झाले आणि कोल्हापूरला जाताना वाटेवर शेगांवला थांबून महाराजांना भेटायला गेले असताना सर्वज्ञ असलेल्या महाराजांनी त्यांचे मनोगत जाणले आणि परदेशी जाण्यापासून त्यांना परावृत्त केले. सरतेशेवटी महाराज त्याला म्हणाले, "कोठे न आता जाई येई|." त्यानंतर महाराजांच्या कृपेने त्याची उत्तम भौतिक प्रगति झाली. त्याचवेळी महाराजांनी त्यांना बहुमोल उपदेश दिला की अतिशय पुण्य केल्याखेरीज भारतात जन्म होत नाही आणि योगापेक्षा अध्यात्मविचार श्रेष्ठ आहे. महाराजांच्या आशीर्वादाने ते बी.ए.एम्.ए. झाले आणि त्यांना शिंद्यांच्या राज्यातील शिवपुरी कॉलेजमध्ये प्रिन्सिपालच्या जागी नेमले गेले.

त्र्यंबक उर्फ भाऊ कवर - त्र्यंबकला घरी भाऊ असे प्रेमाने म्हणत असत, परंतु ही गोष्ट फक्त जवळच्या माणसांव्यतिरिक्त अन्य कोणालाही माहिती नव्ह्ती. जेव्हा महाराजांची कीर्ती सर्वदूर पसरली तेव्हा कवरला त्यांना भेटण्याची तीव्र तळमळ लागली. त्याप्रमाणे त्याने तीनवेळा शेगांवला भेटी दिल्या परंतु तिन्ही भेटींमध्ये सदगुरुमहाराजांनी त्याच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले; कवर मनोमनी दु:खी झाला. अखेरची एक भेट घ्यावी म्हणून कवर शेगांवला गेला आणि भक्तांच्या गर्दीत जाऊन बसला. थोड्या वेळात महाराज सरळ त्याच्याकडेच आले आणि म्हणाले, "काय भाऊ, एकटाच चिकण सुपारी खातोस होय? तुझ्या खिशातली सुपारी दे बरं मला थोडी!" कवराला आश्चर्याचा धक्काच बसला. ह्यांना माझे नाव कसे कळले, ह्यांना कसे कळले की माझ्या खिशात चिकण सुपारी आहे? ह्या घटनेतूनच भाऊ कवराला महाराजांच्या दिव्यत्वाची प्रचिती आली आणि त्याची महाराजांवर असीम श्रद्धा जडली. त्या क्षणापासून् भाऊ कवर त्यांच्या श्रेष्ठ भक्तांपैकी एक झाला. तो त्यावेळी हैदराबादमध्ये डॉक्टरी शिकत होता. सुटीमध्ये घरी आला असता त्याला वाटले की महाराजांचे आवडीचे पदार्थ करून घेऊन त्यांना जेवण नेऊन द्यावे. त्याप्रमाणे त्याने भाकरी, अंबाडीची भाजी, हिरव्या मिरच्या, कांदे, लोणी असे पदार्थ बरोबर घेतले; पण तो स्टेशनवर येण्याअगोदर गाडी निघून गेली. कवराला अतोनात दु:ख झाले, गुरुमहाराज जेवून घेतील आणि आपण आणलेली शिदोरी वाया जाईल या विचाराने तो व्यथित होऊन स्टेशनवर तसाच बसून राहिला. परंतु भक्तवत्सल महाराज त्या दिवशी आलेले सर्व नैवेद्य बाजूला सारून तसेच उपाशी बसले होते. शेवटी जेव्हा कवर चार वाजता शेगांवच्या मठात आला, तेव्हा महाराज म्हणाले, "तुझ्या भाकेत गुंतलो | मी उपाशी राहिलो | आण तुझी शिदोरी||." त्यावेळी कवराला काय वाटले असेल ह्याची कल्पना एक भक्तच करू शकेल. इतर भक्त म्हणाले, "भाकरीवर गुंतले चित्त कवराच्या स्वामींचे."

बंकटलाल अगरवाल - पातुरकरांच्या घरामधील भेटीनंतर महाराज तेथून वेगाने निघून गेल्याने, बंकटलालाचे मन गुरुमहाराजांच्या भेटीकरिता तळमळू लागले. महाराज त्याला पुन्हा शिवमंदिराजवळ भेटले. तोवर बंकटलालाने वाटेमध्ये भेटलेल्या पितांबरासारख्या भोळ्याभाबड्या मित्राला महाराजांच्या थोरवीची कहाणी ऐकविल्याने तोही महाराजांना भेटावयाला उत्सुक आला होता. तो प्रसंग होता टाकळीकरांच्या कीर्तनाचा. भागवताच्या एकादश स्कंधातील ज्या श्लोकाचा पूर्वभाग कीर्तनकार बोलले त्याचा उत्तरार्ध महाराज दूर लिंबाच्या झाडाखाली बसून उच्चारते झाले; कीर्तनकारबुवा थक्कच झाले. त्यानंतर बंकटलाल मोठ्या सन्मानाने महाराजांना स्वगृही घेऊन गेला व त्यांना मोठ्या प्रेमादराने त्यांना तेथे ठेवून घेतले. परंतु महाराज स्वतः सच्चे परमहंस संन्यासी असल्याकारणाने काही कालावधीनंतर त्यांनी बंकटलालाचे घर सोडून दिले व ते गावातील मारुतीच्या मंदिरात विसावले. महाराजांच्या समाधीनंतर जेव्हा समाधीसमोर अनेक धार्मिक कार्यक्रम झाले त्यांत बंकटलालाच्या सुपुत्राने केलेला शतचंडीचे अनुष्ठान अथवा यज्ञ प्रख्यात झाला. त्या समयी बंकटलालाचा देहान्त होण्याचा प्रसंग उद्भवल्याने सर्वच चिंतीत झालेले पाहून बंकटलालाने सर्वांना सांगितले, "अरे, माझा तारक समाधीमध्ये बसला असताना तुम्ही कशाला काळजी करता!" त्यांच्या भक्तीनुसार त्यांच्या जिवावरचे संकट टळले आणि यज्ञसांग झाला. बंकटलालाचे सदन आजही शेगांवला पहावयास मिळते; सर्व भक्त्तांनी ते अवश्य जाऊन पहावे.

विरक्ति

देवीदास पातुरकरांच्या अंगणात पक्वांनाचे ताट समोर आल्यावर महाराजांनी सर्व पदार्थ एकत्र करून खाल्ले, आणि दाखवून दिले की ज्याने ब्रह्मरसाची माधुरी चाखली आहे त्याला पक्वांनाची काय चव? ह्याच ठिकाणी महाराजांनी सांगितले की शुद्ध ब्रह्म हे निर्गुण असते आणि त्याच्यापासूनच हे जग निर्माण झालेले आहे.
भक्तांकडून साग्रसंगीत षोडशोपचारे पूजा करून घ्यावी तर कधी आंघोळीशिवाय कित्येक दिवस राहावे , तर कधी गळ्यात पडणारे हारही भिरकावून द्यावे अशी बालोन्मतपिशाच्च वृत्ती .
महाराज हे शुद्ध ब्रह्म होते, एक परमहंस संन्यासी होते. ज्याला ब्रह्माचे पूर्णपणे ज्ञान झालेले आहे, जेथे जीव-शिवाचे मिलन झालेले आहे अशा जीवनमुक्तांना देहाचे भान राहात नाही असे असताना तो देह कपड्यात गुंडाळण्याकडे लक्ष त‍री कुठे असणार? महाराज अशा पराकोटीचे जीवनमुक्त संत होते म्हणूनच ते बहुश: दिगंब‍र अवस्थेतच असत. नग्न राहतात अशा आरोपाखाली जेव्हा जठारसाहेबांनी त्यांना त्यांच्या दिगंबर अवस्थेबद्दल विचारताच महाराज म्हणाले, "तुला काय करणे यासी|चिलिम भरावी वेगेसी|नसत्या गोष्टीशी|महत्त्व न यावे निरर्थक||." महाराजांना कपड्याचे आकर्षण वा सोस असण्याचा प्रश्नच उद्भवत नाही . कोणी अंगावर शाल पांघरली तर मनात असेल तोपर्यंत ठेवत नाहीतर ती फेकून देत असत . पादुका , पादत्राणे त्यांनी कधी वापरलीच नाहीत . बरेचसे भक्त विकत आणलेल्या पादुका महाराजांच्या पायाला लावत आणि मग घरी त्यांची स्थापना करीत . मात्र महाराजांच्या नित्य वापरातल्या वस्तूंमध्ये पादुका नव्हत्या . इतकंच काय त्यांना चिलीम ओढण्याचीही फारशी सवय नव्हती . क्वाचितच ते चिलीम ओढीत असत . पण ३२ वर्षांच्या कालखंडात त्यांनी फार कमीवेळा चिलिमीला स्पर्श केला .

भ्रमंती

आपल्या अवतारकार्यातील ३२ वर्षांचा काळ त्यांनी संपूर्णपणे शेगांवमध्ये व्यतीत केला असला तरीही कारणपरत्वे महाराजांची भ्रमंती अकोला, मलकापूर, नागपूर, अकोट, दर्यापूर, अकोली-अडगाव, पिंपळगाव, मुंडगाव , रामटेक, नांदुरा, अमरावती, खामगाव या विदर्भातल्या प्रमुख भागांतल्या खेड्यापाड्यांतून झालेली आहे . उन्हापावसातून वस्त्रविहीन अवस्थेत भरभर चालणाऱ्या महाराजांची चालगती गाठण्यासाठी त्यांच्या भक्तांना अक्षरश: धावावे लागे .
महाराज आपल्या भक्तांसोबत वारीच्या निमित्ताने दरवर्षी पंढरपूर येथे जात असत . त्याचप्रमाणे नाशिक-त्र्यंबकेश्वर येथेही नित्यनेमाने जात . नाशिक येथील कुशावर्त तीर्थाजवळील निलांबिका देवीचा डोंगर तसेच ब्रह्मागिरी पर्वतावरही ते आवर्जून जात असत. ब्रह्मागिरी पर्वताची उंची छाती दडपून टाकणारी आहे . सर्वसामान्य माणसास तिथे जाण्यापूर्वी दहावेळा विचार करावा लागतो . शे-सव्वाशे वर्षांपूर्वी तर ही स्थाने फारच दुर्गम होती. महाराज मात्र हा संपूर्ण पर्वत चढून जात असत. ब्रह्मागिरी पर्वतावरील गहिनीनाथांची गुंफा आणि निवृत्तीनाथांच्या मंदिराला महाराज आवर्जून भेट देत व तिथे काही क्षण घालवत. नाथसंप्रदायात नवनाथांनी जे चमत्कार केले त्यातलेच काही गजानन महाराजांनीही त्यांच्या अवतार कार्यात केलेले दिसतात.

समाधि

जेव्हा गजानन महाराजांना कळले की त्यांच्या अवतारसमाप्तीची वेळ येऊन ठेपली आहे, त्यावेळी ते हरी पाटलासोबत पंढरीला गेले. असे म्हणाले जाते की त्यांचा मानस पंढरीलाच समाधी घेण्याचा होता परंतु विठ्ठलाच्याआज्ञेने त्यांनी शेगावलाच समाधी घेण्याचे ठरविले व ऋषिपंचमीचा पुण्यदिनही ठरविलासंदर्भ हवा ]. समाधी घेण्यापूर्वी महाराजांनी सांगितले, "आम्ही आहोत येथे स्थित | तुम्हा सांभाळण्याप्रति सत्य | तुमचा विसर पडणे नसे ||" लाखोंच्या संख्येने लोक त्यांच्या समाधिप्रसंगी हजर होते. तत्पूर्वी महाराजांना सुवासिक द्रव्ये लावून अभ्यंग स्नानघालण्यात आले होते. अनेक सुवासिनींनी त्यांची पूजा करून मंगलारती ओवाळली होती. सर्वत्र सनईचे सूर ऐकू येत होते. सूर्याची पहिली किरणे जमिनीला स्पर्शिली आणि महाराजांनी ब्रह्मरंध्रातून त्यांचे प्राण अनंतात विलीन केले. देहाचे चलनवलन थांबले आणि भक्तगण एकदम शोकसागरात बुडाले. भक्तांना आकाश फाटल्यासारखे झाले, सर्वत्र दु:खाश्रूंचा पूर लोटला. त्यावेळी स्वतः श्री महाराजांनी त्यांच्या समाधीची वार्ता कित्येक भक्तांना स्वप्नात जाऊन कळविली.
त्याचवेळी डोणगावच्या गोविंद शास्त्रींनी निर्वाळा दिला की जोपर्यंत महाराजांचे सर्व भक्त दर्शन घेऊन जात नाही तोपर्यंत महाराज त्यांचे प्राण मस्तकी धारण करतील. महाराजांच्या समाधीचा सोहळा हा अवर्णनीय असा झाला. लाखोंच्या गणनेने भक्त समाधीच्या मिरवणुकीत भागीदार झाले. लोकांनी शृंगारित रथात ठेवलेल्या महाराजांच्या पुण्यमय देहावर अबीरगुलालफुलेतुळशी आणि पैसे उधळले. संपूर्ण शेगावातून फिरुन पहाटे ती मंदिरात आली; तेथे महाराजांवर पुन्हा अभिषेक केला गेला.
त्यांचा देह शास्त्रात सांगितल्यानुसार उत्तराभिमुख असा समाधीच्या जागी ठेवला. अखेरची आरती ओवाळली आणि मीठ, अर्गजा, अबीर ह्यांनी भरली. सर्व भक्तांनी एकच जयजयकार केला, "जय गजानना |ज्ञानांबरीच्या नारायणा | अविनाशरुपा आनंदघना | परात्परा जगत्पते ||," आणि शिळा लावून समाधिची जागा बंद केली. त्यानंतर दासगणूंनी म्हंटले आहे की सार्वभौम राजाचाही त्यांच्यापुढे पाड नाही. {POV} त्यांचे विश्वप्रेम, बंधुत्व आणि भक्तांच्या हाकेला धावून जाणे तसेच अतर्क्य असे चमत्कार करून त्यांना संकटातून सोडवून, त्यांच्या चुका त्यांच्या पदरात घालून अत्यंत प्रेमाने त्यांना मोक्षमार्गावर घेऊन जाण्याच्या लीला पहाताच सर्वच भक्त धन्यतेने नतमस्तक होतात. आज गजानन महाराज आपल्यात फक्त देहाने नाहीत, परंतु ते जगदाकार असल्याने ते नाहीत अशी जागाच अखिल ब्रह्मांडात नाही. म्हणूनच त्यांना "अनंतकोटी ब्रह्मांडनायाक महाराजाधिराज योगिराज परब्रह्म सच्चिदानंद भक्तप्रतिपालक शेगांवनिवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय!!!" असे प्रेमादराने संबोधले जाते. ज्या भक्तांना त्यांचे पुनीत चरणकमल लाभले ते खरोखरच धन्य होत. अशा सर्वच भक्तांच्या जीवननौका श्री महाराज भवसागराच्या पैलतीरी लावतील यात शंकाच नाही. अशा सदगुरुंविषयी परमपूज्य श्री कलावतीदेवी ह्यांनी स्वतः लिहिलेल्या 'गुरुस्तुति'मध्ये सांगितले आहे, "अगा! निर्गुणा, निश्चला, सच्चिदानंदा | अगा! निर्मला, केवला आनंदकंदा || स्थिरचररुपी नटसी जगी या | नमस्कार माझा तुला गुरुराया ||१|| अगा! अलक्षा, अनामा, अरूपा | अगा! निर्विकारा, अद्वया, ज्ञानरुपा || कृपाकरोनी अक्षयपद दे दासा या | नमस्कार माझा तुला गुरुराया ||२||" सदगुरूच्या स्वरूपाचे खरे वर्णन ह्या ओळींमध्ये सामावलेले आहे, गजानन महाराजांना हे वर्णन किती चपखल बसते आहे हे तर सर्वांना विदितच आहे.
त्यांनी अनेक लोकांना दु:ख, संकटे, रोग यांपासून मुक्त करून सन्मार्गाला लावले. ते एक परमहंस संन्यासी तसेच उच्च कोटीचे विदेही संत होते. आज शेगावात त्यांच्या दर्शनाला येणाऱ्या असंख्य भक्तजनांना पाहून ह्या गोष्टीची नक्कीच खात्री पटते.
०८ सप्टेंबर १९१० रोजी ऋषिपंचमीच्या दिवशी त्यांनी शेगावयेथे समाधी घेतली आणि त्यांचे समस्त भक्तगण दु:खसागरात बुडाले.

अंतिम संदेश

देहत्याग करण्यापूर्वी महाराज म्हणाले, "मी गेलो ऐसे मानू नका | भक्तित अंतर करू नका | कदा मजलागी विसरु नका | मी आहे येथेच ||." याव‍रून महाराजांचे भक्तांवरील अपरंपार प्रेमच दिसून येते. महाराजांनी भक्तांना सांभाळण्याचे वचन दिले आहे; ते समाधि घेण्यापूर्वी म्हणाले, "दु:ख न करावे यत्किंचित | आम्ही आहोत येथेच | तुम्हा सांभाळण्यापरी सत्य | तुमचा विसर पडणे नसे ||." देह त्यागून महाराज ब्रह्मीभूत झाल्याकारणाने ते आता जगदाकार झाले आहेत. त्यायामुळे लाखो भक्तांना आजही त्यांची कृपा, प्रेम, आशीर्वाद आणि मार्गदर्शन लाभत आहे.

+ + दूपारच्या आरती नंतर मंदिरात पिठलं भाकरी , कांदा व मिरची असा प्रसाद भक्तांना दिला जातो याचा अवश्य लाभ घ्यावा .

टिप : - शेगाव जवळच आनंद सागर हे ठिकाण पण खुप सुंदर आहे .

निवास

शेगाव येथे अत्यंत सुंदर भक्त निवास आहे . तसेच खाजगी लॉज व हॉटेल्स पण आहेत .
जाण्याचा योग्य कालावधी :
प्रचंड उन्हाळ्याचे दिवस टाळून वर्षभर कधि हि .

कसे जाल?

शेगाव रस्तेमार्गाने देशातील मोठ्या शहरांशी जोडले आहे .
रेल्वेने जाणाऱ्यांसाठी शेगाव येथे रेल्वे स्टेशन आहे .
शेगाव येथे जाण्यासाठी जवळचा विमानतळ नागपूर येथे आहे .

शेगावची गुगल पिन .

Shegaon
Maharashtra 444203
https://maps.app.goo.gl/vGDN5YYSha9WYDuc8

शेगावचे गजानन महाराज यांच्या जिवनावर आधारीत चित्रपट ( युट्युब )

https://youtu.be/qdmpApdZ62Y

आनंद सागर चे वर्णन करणारा मुट्युब व्हिडिओ

https://youtu.be/mlvV8Dh2omM

विनंती :- आपणास माहिती कशी वाटली प्रतिक्रिया जरुर द्या अन सदर ब्लॉग / फेसबुक पेज आपल्या मित्र परीवारात पण शेअर करा .  

शैलेश चौधरी(Shailesh Choudhari)
( माहिती संकलक / ब्लॉगर / पर्यटण व्यवसायिक )
Blogger and Travel agent
९७६७५ ९१६७५
[Mobile number +919767591675]
WhatsApp number +918888741797
Languages :- Marathi,  Hindi and little bit English.
email address :-
travelbirdindia@yahoo.com
Can Contact between:-
9a.m. to 9 p.m. ( Indian standard time )
Use Google Translate App. or web site to read this artical in your own language . Use Marathi as source language and translate  it in your own language.
पर्यटण एक चळवळ
पर्यटण विषयास वाहिलेला मराठी ब्लॉग
आमच्या फेसबुक पेज ला भेट द्या .
Visit our Facebook page
Travelbirdindia
आम्हाला व्टिटर वर फॉलो करा .
Follow me on Twitter
https://mobile.twitter.com/Shailesh1881975
संदर्भ :- विकीपिडिया , इंटरनेट , गुगल मॅप व यु ट्युब