Tuesday, July 31, 2018

आयुष्यात नक्की पहावी असा चमत्कार सांधण दरी (Sandhan Valley )

आयुष्यात नक्की पहावी असा चमत्कार सांधण दरी

निसर्गाच्या कुशीत दडलेलं ‘सांधण दरी’ हे आश्चर्य आजही कित्येकांना माहित नाही. अहमदनगर जिल्ह्यातल्या सामरद या गावातून पुढे दीड ते दोन किमी नागमोडी वळणं घेत जाणारी ही दरी ट्रेकर्ससह इतर भटक्यांनाही मोहात पाडते. पावसाळ्याचे चार महिने वगळता वर्षभर पर्यटक इथे गर्दी करतात. सांधण दरीतल्या निमुळत्या वाटेवरून पुढे जात रात्री तिथेच मुक्काम करायचा हाच इथे आलेल्या अनेकांचा प्लॅन असतो. ही वाट पुढे इतकी निमुळती होत जाते की कित्येक ठिकाणी सूर्याचा प्रकाश जमिनीपर्यंत पोचत नाही. समोर आजोबा पर्वत, रतन गड आणि मागे अलंग-मदन-कुलंग गड आणि कळसुबाई शिखर सह्याद्रीच्या विशालतेची साक्ष देत असताना ही सांधण दरी सर करणं तुम्हाला त्या मानाने सोप्पं वाटतं. आशिया खंडातील क्रमांक दोनची खोल दरी असा या दरीचा लौकीक असल्याचं सांगितलं जातं. म्हणूनच ती पाहण्यासाठी जगभरातून पर्यटक गर्दी करतात. सांधण दरीला यायचं तर निदान दोन दिवस तरी काढायला हवेत. उन्हाळ्यातल्या एखाद्या वीकेंडला इथे येउन धमाल करायचा विचार असेल, तर चालू शकेल. कारण मुंबईसह महाराष्ट्रातच कडक उन्हाळा असताना इथे मात्र थंड वातावरण असतं. शनिवारी सकाळी मुंबई-पुण्याहून निघून इगतपुरी गाठायचं. तिथून शेंडी या गावाला जायला थेट जीप किंवा रिक्षा मिळतात. तिथून पुढे सामरदला जायलाही तशीच सोय तिथून होते. प्रवास करत दुपारी सामरदला पोहोचलात की गावातल्या एखाद्या घरात तुमची जेवणाची व्यवस्था सहज होऊ शकते. चुलीवर बनवलेलं स्वादिष्ट जेवण पोटात गेलं की आत्मा शांत होतो. थोडा वेळ आराम करून पुढच्या प्रवासाला सज्ज व्हायचं. सांधण दरीचा सुरक्षितपणे आनंद घ्यायचा तर एखादा गाईड सोबत हवाच. तो तुम्हाला गावात मिळू शकेल. तुमच्या जेवण्या-खाण्याची, रात्री झोपण्यासाठी तंबूची आणि साहसी उपक्रमांसाठी आवश्यक त्या साहित्याची सोय तो तुम्हाला हमखास करू देऊ शकतो. अर्थात त्यासाठी थोडा खिसा मोकळा करण्याची तयारी हवी. दरी गावाला खेटूनच असल्याने गावापासून दरीपर्यंत पोहोचण्यासाठी फारसा प्रवास करावा लागत नाही. पण प्रत्यक्ष दरीत गेल्यापासून तुमचा खरा प्रवास सुरू होतो. दरीत शिरण्याची वाट फार सोपी आहे. पण अनेकजण त्या दरीमध्ये सहज उतरत नाही. विविध साहसी मोहीमा करतच पुढे जायचं असंच इथे आलेल्या प्रत्येकाने ठरवलेलं असतं. त्यामुळे अनेक मंडळी रॅपलिंग करतच या दरीमध्ये उतरतात. पुढे जागोजागी रॅपलिंग, व्हॅली क्रॉसिंग, फ्लायिंग फॉक्स, जायंट स्विंग असे साहसी प्रकार करत तुम्ही पुढे सरकता. अर्थात, हे सगळे साहसी प्रकार तज्‍ज्ञांच्या मार्गदर्शनाखालीच करायला हवेत. दरीत थोडा काळोख होऊ लागला की बॅगेतल्या टॉर्च हातात घेऊन तुमचा प्रवास सुरू होतो. तो काही वेळासाठीच. पुढे मुक्कामाच्या जागी पोचताच तंबू बांधला जातो आणि गावातून घेतलेल्या जेवणाचे डबे उघडले जातात. खरं तर घरी असताना जेवलो की लगेच झोप येते. पण इथे मात्र चित्र थोडं वेगळं असतं. आतल्या थंडगार वातावरणात तुम्ही आकाशाकडे बघत कितीही वेळ पडून राहू शकता. तुमच्या सोबत असलेल्यांपैकी एखाद्याला ग्रह-ताऱ्यांची उत्तम माहिती असेल, तर आकाशदर्शनाचा मस्त अनुभव तुम्हाला घेता येऊ शकतो. मुंबईच्या आकाशात सहज न दिसणारे सप्तर्षी तिथून अगदी स्पष्ट दिसू लागतात. रात्रीच्या पूर्ण काळोखात हातात टॉर्च घेऊन समोरच्या रतनगडावर चढणारी मंडळी पाहून ग्रूपमधल्या नवख्या ट्रेकर्सना ट्रेकिंगची ओढ लागते. ताऱ्यांनी भरलेलं आकाश बघत बघत कधी झोप लागते हे कळत नाही. सकाळी उठून परतीच्या प्रवासाला लागायचं. गावात दुपारचं जेवण केलं की या दरीतल्या आठवणी घेऊन पुन्हा आपल्या घरी जायचं.

संदर्भ

महाराष्ट्र टाईम्स २७ मे २०१६ चा लेख जसाच्या तसा .
गुगल मॅप्स व यु ट्युब .

फोटो : गुगल इमेज येथून

कसे जाल 








अहमदनगर जिल्ह्यातल्या अकोले तालुक्यातील सामरद गावाजवळच सांधण व्हॅली आहे .

सावधान: सांधण दरीत जरी  फिरणे धोकादायक नाहि परंतु दरीचा शेवट खुप खोल कड्यावर होतो . त्यामुळे तेथे फाजिल धाडस जीवावर बेतु शकते . त्यामुळे शेवटच्या टोकापासून सुरक्षित अंतरावरून परत मागे या . कड्यावरुन खाली पाहणे चा मोह टाळा . सेल्फी च्या फंदात पडू नका .

सांधण ( दरी ) हॅली ला जाणारा गुगल मार्गदर्शन

https://goo.gl/maps/NnRZtLxhymQ2

सांधण व्हॅली चे यतार्थ वर्णन करणारे यु ट्युब व्हिडिओ

https://youtu.be/8wVQ59N6I-0

https://youtu.be/j-CeYLF1Ajg

**विनंती :- आपणास माहिती कशी वाटली प्रतिक्रिया जरुर द्या अन सदर ब्लॉग / फेसबुक पेज आपल्या मित्र परीवारात पण शेअर करा .  

शैलेश चौधरी(Shailesh Choudhari)
( माहिती संकलक / ब्लॉगर / पर्यटण व्यवसायिक )
Blogger and Travel agent

९७६७५ ९१६७५

[Mobile number +919767591675]
WhatsApp number +918888741797

Languages :- Marathi,  Hindi and little bit English.

email address :-

travelbirdindia@yahoo.com


Can Contact between:-

9a.m. to 9 p.m. ( Indian standard time )
Use Google Translate App. or web site to read this artical in your own language . Use Marathi as source language and translate  it in your own language.
पर्यटण एक चळवळ


पर्यटण विषयास वाहिलेला मराठी ब्लॉग


आमच्या फेसबुक पेज ला भेट द्या .
Visit our Facebook page

Travelbirdindia


आम्हाला व्टिटर वर फॉलो करा .
Follow me on Twitter

https://mobile.twitter.com/Shailesh1881975

Wednesday, July 25, 2018

पळसधरी रेल्वे स्टेशन जवळील पळसधरी धबधबा व किल्ल्याचा ट्रेक ( Palsdhari watertall )

पळसधरी रेल्वे स्टेशन जवळील पळसधरी धबधबा व किल्ल्याचा ट्रेक

पळसधरी फोर्ट (सोनगिरी किल्ला) 

महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील एक  किल्ला आहे. कर्जत क्षेत्राजवळील मनोरम ट्ठिकाणी पळसधरीचा ट्रेक आहे. कर्जत रेंजजवळील सह्याद्री पर्वत रांगांवर हा किल्ला आहे. पळसदिरी या लहानशा गावाजवळ किल्ला आहे आणि बहुतेक ट्रेकर्समध्ये अजिबात माहित नाही. खूप कमी संख्येनं पळसधरी किल्ल्याच्या ट्रेक करतात. चिंब पावसात येथे जाण्याची मजा काहि वेगळीच आहे . काही तटबंदी, तटबंदी व 2 पाण्याची टाकी वगळता इतर किल्ल्यात बाकी काहि शिल्लक नाही.

वास्तविक, या नावाने २ विविध किल्ले आहेत ज्याचे नाव सोनगिरी आहे. पहिला म्हणजे कर्जत (सध्या आत्ता ज्याचे वर्णन करत आहोत) आणि दुसरा एक रायगड जिल्ह्यातील नागोताने जवळ आहे. बोरघाटच्या पायथ्याशी सांगीर किल्ला आहे आणि बोरघाट भागावर नजर ठेवण्यासाठी उपयुक्त आहे. पळसधारी किल्ल्याच्या आसपासच्या प्रदेशांची उत्तम स्थळे आपल्याला पाहता येतात.

वर पोहचल्यानंतर, तुम्ही बोरघाट, पळसधरी तलाव, उल्हास नदी, कर्जत-खोपोली रेल्वे मार्ग आणि मोर्बे धरणाची विहंगम दृश्य पाहू शकता. माथेरान पर्वतरांग, इर्शालगड, राजमाची, धाक किला, भाईगड, प्रबळगड या इतर शिखरे देखील किल्ल्याच्या शिखरावरून दिसतात.

पळसधरी धबधबा

ट्रेकव्यतिरिक्त, पळसधरी परीसर ​​आणि पलसदारी धबधबा पर्यटकांमध्ये लोकप्रिय आकर्षणे आहेत. हे पळसधरीच्या जंगलांत लपलेले अनेक धबधबासाठी प्रसिद्ध आहे! हा धबधबा फार मोठा नाही आणि बहुतेक वेळा कमी गर्दीचा असतो त्यामुळे येथे मुक्तपणे भिजण्याचा आनंद घेता येतो. हे एक खाजगी धबधबा आहे आणि ते 20 रूपये प्रति व्यक्ती शुल्क आकारतात.


कसे जाल

पुणे पासून मुंबईकडे जाणाऱ्या कोणत्याही गाडीला पकडा आणि खोपोली किंवा कर्जत येथे गाडी थांबते हे सुनिश्चित करा. पलसरधारी रेल्वे स्थानकापर्यंत या दोन्हीपैकी एका स्टेशनवरुन आपण ट्रेन पकडू शकता.

जवळचे रेल्वे स्टेशन
 पळसधरी

पळसधरी ( सोनगिरी ) किल्ल्याची गुगल पिन

https://goo.gl/maps/Q5rurfLH6Xw

पळसधरी किल्ल्याला लोणावळ्यातून जायचा मार्ग

https://goo.gl/maps/f2p2NCTqmLD2

पळसधरी धबधबाचा यु ट्युब

https://youtu.be/ea3UxXBQ6ZQ

सोनगिरी किल्ल्याचा यु ट्युब

https://youtu.be/RaUwbpB2SqY

संदर्भ व फोटो : इंटरनेट् , गुगल मॅप व यु ट्युब

**विनंती :- आपणास माहिती कशी वाटली प्रतिक्रिया जरुर द्या अन सदर ब्लॉग / फेसबुक पेज आपल्या मित्र परीवारात पण शेअर करा .  





शैलेश चौधरी(Shailesh Choudhari)

( माहिती संकलक / ब्लॉगर / पर्यटण व्यवसायिक )
Blogger and Travel agent

९७६७५ ९१६७५

[Mobile number +919767591675]
WhatsApp number +918888741797

Languages :- Marathi,  Hindi and little bit English.

email address :-

travelbirdindia@yahoo.com


Can Contact between:-

9a.m. to 9 p.m. ( Indian standard time )
Use Google Translate App. or web site to read this artical in your own language . Use Marathi as source language and translate  it in your own language.
पर्यटण एक चळवळ


पर्यटण विषयास वाहिलेला मराठी ब्लॉग


आमच्या फेसबुक पेज ला भेट द्या .
Visit our Facebook page

Travelbirdindia


आम्हाला व्टिटर वर फॉलो करा .
Follow me on Twitter

https://mobile.twitter.com/Shailesh1881975


Tuesday, July 24, 2018

रिमझिम पाऊस व ठिकाण सिंहगड कांदाभजी आणि आपण ( Sinhghad fort )

रिमझिम पाऊस व  ठिकाण सिंहगड कांदाभजी आणि आपण

पुण्याच्या नैर्ऋत्येला साधारण २५ कि.मी अंतरावर असणारा हा किल्ला समुद्रसपाटीपासून सुमारे ४४०० फूट उंच आहे. सह्याद्रीच्या पूर्व शाखेवर पसरलेल्या भुलेश्वराच्या रांगेवर हा गड आहे. दोन पायऱ्यासारखा दिसणारा खंदकाचा भाग आणि दूरदर्शनचा उभारलेला मनोरा यामुळे पुण्यातून कुठूनही तो लक्ष वेधतो.. पुरंदर, राजगड, तोरणा, लोहगड, विसापूर, तुंग असा प्रचंड मुलुख या गडावरून दिसतो.

इतिहास

याचे आधीचे नाव कोंढाणा. पूर्वी हा किल्ला आदिलशाहीतहोता. [[दादोजी कोंडदेव]] हे आदिलशहाकडून सुभेदारम्हणून नेमले होते. पुढे इ.स. १६४७ मध्ये गडावर आपले लष्करी केंद्र बनवले. पुढे [[इ.स. १६४९]] मध्ये शहाजी राजांच्या यांच्या सुटकेसाठी शिवाजी राजांनी हा किल्ला परत आदिलशहाला दिला. पुरंदरच्या तहात जे किल्ले मोगलांना दिले त्यामध्ये कोंडाणापण होता. मोगलांतर्फे उदेभान राठोडहा कोंडाण्यावरचा अधिकारी होता. हा मूळचा राजपूत पण नंतर मुसलमान झाला होता.

सिंहगडचे मूळ नाव कोंढाणा होते आणि [[छत्रपती शिवाजी महाराज|शिवाजी महाराजांच्या]] काळात त्यांचे विश्वासू सरदार आणि बालमित्र तानाजी मालुसरे आणि त्यांच्या मावळ्यांनी(मावळ प्रांतातून भरती झालेल्या सैनिकांनी) हा किल्ला एका चढाई दरम्यान जिंकला. या लढाईत तानाजींना वीरमरण आले आणि प्राणाचे बलिदान देऊन हा किल्ला जिंकल्यामुळे शिवाजी महाराजांनी "गड आला पण सिंह गेला" हे वाक्य उच्चारले. पुढे त्यांनी गडाचे कोंडाणा हे नाव बदलून सिंहगड असे ठेवले. सिंहगड हा मुख्यतः तानाजी मालुसरे यांच्या बलिदानामुळे प्रसिद्ध आहे.

गडावरील ठिकाणे

दारूचे कोठार : दरवाजातून आत आल्यावर उजवीकडे जी दगडी इमारत दिसते तेच दारू कोठार. दि. ११ सप्टेंबर १७५१ मध्ये या कोठारावर वीज पडली. ह्या अपघातात गडावरील त्यावेळच्या फडणिसांचे घर उद्‌ध्वस्त होऊन घरातील सर्व माणसे मरण पावली.

टिळक बंगला : रामलाल नंदराम नाईक यांच्याकडून खरेदी केलेल्या जागेवरच्या ह्या बंगल्यात बाळ गंगाधर टिळक येत असत. १९१५ साली महात्मा गांधी व लोकमान्य टिळक यांची भेट याच बंगल्यात झाली.

कोंढाणेश्वर : हे मंदिर शंकराचे असून ते यादवांचे कुलदैवत होते. आत एक पिंडी व सांब असणारे हे मंदिर यादवकालीन आहे.

श्री अमृतेश्वर भैरव मंदिर' : कोंढाणेश्वराच्या मंदिरावरून थोडे पुढे गेले की डावीकडे हे अमृतेश्वराचे प्राचीन मंदिर लागते. भैरव हे कोळ्यांचे दैवत आहे. यादवांच्या आधी ह्या गडावर कोळ्यांची वस्ती होती. मंदिरात भैरव व भैरवी अशा दोन मूर्ती दिसतात. भैरवाच्या हातात राक्षसाचे मुंडके आहे.

देवटाके : तानाजी स्मारकाच्या मागून डाव्या हाताच्या छोटा तलावाच्या बाजूने डावीकडे गेल्यावर हे प्रसिद्ध असे देवटाके लागते. या टाक्याचा उपयोग पिण्याचे पाणी म्हणून होत असे व आजही होतो. महात्मा गांधी जेव्हा पुण्यास येत तेव्हा मुद्दाम ह्या टाक्याचे पाणी मागवत असत.

कल्याण दरवाजा : गडाच्या पश्चिमेस हा दरवाजा आहे. कोंढणपूरवरून पायथ्याच्या कल्याण गावातून वर आल्यास ह्या दरवाजातून आपला प्रवेश होतो. हे एकामागोमाग असे दोन दरवाजे आहेत. यापैकी वरच्या दरवाज्याच्या दोन्हीकडील बुरुजांच्या भिंतीत अर्धवट बाहेर आलेला हत्ती व माहूत अशी दगडी शिल्पे होती. श्रीशालिवाहन शके १६७२ कारकीर्द श्रीमंत बाळाजी बाजीराव पंडित प्रधान असा शिलालेख आढळतो.

उदेभानाचे स्मारक : दरवाजाच्या मागच्या बाजूस वर असलेल्या टेकडीवर यावे. येथे जो चौकोनी दगड आहे तेच उदेभान राठोडचे स्मारकचिन्ह म्हणून ओळखले जाते. मोगलांतर्फे उदेभान हा सिंहगडचा अधिकारी होता. झुंजारबुरूज : झुंजारबुरूज हे सिंहगडचे दक्षिण टोक होय. उदयभानूच्या स्मारकापुढून समोरची टेकडी उतरून या बुरुजावर येता येते. येथून समोरच टोपीसारखा राजगड, त्याच्याच उजवीकडे तोरणा हे गड दिसतात तर खाली पानशेतचे खोरे दिसते. पूर्वेकडे लांबवर पुरंदर दिसतो.

डोणगिरीचा उर्फ तानाजी कडा : झुंजारबुरूजावरून मागे येऊन तटाच्या भिंतीच्या बाजूने पायवाटेने तानाजीच्या कडाकडे जाता येते. हा कडा गडाच्या पश्चिमेस आहे.येथूनच तानाजी मावळ्यांसह वर चढला.

राजाराम स्मारक : राजस्थानी पद्धतीची रंगीत देवळासारखी जी घुमटी दिसते तीच छत्रपती राजाराम महाराज यांची समाधी. मोगली फौजेला सतत ११ वर्षे टक्कर देणाऱ्याा राजाराम महाराजांचे वयाच्या अवघ्या ३०व्या वर्षी शनिवार दि.२ मार्च इ.स.१७०० या दिवशी सिंहगडावर निधन झाले. पेशव्यांतर्फे या स्मारकाची उत्तम व्यवस्था ठेवली जायची.

तानाजीचे स्मारक : अमृतेश्वराच्या मागच्या बाजूने वर गेल्यावर डाव्या बाजूस सुप्रसिद्ध तानाजीचे स्मारक दिसते. ‘तानाजी स्मारक समितीच्या’ वतीने हे बांधण्यात आले आहे. माघ वद्य नवमी दि. ४ फेब्रुवारी १६७२ या दिवशी झालेल्या लढाईत तानाजी मारला गेला. दरवर्षी माघ नवमीस येथे मंडळातर्फे तानाजीचा स्मृतिदिन साजरा केला जातो.

इतर आकर्षणे

सिंहगड हा तेथील खाद्यपदार्थांसाठी पण प्रसिद्ध आहे . येथे मिळणाऱ्या खास चविच्या झुनका-भाकरी , बारीक मडक्यांतून मिळणारे घट्ट दहि असो की खेकडा भजी ( कांदाभजी ) या सर्वांवर पर्यटक अक्षशः तुटून पडतात .

कसे जाल

सिंहगडला जायला अनेक पर्याय आहेत . ज्वांची स्वतःची गाडी आहे ते नसरापूर अथवा डोंजे गाव मार्गे सिंहगड घाटातून गडावर जाता येते . ज्यांना बस ने जायचे आहे त्यांच्या साठी स्वारगेट येथून सिंहगड पायथ्यापर्यत बससेवा आहे . तेथून पायवाटेने गडावर जातात .

जवळचे रेल्वेस्टेशन / विमानतळ: पुणे

सिंहगडाची गुगल पिन

https://goo.gl/maps/MD6jD1PSZuN2

सिंहगडा चे वर्णन करणारा यु ट्युब व्हिडिओ

https://youtu.be/4sxJl24HSow

पावसाळ्यातील सिंहगड

https://youtu.be/mHRtgC6qsMc

**विनंती :- आपणास माहिती कशी वाटली प्रतिक्रिया जरुर द्या अन सदर ब्लॉग / फेसबुक पेज आपल्या मित्र परीवारात पण शेअर करा .  

शैलेश चौधरी(Shailesh Choudhari)
( माहिती संकलक / ब्लॉगर / पर्यटण व्यवसायिक )
Blogger and Travel agent

९७६७५ ९१६७५

[Mobile number +919767591675]
WhatsApp number +918888741797

Languages :- Marathi,  Hindi and little bit English.

email address :-

travelbirdindia@yahoo.com


Can Contact between:-

9a.m. to 9 p.m. ( Indian standard time )
Use Google Translate App. or web site to read this artical in your own language . Use Marathi as source language and translate  it in your own language.
पर्यटण एक चळवळ


पर्यटण विषयास वाहिलेला मराठी ब्लॉग


आमच्या फेसबुक पेज ला भेट द्या .
Visit our Facebook page

Travelbirdindia


आम्हाला व्टिटर वर फॉलो करा .
Follow me on Twitter

https://mobile.twitter.com/Shailesh1881975

संदर्भ: विकिपिडिया , गुगल मॅप व यु ट्युब







Friday, July 20, 2018

आषाढी एकादशीस चला पुण्याजवळील प्रती पंढरपूरला Prati Pandharpur Prati Shirdi Prati Balaji

आषाढी एकादशीस चला पुण्याजवळील प्रती पंढरपूरला

वैष्णवांच्या भक्ति रसाने ओथंबून वाहणारा महिना म्हणजे आषाढ . महाराष्ट्रातील प्रत्येकाला विठ्ठलाची ओढ लागली असते . प्रत्येकास पांडूरंगाचे पंढरपुरचे देवुळ पहावेसे वाटते , परंतु प्रत्येकाला ते शक्य नसते . पण पुणे मुंबई करांचे ते स्वप्न विसापुर किल्ल्या जवळचे प्रति पंढरपूर पुर्ण करते . त्यात कपिलाषष्ठी योग म्हणजे येथुनच जवळ प्रति शिर्डी व प्रति बालाजी पण आहेत .
 
प्रती पंंढरपूूर

सुंदर पवना बॅकवॉटर आणि लोहागड - विसापूर किल्ल्याच्या मागे स्थित दहिवरे खिंड आपटी गावानजिक प्रती पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराच्या प्रतिकृतीप्रमाणे आहे, विशेषत: जर तुम्ही मानसूनच्या दरम्यान भेट देत असाल तर येथिल सृष्टीसौंदर्य तुम्हाला मोहुन टाकेल .

प्रती शिर्डी

एक्सप्रेस वे मार्गे शिरगाव साई बाबा मंदिरापर्यंत हा काही कि.मी. ड्राइव्ह आहे. येथे शिरडी येथिल प्रमाणे सर्व रोज आरती केल्या जातात. मंदिर वेळ10.30 ते 5 च्या सुमारास आहे.
प्रसाद दुपारी 12 ते 3 या वेळेत अन्न छ्त्रालय  येथे उपलब्ध आहे. ज्यांना शिर्डीचा प्रवास करणे अवघड वाटते त्यांच्यासाठी, हा एक चांगला पर्याय आहे.
मुंबई पुण्याच्या जुन्या महामार्ग (एनएच 4) वरून देहु रोडपासून सुमारे 3 किमी अंतरावर सोमाटणे टोलच्या चौथ्या टप्प्यापूर्वी आपण एनएच 4 च्या माध्यमातून गेल्यास तुम्हाला टोल भरावा लागेल.
एक्स्प्रेसवेने जात असल्यास, मग तळेगाव टोल चौक आणि नंतर एनएच -4 चा दुवा असलेल्या सोमाटणे वरून बाहेर पडा पण एनएच -4 न जाता एनएच -4 च्या आधी अगदी योग्य वळण घ्या आणि साइन-बोर्ड वर लक्ष द्या .
मंदिर जवळ पार्किंग उपलब्ध आहे.

प्रती बालाजी मंदिर 

तिरुपती बालाजीची प्रतिकृती पुण्याजवळ केटकवळे गावात आहे. पुणे पासून ते 45 किमी अंतरावर आहे. या मंदिरात पोहोचण्यासाठी तुम्ही पुणे-सातारा महामार्ग घ्यावा, नंतर कात्रजचा घाट ओलांडून, शिंदेवाडी-खेड शिवपुर-नासारपूर फाट-कपूरहोळे गावाकडे निघाले आहेत. नंतर बालाजी मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी नसरापूर फाटावर डावीकडे वळण घ्या.

टिप : - पुणे येथुन सकाळी लवकर निघाल्यास प्रति बालाजी तेथुन प्रति पंढरपूर व तेथुन प्रति शिर्डी १ दिवसात करता येतं .

कसे जाल ?
प्रती पंढरपूर गुगल पिन

Prati Pandharpur

https://goo.gl/maps/6AH5zCkStJQ2

प्रती शिर्डी गुगल पिन

https://goo.gl/maps/Nr895rSBhG12

प्रती बालाजी गुगल पिन
Prati Balaji Temple

https://goo.gl/maps/fjeawnqTif62

एकाच दिवसात या त्रिस्थळीची यात्रा

पुणे ते प्रती बालाजी गुगल रस्ता मार्गदर्शक

https://goo.gl/maps/6ywsxcoP4EU2

प्रती बालाजी ते प्रती पंढरपूर गुगल रस्ता मार्गदर्शक

https://goo.gl/maps/4QwM4QuVqtD2

प्रती पंढरपूर ते प्रती शिर्डी गुगल रस्ता मार्गदर्शक

https://goo.gl/maps/WSHuJxvpvTJ2

प्रती शिर्डी ते पुणे गुगल रस्ता मार्गदर्शक

https://goo.gl/maps/kVuHZ5qKrE92


संबंधित यु ट्युब व्हिडिओ

प्रती बालाजी

https://youtu.be/7O_f4-68tMo

प्रती पंढरपूर

https://youtu.be/Nkjv4XsHveo

प्रती शिर्डी

https://youtu.be/0E48pUwc4Og

संदर्भ : इंटरनेट , गुगल मॅप व यु ट्युब

**विनंती :- आपणास माहिती कशी वाटली प्रतिक्रिया जरुर द्या अन सदर ब्लॉग / फेसबुक पेज आपल्या मित्र परीवारात पण शेअर करा .  

शैलेश चौधरी(Shailesh Choudhari)

( माहिती संकलक / ब्लॉगर / पर्यटण व्यवसायिक )
Blogger and Travel agent

९७६७५ ९१६७५
Mobile number +919767591675]
WhatsApp number +918888741797

Languages :- Marathi,  Hindi and little bit English.
[

email address :-

travelbirdindia@yahoo.com


Can Contact between:-

9a.m. to 9 p.m. ( Indian standard time )
Use Google Translate App. or web site to read this artical in your own language . Use Marathi as source language and translate  it in your own language.
पर्यटण एक चळवळ


पर्यटण विषयास वाहिलेला मराठी ब्लॉग


आमच्या फेसबुक पेज ला भेट द्या .
Visit our Facebook page

Travelbirdindia


आम्हाला व्टिटर वर फॉलो करा .
Follow me on Twitter

https://mobile.twitter.com/Shailesh1881975




Thursday, July 19, 2018

पावसाळ्यात भटकंतीची वाट मढे घाट (Madhe Ghat)


पावसाळ्यात भटकंतीची  वाट मढे घाट
वेल्हा हा पुणे जिल्ह्यातला पुणे शहराला लागूनच असलेला, तरीही स्वतःचं वेगळेपण राखून असलेला, निसर्गाच्या दृष्टीनं अतिशय समृद्ध तालुका. वेल्ह्यापासून १८ किलोमीटरवर असलेला मढे घाट हा डोंगराळ भाग अतिशय निसर्गसंपन्न आहे.

वेल्ह्यापासून १८ किलोमीटरवर असलेला मढे घाट हा डोंगराळ भाग निसर्गानं अतिशय समृद्ध आहे. नरवीर तानाजीच्या मृत्यूनंतर त्याचा मृतदेह याच घाटातून त्याच्या गावाला नेण्यात आला होता, तेव्हापासून या घाटाला मढे घाट नाव पडलं, असं सांगितलं जातं.


मढे घाटात पुण्यातून जायचं असेल, तर दोन रस्ते आहेत. पहिला म्हणजे पुणे-बेंगळुरू महामार्गावरून खेड शिवापूर-नसरापूरमार्गे वेल्हा आणि दुसरा सिंहगडाच्या बाजूने जाणारा पाबे घाटातील रस्ता. डोणजे फाट्याकडून पानशेत रस्त्याला लागल्यानंतर आधी खानापूर हे एक छोटं गाव लागतं. तिथून लगेचच पाबे घाटाकडे जाणारा रस्ता आहे. या घाटमार्गे वेल्ह्यात पोहोचून वेल्ह्यातून मढे घाटात जाता येतं. डोणजे फाट्यापासूनचा पुढचा सगळाच रस्ता पावसाळ्यात अतिशय फुललेला असतो. एका बाजूला पानशेतच्या धरणात अडवलेला जलाशय आपली अखंड साथ करत असतो. हिरव्या वनराईतला रस्ताही प्रवासाचा आनंद देत असतो. खानापूर सोडून डावीकडे वळलं, की लगेचच पाबे घाटरस्ता सुरू होतो. हा घाट फारसा अवघड नाही आणि निवांतही आहे. अर्थात, रस्ता मध्येमध्ये खराब आहे आणि अरुंदही आहे; पण जास्त रहदारी नसल्यामुळे प्रवासाचा आनंद घेता येतो. शिवाय जोडीला भरभरून निसर्गाचं वरदानही आहे.

वेल्ह्याच्या स्टँडजवळूनच मढे घाटाकडे जाणारा रस्ता आहे. एकदा गाव मागे टाकलं, की पुन्हा निवांत आणि हिरवाईनं नटलेला रस्ता सुरू होतो. वाटेतले डोंगर, झाडं, धबधबे आपल्याला खुणावत राहतात. काही धबधबे थेट रस्त्याच्या कडेला आहेत, तर काही आत लपून बसलेले. त्यांचा रस्त्यापर्यंत येणारा आवाज मात्र जाणवत राहतो. मध्येच एखादा चुकार झरा रस्त्यापर्यंत येऊन रस्त्याच्या कडेने आपला दरीत कोसळण्याचा मार्ग शोधतो. एखादा ओहोळ खळखळत निसर्गाच्या संगीतात आपली भर घालत राहतो. मढे  घाटाच्या मुख्य धबधब्यापर्यंत जाण्यासाठी केळद या गावापासून आत रस्ता आहे. वाटेत बऱ्यापैकी मार्गफलक आहेत आणि जास्त फाटेही नाहीत. त्यामुळे रस्ता चुकण्याची शक्यता कमी राहते. शेतातल्या भातपिकांचा हिरवा वास अनुभवत, स्वच्छ शुद्ध हवा उरात भरून घेत, मोरांच्या केकारवाचा आस्वाद घेत आपण केळदपर्यंत येऊन पोहोचतो. तिथून आत जाण्यासाठी थोडा कच्चा रस्ता आहे. ज्या पठारावरून धबधबा खोल दरीत कोसळतो, तिथपर्यंत जाण्यासाठी कच्चा रस्ता असला, तरी गाडी घेऊन तिथपर्यंत जाणं फारसं सुरक्षित नाही. मध्ये मोठा चढ आहे आणि तिथला रस्ताही पावसामुळे उखडलेला आहे. पूल ओलांडल्यावर खालच्या बाजूला असलेल्या मोकळ्या जागेत गाडी लावून धबधब्याच्या रस्त्याने चालत जाणं सर्वांत चांगलं.

या पठारावरूनच वाहणारे सगळे ओहोळ एकत्र येऊन मोठी नदी तयार होते आणि तीच खाली धबधबा म्हणून कोसळते. आपण धबधब्याच्या वरच्या बाजूला पोहोचतो. डोंगराच्या कड्यावरून खाली दिसणारी दरी, समृद्ध जंगल, मधूनच डोंगरातून कोसळणारे छोटेमोठे धबधबे, हे दृश्य डोळ्यांत साठवण्यासारखं असतं. नदीचं पाणी उथळ आहे आणि अनेक ठिकाणी बसून पाण्यात खेळता येण्यासारखं आहे. अर्थात, कड्याच्या बाजूला न जाण्याची खबरदारी घ्यायला हवी. कड्याच्या दुसऱ्या बाजूने गेल्यावर खोल दरीत कोसळणारा हा धबधबा दिसतो आणि डोळ्यांचं पारणं फेडतो. उंचावर असल्यामुळे पावसाळ्यात या भागात दाट धुकं असतं, त्यामुळे चालतानाही काळजी घ्यावी लागते. धुकं विरळ झाल्यावर तीन बाजूंचा डोंगर, त्यातून कोसळणारा धबधबा हे सह्याद्रीचं रौद्र सौंदर्य पाहताना डोळ्यांचं पारणं फिटतं.

धबधब्याच्या खालच्या बाजूला दरीत उतरून जाण्यासाठीही इथून एक छोटी पायवाट आहे; मात्र पावसाळ्यात तिथून जाताना जरा जास्त काळजी घ्यावी लागते. शिवाय कुटुंबाबरोबर जाताना तिकडे न फिरकलेलंच बरं. निसर्गाची काळजी घेऊन, त्याला आंजारत गोंजारत, त्याचा मान राखत त्याचा आस्वाद आपण घेतला, तर निसर्ग आपल्याला भरभरून देतो, याचा अनुभव मढे घाटात नक्कीच घेता येतो.

कसं जायचं?

- पुण्याहून वेल्हा गाव नसरापूरमार्गे ६० किलोमीटर आहे. वेल्ह्यातून मढे घाट १८ किलोमीटर. वेल्ह्यापर्यंत एसटी बसची सेवा आहे, पुढे केळदपर्यंत वेगळी एसटी मिळू शकते.

- पानशेत रस्त्याने पाबे घाट-वेल्हा या मार्गेही मढे घाटात जाता येते. या मार्गाने अंतर ६५ किलोमीटर.

अभिजित पेंढारकर यांच्या लेखातून

मढे घाटातील धबधब्याची गुगल पिन

https://goo.gl/maps/3nHvYPbzDy32

मढे घाटातील धबधब्याचा यु ट्युब व्हिडिओ

https://youtu.be/6OV8tZe8uQg

**विनंती :- आपणास माहिती कशी वाटली प्रतिक्रिया जरुर द्या अन सदर ब्लॉग / फेसबुक पेज आपल्या मित्र परीवारात पण शेअर करा .  




शैलेश चौधरी(Shailesh Choudhari)

Languages :- Marathi,  Hindi and little bit English.

( माहिती संकलक / ब्लॉगर / पर्यटण व्यवसायिक )
Blogger and Travel agent

९७६७५ ९१६७५

[Mobile number +919767591675]
WhatsApp number +918888741797

email address :-

travelbirdindia@yahoo.com


Can Contact between:-

9a.m. to 9 p.m. ( Indian standard time )
Use Google Translate App. or web site to read this artical in your own language . Use Marathi as source language and translate  it in your own language.
पर्यटण एक चळवळ


पर्यटण विषयास वाहिलेला मराठी ब्लॉग


आमच्या फेसबुक पेज ला भेट द्या .
Visit our Facebook page

Travelbirdindia


आम्हाला व्टिटर वर फॉलो करा .
Follow me on Twitter

https://mobile.twitter.com/Shailesh1881975


खंडाळ्याच्या घाटाखालचा आषाणे धबधबा, भिवपुरी (Ashane waterfall Bhivpuri)

खंडाळ्याच्या घाटाखालचा आषाणे धबधबा, भिवपुरी

पावसात चिंब होण्यास प्रत्येकालाच आवडते. त्यामुळेच पावसाळ्यात तरुणाईची पावले आपोआप पावसाळी पर्यटनस्थळांकडे वळतात. हिरवागार डोंगर आणि त्याच्या कुशीतून झेपावणारा दुधाळ धबधबा अंगावर झेलत तरुणाई अगदी पावसोत्सवच साजरा करत असते.. कर्जतजवळील आषाणे धबधबा हा सध्या तरुणाईचे लाडके पर्यटनस्थळ झालेले आहे. उंचावरून कोसळणाऱ्या धबधब्याच्या पाण्यात आंनद साजरा करून तरुणाई अगदी ओलीचिंब होऊन जाते.

कर्जत रेल्वे स्थानकाच्या अलीकडच्या भिवपुरी स्थानकापासून काही किलोमीटर अंतरावर आषाणे धबधबा आहे. भिवपुरी स्थानकापासून केवळ अध्र्या तासात धबधब्यापर्यंत पोहोचता येते. पण जाणारा रस्ता आणि सभोवतालचा परिसर हिरवागार आणि वातावरण आल्हाददायक.. मग या धबधब्यापर्यंतचा प्रवासच मन उल्हसित करणारा आणि उत्साह वाढवणारा. अधूनमधून रिमझिमणारा पाऊस, हिरवा मखमली अंगरखा परिधान केलेले डोंगर, हिरवीगार भातखाचरे आणि शेताच्या मधून जाणारी पायवाट.. हा रस्ता संपूच नये असे वाटते. पण दूर डोंगरात फेसाळणारा धबधबा आपल्याला खुणावत असतो आणि आपली पावले झरझर धबधब्याच्या दिशेने चालायला लागतात.

जसा जसा डोंगर जवळ येतो, तसतसे अनेक ठिकाणी धबधबे दिसायला लागतात. पण आषाणे गावातील मोठा धबधबा पर्यटकांचे खास आकर्षण. या धबधब्याच्या ठिकाणी जाण्यासाठी थोडी डोंगरचढाई करावी लागते. धबधब्याच्या ठिकाणी पोहोचले की मोकळ्या जागेत उंचावरून कोसळणाऱ्या या धबधब्याचे पाणी झेलताना खूपच आनंददायी वाटते, पण तेवढेच भीतीदायक. धबधब्याच्या पाण्याचा मारा झेलताना समोरचे काही दिसत नाही, दोन क्षण पाणी अंगावर झेलले की त्यातून बाहेर पडावे वाटते.. पण पुन्हा हा धबधबा कवेत घ्यावासा वाटतो. या दुधाळ धबधब्याच्या ठिकाणी नाचावेसे, बागडावेसे प्रत्येक पर्यटकाला वाटते, तेथून पायच निघत नाही.

या धबधब्याचा ओहोळ अगदी दीड ते दोन किलोमीटपर्यंत पसरलेला आहे. या खळखळत्या ओहोळातही यथोचित डुंबायला आणि ओलेचिंब व्हायला पर्यटकांना आवडते. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून आषाणे धबधबा पर्यटकांचे आवडते पर्यटनस्थळ बनत आहे.

आषाणे धबधबा, भिवपुरी

कसे जाल?

* मध्य रेल्वेवरील भिवपुरी स्थानकावर उतरावे. येथून चार किलोमीटर अंतरावर हा धबधबा आहे. तेथून चालत जाण्यात खूपच मजा असते.

* भिवपुरी स्थानकापासून रिक्षा किंवा अन्य वाहनांची सोय आहे.

आषाणे धबधबा, भिवपुरी गुगल पीन

https://goo.gl/maps/F2MNvdnzCQp

भिवपुरी स्थानक ते आषाणे धबधबा गुगल रुट

https://goo.gl/maps/uFp8nAehhW92

लोनावळा ते आषाणे धबधबा गुगल रुट

https://goo.gl/maps/X6c2PVPURcM2

आषाणे धबधबा यु ट्युब व्हिडिओ

https://youtu.be/Ga4hkWrBm00


लेखाचा संदर्भ : - लोकमत आर्टिकल २५ जुन २०१५

संदर्भ: गुगल मॅप व यु ट्युब

**विनंती :- आपणास माहिती कशी वाटली प्रतिक्रिया जरुर द्या अन सदर ब्लॉग / फेसबुक पेज आपल्या मित्र परीवारात पण शेअर करा .  

शैलेश चौधरी(Shailesh Choudhari)

Languages :- Marathi,  Hindi and little bit English.

( माहिती संकलक / ब्लॉगर / पर्यटण व्यवसायिक )
Blogger and Travel agent

९७६७५ ९१६७५

[Mobile number +919767591675]
WhatsApp number +918888741797

email address :-

travelbirdindia@yahoo.com


Can Contact between:-

9a.m. to 9 p.m. ( Indian standard time )
Use Google Translate App. or web site to read this artical in your own language . Use Marathi as source language and translate  it in your own language.
पर्यटण एक चळवळ


पर्यटण विषयास वाहिलेला मराठी ब्लॉग


आमच्या फेसबुक पेज ला भेट द्या .
Visit our Facebook page

Travelbirdindia


आम्हाला व्टिटर वर फॉलो करा .
Follow me on Twitter

https://mobile.twitter.com/Shailesh1881975

Wednesday, July 18, 2018

भारताचा नायगरा चित्रकुट फॉल्स ( Chitrakut waterfall )

भारताचा नायगरा चित्रकुट फॉल्स

चित्रकुट धबधबा एक नैसर्गिक धबधबा आहे जो जगदलपूरच्या पश्चिमेला आहे. छत्तीसगडमधील भारतीय राज्यातील बस्तर जिल्ह्यातील इंद्रवती नदीवर आहे. जलपूरच्या पश्चिमेस ३८ कि.मी. (२४ मैल) अंतरावर ते स्थित आहे.
फॉल्सची उंची सुमारे  मीटर २९( ९५ फूट) आहे. भारतातील हा रुंदिनं सर्वात मोठी धबधबा आहे. मान्सून हंगामात रुंदी व विस्तृत पसरल्यामुळे त्याला अनेकदा भारताच्या नियाग्रा (मराठीत नायगरा) धबधबे असे म्हटले जाते.

भौगोलिक माहिती

चित्रकूट धबधबा इंद्रावती नदीवर स्थित आहे. नदी ओडिशाच्या कल्लाहंडी प्रदेशात उद्भवते, विंध्य पर्वत रांग ओलांडून, पश्चिमेकडे वाहते आणि नंतर चित्रकूट येथुन आंध्रप्रदेशात जाते आणि अखेरीस गोदावरी नदीत मिळते, २४० मैलांचा (३९० किमी) प्रवास करताना राज्य, भद्रकाली येथे. या फॉल्स २९ मीटर (९५ फूट) उंच आहे. त्याच्या घोड्याचा आकार यामुळे नायगारा धबधबाशी तुलना केली जाते आणि 'नायगारा धबधबा' या टोपणनावाने ती दिली जाते. पावसाळ्यात, जुलै आणि ऑक्टोबरपासून, धबधब्यावरून ढगांवर परावर्तित सूर्यप्रकाशासह मेघधनुष्य तयार होतात .

चित्रकूट धबधब्याच्या डाव्या किनार्यावर देव शिव यांना समर्पित एक छोटा हिंदू मंदिर आणि "पार्वती गुंफा" (शिवाची पत्नी पार्वती नावाच्या नावाची) म्हणून ओळखल्या जाणा-या नैसर्गिकरित्या तयार केलेल्या गट्टे आहेत. क्षेत्रातील वनस्पतींच्या अनुपस्थितीमुळे उन्हाळी हंगाम वगळता, हवामान सामान्यतः आनंददायक आहे.

चित्रकूट जगदलपुर येथे येतो . चित्रकूट धबधब्यास चित्रकोट आणि चित्रकोट फॉल्सच्या नावावरूनही ओळखले जाते. हे शहर पश्चिम जगदलपूर शहरापासून ३८ किमी आणि राजधानी रायपूरपासून २७६ कि.मी. अंतरावर आहे. इंद्रावती नदीवर हे पाणी वाहते आणि ओडिशाच्या . येते व मधुन  पश्चिम चित्रकूट येथेआंध्र प्रदेशात जाते .  आणि नंतर गोदावरी नदीला मिळते. या नदीचा वापर अनेक हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर प्रोजेक्टमध्ये केला जातो.

या ठिकाणापासुन जवळ तीरथगड धबधबाही आहे . जो चित्रकूटपासून काही किलोमीटर अंतरावर आहे. ऑफ सीझनमध्ये, हा धबधबा अनेक लहान प्रवाहात पडतो आणि घोड्याच्या नालेच्या आकारात वाहते. तथापि, मान्सून दरम्यान, पावसामुळे पाणी संपुर्ण धबधब्याच्या रूंदित वाहते त्यामुळे हे दृश्य फार छान दिसते .


कसे जाल .
जवळचे शहर : जगदलपूर
जवळचे रेल्वे स्टेशन : सतना

चित्रकुट धबधब्याची गुगल पिन

https://goo.gl/maps/k6Y6UeB3Vh22

चित्रकुट धबधब्याची संपुर्ण माहिती देणारा यु ट्युब व्हिडिओ

https://youtu.be/2IXSsmsBdr4

संदर्भ: इंटरनेट , गुगल मॅॅप व यु ट्युुब
फोटो : गुगल इमेजेस वरुन साभार

**विनंती :- आपणास माहिती कशी वाटली प्रतिक्रिया जरुर द्या अन सदर ब्लॉग / फेसबुक पेज आपल्या मित्र परीवारात पण शेअर करा .  




शैलेश चौधरी(Shailesh Choudhari)

Languages :- Marathi,  Hindi and little bit English.

( माहिती संकलक / ब्लॉगर / पर्यटण व्यवसायिक )
Blogger and Travel agent

९७६७५ ९१६७५

[Mobile number +919767591675]
WhatsApp number +918888741797

email address :-

travelbirdindia@yahoo.com


Can Contact between:-

9a.m. to 9 p.m. ( Indian standard time )
Use Google Translate App. or web site to read this artical in your own language . Use Marathi as source language and translate  it in your own language.
पर्यटण एक चळवळ


पर्यटण विषयास वाहिलेला मराठी ब्लॉग


आमच्या फेसबुक पेज ला भेट द्या .
Visit our Facebook page

Travelbirdindia


आम्हाला व्टिटर वर फॉलो करा .
Follow me on Twitter

https://mobile.twitter.com/Shailesh1881975

Tuesday, July 17, 2018

या श्रावणात नक्की जावे असा हरिश्चंद्रगड (Harishchandra Gad)


हरिश्चंद्रगड

हरिश्चंद्रगड हा ठाणे, पुणे आणि नगर जिल्ह्यांच्या सीमेवर माळशेज घाटाच्या डावीकडे उभा असणारा अजस्र डोंगर आहे.



पौराणिक महत्त्व


मोगल अथवा मराठे यांच्या इतिहासाची देखील पार्श्वभूमी आहे, तर हरिश्चंद्रगडाला दोन चार हजार वर्षापूर्वीची पौराणिक पार्श्वभूमी लाभली आहे. साडेतीन हजार वर्षांहूनही प्राचीन असलेल्या चहूबाजूंनी तुटलेल्या रौद्रभीषण कडेकपारींचे नैसर्गिक संरक्षण लाभलेल्या या हरिश्चंद्रगडाचा उल्लेख प्राचीन अग्निपुराणात व मत्स्यपुराणात आढळतो. आदिवासी कोळी महादेव या समाजाकडून हा किल्ला मोघलांनी घेतला व त्यानंतर १७४७-४८ मध्ये हा किल्ला मराठ्यांनी मोगलांकडून घेतला आणि किल्लेदार म्हणून कृष्णाजी शिंदे यांची नियुक्ती केली.

हरिश्चंद्र, तारामती आणि रोहिदास अशी येथील शिखरांचीनावे असल्यामुळे या किल्ल्याचा संदर्भ थेट राजा हरिश्चंद्रापर्यंत स्थानिक दंतकथांनी जोडला आहे. हरिश्चंद्रगडावरील लेण्यांत चांगदेवांनी तपश्चर्या केली होती.

गडाचे वर्णन

गडावर चहापाण्याची व जेवणाची सोय होते. पावसाळ्यात या गडाचे सौदर्य काही औरच असते. वनस्पतींची विविधता या गडाएवढी इतरत्र कुठेही आढळणार नाही. करवंद, कारवीच्या जाळी , धायटी , उक्षी, मदवेल, कुडा, पांगळी, हेकळ, पानफुटी, गारवेल इत्यादी वनस्पती येथे आढळतात. या भागातील प्राणिवैभव मात्र शिकारींमुळे बरेच कमी झाले आहे. तरीही कोल्हे, तरस, रानडुकरे, बिबळ्या, ससे, भेकर, रानमांजरे इत्यादी प्राणी आढळतात. तारामती य गडाचे सर्वोच्च शिखरावरून नाणेघाट, जीवधन, रतनगड, कात्राबाईची खिंड, आजोबाचा डोंगर, कळसूबाई, अलंग, मदन, कुलंग, भैरवगड, हडसर आणि चावंड हा परिसर दिसतो. अशा तहेने अप्रतिम निसर्गसौंदर्याने नटलेला हरिश्चंद्रगड ’ट्रेकर्सची पंढरी’ ठरतो. हरिश्चंद्रगड समुद्रसपाटीपासून १४२४ मीटर उंचीवर आहे.

पाहण्यासारखी ठिकाणे

हरिश्चंद्रेश्वराचे मंदिर

येथेच हरिश्चंद्रेश्वराचे मंदिर आहे. तारामती शिखराच्या उत्तर पायथ्याला लेणी कोरलेली आहे.

चार खांब - चार युगांचे प्रतीक

हरिश्चंद्रेश्वर मंदिराच्या दारात एक पुष्करणी आहे. त्यामधील कोनाड्यांमध्ये पूर्वी मूर्ती होत्या. मंदिराच्या समोर नंदी आहे. साधारण दहाव्या अकराव्या शतकात झांज राजाने बांधलेल्या १२ मंदिरांमधील हे मंदिर आहे. मंदिरावर कोरीव गुहा आहे.

मंदिराच्या उत्तरेकडे पाण्याच्या प्रवाहाने झालेली धळ आहे. या धळीमध्ये केदारेश्वराची लेणी आहे. यामध्ये भलीमोठी पिंड आहे. पिंडीच्या बाजूला पाणी भरलेले असते.प्रदक्षिणा मारता येते.

कोकणकडा

हे या किल्ल्याचे सर्वांत मोठे आकर्षण म्हणजे गडाच्या पश्चिमेकडे असलेला कोकणकडा. तीन हजार फूट खाली कोकणात कोसळणारा हा कडा मध्यभागी जवळजवळ ७५ फूट अंतर्वक्र आहे. कड्याच्या माथ्यावर झोपूनच (आणि जपूनच) याचे विराट रूप पहावे लागते. स्वच्छ हवा असली तर येथून कल्याणपर्यंतचा प्रदेश दिसतो. हा कडा महाराष्ट्रातील सर्वांत उंच कडा आहे. हा कडा रोमन लिपीतील यू 'U' या अक्षराच्या आकाराचा आहे. हा इतर कड्यांसारखा ९० अंशात नसून अंतर्गोल आकाराचा आहे. समोरून बघितला तर नागाच्या फण्यासारखा दिसतो.

हरिश्चंद्रगडावरून शिवनेरी, हडसर, चावंड, निमगिरी, सिंदोळा, जीवधन, गोरखगड, मच्छिंद्र, सिद्धगड, माहुली,कलाडगड, भैरवगड, (मोरोशी), तसेच भैरवगड (शिरपुंजे), कुंजरगड असे किल्ले दिसतात.

गडपणाच्या खाणाखुणा लोप पावत असल्यातरी निसर्गाची मुक्त उधळण, त्याचे रौद्रत्व, निसर्गाचे वेगवेगळे आविष्कार आपल्याला हरिश्चंद्राच्या भटकंतीमध्ये पहायला मिळतात. मात्र हे सर्व पहाण्यासाठी, अनुभवण्यासाठी आपण किमान दोन दिवसांची सवड हाताशी ठेवणे गरजेचे आहे. कोकणकड्यावर १८३५ मध्ये कर्नल साईक्सला इंद्रवज्रदिसले होते.

कोकणकड्याला पडलेली धोकादायक भेग

हरिश्चंद्रगडावरील या प्रसिद्ध कोकणकड्याच्या माथ्यावर मोठी भेग पडली असून, त्यामुळे हा कडा धोकादायक बनला आहे. या भेगेची तातडीने दुरुस्ती न केल्यास कड्याचा वरचा काही भाग येत्या काही दिवसांत कोसळण्याची शक्यता आहे. पर्यटकांना कड्याच्या टोकाचा हा भाग लोंबणारा (पुढे आलेला) असल्याची कल्पना असतेच असे नाही. हा भाग कोसळल्यास कोकणकड्याच्या सौंदर्यालाच तडा जाणार आहे.

कडय़ाच्या टोकापासून सुमारे पाच ते दहा फूट अंतरावर भेग असून, येथील खडकाचा भाग आतून पोखरला गेला आहे. कोकणकड्यावर सरासरी पाच हजार मिलिमीटर पाऊस पडतो. दरीतून वाहत येणार्‍या वार्‍याचा वेगही प्रचंड असतो. ऊन, वारा, पाऊस यामुळे ही भेग रुंदावण्याची शक्यता आहे.

तारामती शिखर

तारामती शिखर गडावरील सर्वात उंच शिखर आहे. उंची साधारणतः ४८५० फूट्.. शिखराच्या पोटात एकूण सात लेणी आहेत. त्यापैकी एका गुफेत गणेशाची सुमारे साडेआठ फुटाची भव्य आणि सुंदर मूर्ती आहे. याच गणेशगुहेच्या आजूबाजूला अनेक गुहा आहेत. त्यातही राहण्याची सोय होते. गुहेच्यासमोर उभे राहिल्यावर डावीकडे जाऊन पुढे वर जाणारी वाट आपल्याला अर्ध्या तासाच्या चढाईनंतर तारामती शिखरावर घेऊन जाते. या शिखरावरून समोरच दिसणारे जंगल, घाटावरचा आणि कोकणातील प्रदेश न्याहाळता येतात. शिखरावर जाताना वाटेत अनेक गोमुखे लागतात. माथ्यावर दोनतीन शिवलिंगे आहेत.

ऐतिहासिक महत्त्व

महाराष्ट्रातील इतर पारंपरिक किल्ल्यांपासून हा किल्ला वेगळा आहे. इतर किल्ल्यांमध्ये आढळणारी तटबंदी येथे दिसत नाही. या किल्ल्यावर प्राचीन लेणी आहेत, तसेच सुमारे १२व्या शतकापेक्षा जुने शालिवाहन काळातील शिवमंदिर आहे. सह्याद्रीतील अंत्यंत दुर्गम किल्ला म्हणून याची ओळख आहे. येथील मंदिर आदिवासी कोळी महादेव जमातीचे कुलक असून महादेवाच्या नावावरूनच जमातीची ओळख आहे. संपूर्ण सह्याद्री पट्ट्यातील सर्व महादेव मंदीर हि या जमातीचे प्रतीक आहेत. तसेच आदिवासी समाजाचा निकारीचा असणारा इंग्रज, सावकार, जमीनदार यांच्या विरुद्ध असणाऱ्या लढ्याचे हे के प्रतिक आहे.

१७४७-४८ मध्ये हा किल्ला मराठ्यांनी मोगलांकडून घेतला आणि किल्लेदार म्हणून कृष्णाजी शिंदे यांची नियुक्ती केली.

मंदिराच्या प्रांगणात प्राकाराची भिंत आहे. या प्राकाराच्या भिंतीसमोरच एक दगडी पूल आहे. या पुलाच्या खालून एक ओढा तारामती शिखरावरून वाहत येतो यालाच 'मंगळगंगेचा उगम' असेही म्हणतात. पुढे ही नदी पायथ्याच्या पाचनई गावातून वाहत जाते. मंदिराच्या आवारात अनेक गुहा आहेत. काही गुहा रहाण्यासाठी योग्य आहेत तर काही गुहांमध्ये पाणी आहे. या गुहांमधील पाणी थंडगार व अमृततुल्य आहे. मंदिराच्या मागे असणाया गुहेमध्ये एक चौथरा आहे. या चौथर्‍यात जमिनीखाली एक खोली आहे. यावर प्रचंड शिळा ठेवली आहे. या खोलीत 'चांगदेव ऋषींनी' चौदाशे वर्ष तप केले होते असे स्थानिक गावकरी सांगतात.

कसे जाल

गडावर जाण्याच्या वाटा

गडावर जाण्यासाठी सध्या तीन चार वाटा प्रचलित आहेत. गडाचा घेरा फार मोठा असल्याने गडावर जाण्याच्या वाटाही फार आहेत.

खिरेश्वरकडील वाट

खिरेश्वरकडील वाट सोपी असल्याने लोक हरिश्चंद्रगडावर जाण्यासाठी साधारणपणे ही वाट घेतात. मुंबई-जुन्नर असा राजरस्ता माळशेज घाटातून जातो. या घाटाच्या माथ्यावर खुबीफाटा आहे. पुण्याहून आळेफाटामार्गे अथवा कल्याणहून मुरबाड-माळशेज घाट मार्गे खुबीफाट्यास उतरता येते. खुबी फाट्यावरून धरणावरून चालत गेल्यावर ५ कि.मी. अंतरावर खिरेश्वर गाव लागते. तसेच पुण्याकडून खिरेश्वरपर्यंत एस.टी. बसेसचीही सोय आहे. खुबीफाट्यावरून खिरेश्वरकडे निघाल्यावर वाटेत आश्रमशाळा आहे. अडचणीच्या वेळेस येथे विनंतीवरून मुक्कामाची सोय होऊ शकते. हरिश्चंद्रगडावर जाताना खिरेश्वर गावातून अदमासे एक कि.मी. अंतरावर खिरेश्वराचे प्राचीन शिवमंदिर आहे. हे अकराव्या शतकातील यादवकालीन मंदिर आहे. मंदिराच्या बाहेरील सभामंडप छताला शिल्प पट्‌टिका बसवलेली आहे. आतील गाभारा असलेल्या दाराच्या माथ्यावर शेषयायी विष्णू व परिवाराचे अप्रतिम कोरीव शिल्प आहे. मूषकवाहन मकर-रती, अशा अनेक कोरीव प्रतिमा येथील पाषाणावर आढळतात. या मंदिराला `नागेश्वराचे मंदिर' असेही म्हणतात. या गावातून दोन वाटा गडावर जातात.

एक वाट ही तोलार खिंडीतून सुमारे ३ तासात गडावरील्र मंदिरापर्यंत पोहचवते.दुसरी वाट ही गडावरील जुन्नर दरवाजाला पोचते. ही वाट पूर्वी प्रचलित होती. आता मात्र वाटाड्याशिवाय या वाटेने गडावर जाऊ नये. या मार्गाने जाताना गावातील विहिरीतून पाणी भरून घेतले पाहिजे कारण वाटेत कुठेच पाणी नाही.

नळीची वाट बेलपाड्यातून(मुरबाड तालुका, ठाणे जिल्हा) हरिशचंद्रगडावर जाते. या वाटेने जाताना तब्बल दहा-बारा तासांचा प्रस्तरारोहणाचा (रॉक क्लाइंब) समावेश असलेला खडतर मॅरेथॉन ट्रेक करावा लागतो.


सावर्णे-बेलपाडा-साधले असा घाटमार्ग

गड सर करण्यासाठी एक सावर्णे-बेलपाडा-साधले असा घाटमार्ग आहे. परंतु हा मार्ग फारच अवघड असल्याने प्रस्तरारोहणाचे तंत्र अवगत असलेल्यांनीच हा मार्ग अवलंबावा. या मार्गे येण्यासाठी कल्याण-मुरबाड मार्गे माळशेजघाट चालू होण्यापूर्वी सावर्णे गावात उतरावे. येथून `बेलपाडा' या कोकणकड्याच्या पायथ्याच्या गावात यावे. येथून कड्यातून काढलेल्या साधले घाटाच्या साहाय्याने कोकणकड्याच्या पठारावर जाता येते. या वाटेने मंदिर गाठण्यास सुमारे दीड दिवस लागतो. या वाटेलाच `नळीची वाट' असेही म्हणतात.

तोलार खिंड

हरिश्चंद्रगडाचा माथा अतिशय विस्तीर्ण असल्यामुळे तो खालून एकदम भव्य दिसतो. त्याच्या पूर्व बाजूला इंग्रजी 'यू' आकाराची खिंड आहे. ही खिंड म्हणजे प्रसिद्ध तोलार खिंडहोय. ही खिंड पुणे आणि नगर जिल्ह्यांमधील दुवा आहे. येथे आदिवासी क्रांतिकारक राघोजी भांगरे यांचा इतिहास आजही देदीप्यमान आहे.

येथून पश्चिमेकडे धोपटमार्गाने ३-४ कि. मी. चालत जावे लागते. या मार्गावर बर्‍याच ठिकाणी दिशादर्शक बाणही रंगवलेले आहेत. या मार्गाने आपण तारामती शिखराच्या पदरात पोहोचतो.

हरिश्चंद्रगडाची गुगल पिन

https://goo.gl/maps/CKNZyuNt2yC2

पुणे ते हरिश्चंद्रगड रस्ता मार्गदर्शन

https://goo.gl/maps/cHtrC1omU152

हरिश्चंद्रगडाबाबत चा एक यु ट्युब व्हिडिओ

https://youtu.be/Ih-Bb7v1Y0Y

संदर्भ : विकिपिडिया , गुगल इमेजेस , गुगल मॅप व यु ट्युब

**विनंती :- आपणास माहिती कशी वाटली प्रतिक्रिया जरुर द्या अन सदर ब्लॉग / फेसबुक पेज आपल्या मित्र परीवारात पण शेअर करा .  






शैलेश चौधरी(Shailesh Choudhari)

Languages :- Marathi,  Hindi and little bit English.

( माहिती संकलक / ब्लॉगर / पर्यटण व्यवसायिक )
Blogger and Travel agent

९७६७५ ९१६७५

[Mobile number +919767591675]
WhatsApp number +918888741797

email address :-

travelbirdindia@yahoo.com


Can Contact between:-

9a.m. to 9 p.m. ( Indian standard time )
Use Google Translate App. or web site to read this artical in your own language . Use Marathi as source language and translate  it in your own language.
पर्यटण एक चळवळ


पर्यटण विषयास वाहिलेला मराठी ब्लॉग


आमच्या फेसबुक पेज ला भेट द्या .
Visit our Facebook page

Travelbirdindia


आम्हाला व्टिटर वर फॉलो करा .
Follow me on Twitter

https://mobile.twitter.com/Shailesh1881975


Monday, July 16, 2018

ताम्हीनी जवळील जंगलातील पावसाळी अंधारबन ट्रेक अंधारबन ( Andhar ban )

ताम्हीनी जवळील जंगलातील पावसाळी अंधारबन ट्रेक

अंधारबन – (जंगलवाट) गडद, झाडांच्या सावलीचे जंगल आहे हे अंधारबन. भर पावसात या जंगलवाटेवर चालण्याची मजाच निराळी आहे. मुंबई आणि पुण्यापासून अगदी हाकेच्या अंतरावर हे अंधारबन आहे.

ट्रेक चे अंतर: १४ किलोमीटरल

ऐतिहासिक संदर्भ: अंधारबनातील दरीच्या सुरुवातीला असलेल्या सिनेर खिंडीत नावजी बलकवडे यांचे स्मारक आहे. सन १६९३ मध्ये, राजाराम महाराजांच्या काळात नावजी बलकवडे यांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी पुन्हा एकदा कोंढाणा (सिंहगड) जिंकला होता.

अंधारबन! नावाप्रमाणेच सूर्याची किरणेही जेथे पोहोचत नाहीत असं घनदाट जंगल, चहूबाजूंनी कोसळणारे आणि पावलो-पावली ओलांडावे लागणारे खळखळते धबधबे, दूर दूर वर पसरलेले हिरवे-गार डोंगर अशी स्वर्गीय अनुभूती देणारे ठिकाण! अंधारबन ट्रेक ची आणखी एक खासियत म्हणजे या संपूर्ण ट्रेक मध्ये हिरडी गाव सोडलं, तर तुम्हाला कुठेच वस्तीच्या खुणा दिसत नाहीत, चहूबाजूंनी दूर-दूर वर पसरलेले अथांग पर्वत आणि घनदाट जंगलातूनच अंधारबनाची वाट जाते.

अशा या अंधारबनात जाण्यासाठी पुण्याहून फार दूर जायची गरज नाही. पुण्याहून ९० किलोमीटर अंतरावर असलेल्या ताम्हिणी घाटातील “पिंपरी” गावातून अंधारबन ट्रेक ची सुरुवात होते. साधारण १४ किलोमीटर चा अंधारबनाचा जंगल रस्ता म्हणजे अनेक पशु- पक्षी व कीटकांचे घर आणि निसर्गसंपत्ती व मनमोहक दृश्यांचा खजिनाच! अंधारबनातून जाताना कुंडलिका व्हॅली व प्लस व्हॅली या ताम्हिणी मधील आणखी दोन ट्रेक ची झलक दिसते.

ट्रेक मार्ग
अंधारबर्न जंगल ट्रेक अंदाजे 13 किलोमीटर लांबीचा मार्ग आहे, जो पिंपरी धरणापासून सुरू होतो. ट्रेक मार्ग खूप दाट जंगलातुन  जातो. आपण बर्याचदा झाडांच्या सावलीत असाल. ट्रेकच्या मार्गावर काही विरळ पाणी प्रवाह आणि काही धबधबे आहेत. भिरा धरणाच्या दिशेने चढत असताना आपण कुंडलिका नदीच्या खोऱ्यात, भीमा धरणाचे आणि ताहिनी घाट पर्वतरांगांची एक विस्तृत विहंगम दृश्य पाहू शकता. या जंगलात असंख्य वन्य फुले आणि फुलपाखरे आहेत (अगदी लोकप्रिय कास पठार). त्यामुळे छायाचित्रकार आणि निसर्ग प्रेमी यांच्या साठी हा ट्रेक करणे गरजेचे आहे .


अंधारबर्नच्या जंगल ट्रेकचा सुरवातीचा बिंदू उंचावरील आहे. म्हणून तुम्ही खोऱ्यात अंदाजे २१०० फूट उंचावरुन खाली उतरता. भिरा धरणा (ट्रेकचा शेवटचा बिंदू) पर्यंत उतरता . अंधारबन ट्रेक मार्ग डोंगराच्या माथ्यावरून जातो आणि आसपासच्या सह्याद्री डोंगररांगाच  मनोहर दृश्य डोळयात मावत नाहि. पहिल्यांदा ८ किमी मार्गावर दाट जंगल लागते. कोकण भागातील भिरा धरणापासून 4 किलोमीटरच्या अंतरावर तुम्हाला उतरत आहे. हे धरण मूळ कुंडलिका नदीवर आहे जी कोलाड मधील राफ्टिंगसाठी प्रसिद्ध आहे.

पहाण्यासाठी ठिकाणे:
कुंडलिका नदी खोरे
ताहिनी घाट
धबधबे
प्लस व्हॅली
भिरा बांध बॅकवॉटर
धनगड किल्ला
तैलबैल टोक
सारसगड किल्ला
इंडिपेंडन्ट पॉइंट

ट्रेकचा आवश्यक वेळ:  या ट्रेक पूर्ण करण्यासाठी सुमारे ६ ते ७ तास लागतात. पिंपरी धरणातून अंधेर्बान जंगल ट्रेकची सुरूवात. हा मार्ग अंधरबर्नच्या जंगलातून जातो आणि भिरा धरणाजवळ संपतो

कसे जाल

पुण्यातुन मुळशी मार्गे ताम्हीणी जवळील पिंपरी गावातून ट्रेक सुरू होतो .

अंधारबन ट्रेकचा स्टार्टिंग पॉइंट पिंपरी ( ताम्हानी )गावाजवळील गुगल पीन

https://goo.gl/maps/kkdz9PEQAiE2

अंधारबन ट्रेकचा लास्ट पॉइंट भिरा डॅम ची गुगल पीन

https://goo.gl/maps/EJBi53akThS2

अंधारबन ट्रेक चा यु ट्युब व्हिडिओ

https://youtu.be/c5L-8CL1jOs

संदर्भ: इंटरनेट , गुगल मॅप व यु ट्युब्

फोटो : - इंटरनेट वरुन साभार

**विनंती :- आपणास माहिती कशी वाटली प्रतिक्रिया जरुर द्या अन सदर ब्लॉग / फेसबुक पेज आपल्या मित्र परीवारात पण शेअर करा .  




शैलेश चौधरी(Shailesh Choudhari)

Languages :- Marathi,  Hindi and little bit English.

( माहिती संकलक / ब्लॉगर / पर्यटण व्यवसायिक )
Blogger and Travel agent

९७६७५ ९१६७५

[Mobile number +919767591675]
WhatsApp number +918888741797

email address :-

travelbirdindia@yahoo.com


Can Contact between:-

9a.m. to 9 p.m. ( Indian standard time )
Use Google Translate App. or web site to read this artical in your own language . Use Marathi as source language and translate  it in your own language.
पर्यटण एक चळवळ


पर्यटण विषयास वाहिलेला मराठी ब्लॉग


आमच्या फेसबुक पेज ला भेट द्या .
Visit our Facebook page

Travelbirdindia


आम्हाला व्टिटर वर फॉलो करा .
Follow me on Twitter

https://mobile.twitter.com/Shailesh1881975

पावसाळ्यात ढगांच्यात हरवणारे कळसूबाई शिखर व ट्रेक (Kalsubai )

कळसूबाई शिखर

कळसूबाई हे पश्चिम घाटातील एक १६४६  मीटर (५४०० फुट) उंच असलेले शिखर आहे.  अहमदनगर जिल्हातील अकोले तालुक्यात आहे . ते 'एव्हरेस्ट ऑफ महाराष्ट्र' या नावाने प्रसिद्ध आहे. पावसाळ्यातील दिवसात हे शिखर अनेक दिवस ढगांच्यात अद्रुश्य झालेले असते . याच दिवसात अनेक लोक  पावसाळी ट्रेकसाठी येथे येतात .

शेजारच्या टेकड्यांसह शिखर एक पूर्वेस ते पश्चिम पसरलेला आहे आणि पश्चिमेस घाटांच्या विखुरलेल्या रांगांमधून विखुरलेला आहे. ते इगतपुरी तालुका, व नाशिक जिल्ह्यातील सीमेची नैसर्गिक सीमा तयार करतात. अकोले तालुक्यापासून अहमदनगर जिल्ह्याच्या दक्षिणेस आहे व दख्खनच्या पठारावर वसलेले आहे आणि समुद्रसपाटीपासून ५८७ मीटर (१९२६ फूट) उंचावर आहे.

या शिखरा बरोबरच शेजारच्या डोंगररांगांनी आर्थर लेकसाठी एक प्रचंड पाणलोट क्षेत्र तयार केले आहे .

नाशिक-इगतपुरी महामार्गावरील घोटी या गावापासून घोटी-भंडारदरा रस्त्याने गेल्यास बारी हे गाव लागते. बारी हे गाव कोळी महादेव या आदिवासी जमातीचे आहे. या गावापासून कळसूबाई शिखरावर जाण्याचा मार्ग आहे. शिखरावर कळसुबाई देवीचे एक छोटे मंदिर आहे. देवीची अख्याइका सांगितली जाते कि, कळसुबाई हि तेथील गावातील सून होती, तिला बऱ्यापैकी औषधी वनस्पती बद्दल ज्ञान होते. त्यान ती गावातील लोकांची सेवा करत असत. कालांतराने मृत्यू नंतर गावातील लोकांनी तिची ओळख म्हणून त्या शिखराला तिचे नाव दिले. आणि आठवण म्हणून शिखरावर छोटे मंदिर बांधले. आदिवासी समाजामध्ये पूर्वजांना देव मानले जाते म्हणून आजही कळसुबाई ला ते आपली देवी मानतात. कळसुबाई हि आदिवासींची कुलदेवी आहे. संगमनेर गावापासूनही भंडारदरामार्गे बारी गावास जाता येते. ट्रेकिंग चा छंद असेल तर भेट द्यायला उत्तम ठिकाण.

कळसूबाई शिखर येथिल पर्यावरण

कळसूबाईचा भाग संरक्षित अभयारण्यच्या हद्दीत येतो. तेथे अनेक प्रकारच्या वनस्पती व प्राणी आढळतात . पावसाळ्यानंतर हा प्रदेश विविध रंगांची फुलांनी  वेलींनी बहरतो . जे  फुलपाखरे, मधमाश्या, ड्रॅगन-मक्की आणि इतर कीटकांना आकर्षित करते.

हिवाळ्यातील सकाळच्या वेळी साप सूर्याची स्नान करताना दिसू येतात .

कसे जाल .

नासिक पासून ७० कि . मी . , मुंबई पासुन १७० कि . मी . व पुण्यातून २०० कि . मी . अंतरावर असून रस्ते मार्गाने या शहरांस ऊत्तम रित्या जोडले गेले आहे .

जवळचे रेल्वे स्टेशन : कसारा

जवळचे विमानतळ : नासिक परंतू येथे विमान मार्गे जाण्यास जवळचा विमानतळ मुंबई आहे .

कळसुबाई शिखराची गुगल पिन

https://goo.gl/maps/nwh2GPcdXsQ2


कळसुबाई ट्रेक बाबत माहिती देणारा यु ट्युब व्हिडिओ

https://youtu.be/10PfEbgQuL0

**विनंती :- आपणास माहिती कशी वाटली प्रतिक्रिया जरुर द्या अन सदर ब्लॉग / फेसबुक पेज आपल्या मित्र परीवारात पण शेअर करा .  

शैलेश चौधरी(Shailesh Choudhari)
Languages :- Marathi,  Hindi and little bit English.

( माहिती संकलक / ब्लॉगर / पर्यटण व्यवसायिक )
Blogger and Travel agent

९७६७५ ९१६७५

[Mobile number +919767591675]
WhatsApp number +918888741797

email address :-

travelbirdindia@yahoo.com


Can Contact between:-

9a.m. to 9 p.m. ( Indian standard time )
Use Google Translate App. or web site to read this artical in your own language . Use Marathi as source language and translate  it in your own language.
पर्यटण एक चळवळ


पर्यटण विषयास वाहिलेला मराठी ब्लॉग


आमच्या फेसबुक पेज ला भेट द्या .
Visit our Facebook page

Travelbirdindia


आम्हाला व्टिटर वर फॉलो करा .
Follow me on Twitter
https://mobile.twitter.com/Shailesh1881975

Saturday, July 14, 2018

राजमाचीच्या ट्रेकच्या आडवाटेवरील कातळधार धबधबा (Kataldhar waterfall)

राजमाचीच्या ट्रेकच्या आडवाटेवरील कातळधार धबधबा

कातळधार हा महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील लोणावळा जवळ एक मोठे धबधबा आहे. हा धबधबा इतका प्रसिद्ध नाही कारण खोऱ्यात पोहोचण्यासाठी थोडा कठीण आहे आणि या ठिकाणाचा शोध घेण्यापूर्वी प्राथमिक ट्रेकिंगचा काही अनुभव आवश्यक आहे. संपूर्ण वर्षासाठी तेथे पाणी उपलब्ध नसते . परंतु मान्सूनच्या हंगामात पाण्याची प्रचंड धार तेथे कोसळत असते . खोऱ्यात पोहोचणे अवघड असले तरीही तेथे पोहचल्या नंतर  स्वर्गिय नजारा  दिसतो.

कातळधार धबधबा राजमाची किल्ल्याजवळ आहे. राजमाची ट्रेकिंग मार्गावर आपण 3 आंबे वृक्ष आहेत तेथून कातळ धरला वाट आहे . कातळधार धबधबा येण्यास केवळ हा एकच पर्याय आहे. या टप्प्यावर तुम्ही घनदाट जंगलातुन खाली उतरता . कातळधार धबधब्याच्या येथे पोहोचल्यानंतर तुम्ही एक डोळा आकाराचे गुहा दिसेल जिथे 100 लोक सहज त्या गुहेत  राहु शकतात . परंतु येथे रहाणे सोईस्कर नसून धोक्याचे आहे . या गुहेपासून आपण राजमाची किल्ला (श्रीवर्धन किल्ला बालेकिल्ला) दिसतो .

कसे जाल
लोणावळ्या पासून राजमाची किल्ल्याला जाणाऱ्या रस्याबरून कातळधार ला एकच वाट जाते .

जवळचे शहर : लोनावळा (७.५ कि . मी . )

जवळचे रेल्वे स्टेशन : लोनावळा

जवळचे विमानतळ : पुणे



कातळधार धबधब्याची गुगल पिन

https://goo.gl/maps/5TknTxFmGM12

कातळधार धबधब्याच्या ट्रेकचा लोनावळ्या पासूनचा मार्ग

https://goo.gl/maps/XTNM6wvfXbK2

कातळधारचा ट्रेक करण्याआधि खालील यु ट्युब व्हिडिओ नक्की पहा .

https://youtu.be/x7AQ1sF5W7E

**विनंती :- आपणास माहिती कशी वाटली प्रतिक्रिया जरुर द्या अन सदर ब्लॉग / फेसबुक पेज आपल्या मित्र परीवारात पण शेअर करा .  

शैलेश चौधरी(Shailesh Choudhari)

Languages :- Marathi,  Hindi and little bit English.

( माहिती संकलक / ब्लॉगर / पर्यटण व्यवसायिक )
Blogger and Travel agent

९७६७५ ९१६७५

[Mobile number +919767591675]
WhatsApp number +918888741797

email address :-

travelbirdindia@yahoo.com


Can Contact between:-

9a.m. to 9 p.m. ( Indian standard time )
Use Google Translate App. or web site to read this artical in your own language . Use Marathi as source language and translate  it in your own language.
पर्यटण एक चळवळ


पर्यटण विषयास वाहिलेला मराठी ब्लॉग


आमच्या फेसबुक पेज ला भेट द्या .
Visit our Facebook page

Travelbirdindia


आम्हाला व्टिटर वर फॉलो करा .
Follow me on Twitter

https://mobile.twitter.com/Shailesh1881975





संदर्भ व फोटो :- इंटरनेट , युट्युब व गुगल मॅप .