Saturday, August 17, 2019

अक्कलकोटची माहिती व इतर स्थानिक महत्वाची धार्मिक क्षेत्र . ( AKKALKOT )









अक्कलकोट


भूमी ही स्वामींच्या वास्तव्याने पुनीत झालेली आहे. सोलापूरहून स्वामी जे अक्कलकोटला आले ते शेवट पर्यंत तेथेच राहिले. अक्कलकोट हे मुख्यतः तालुक्याचे ठिकाण असून ते सोलापूर जिल्ह्यात आहे. सदर  क्षेत्र हे महाराष्ट्र आणि  कर्नाटकच्या सीमेवर आहे. समर्थ भक्त हे ठिकाण पवित्र आणि प्रासादिक मानतात. हजारो भक्तांच्या मनोकामना  पूर्ण करणारे स्वामी आज हि  येथे आहेत अशी भक्तांची पूर्ण श्रद्धा आहे.

श्री वटवृक्ष मंदिर
अक्कलकोटचा विकास मुख्यत्वे करून या मंदिराचे व्यवस्थापनाने  झाल्याचे दिसते. येथे एक भव्य स्वामी मंदिर आहे. त्यात मुख्यतः श्रीच्या पादुका, शिवलिंग, स्वामींच्या स्मृती वस्तु, प्रवचन हॉल छोटीशी निवास व्यवस्थाही आहे. या परिसरात प्रवेश करताच  मन स्वामीचरणी गुंतून जाते. स्वामींनी अनेक लीला याच परिसरात केलेल्या आहेत. या परिसरात  वटवृक्षा खाली छोटयाशा मंदिरात स्वामींच्या पादुका आहेत त्याला कांन लावल्यावर अनेक वादयांचे आवाज येतात असा भक्तांचा अनुभव आहे. स्वामींचा त्यांचे जीवन कालात सर्वत्र वावर होता पण जास्त येथे व चोळप्पाचे मठात होता. अनेक सिद्ध पुरुष त्याकाळी व नंतरही  या ठिकाणी  येऊन गेल्याने हे पावित्र्य वाढलेलेच आहे. वटवृक्ष मंदिरातही सकाळी अभिषेक, रुद्रापठण  चालते. येथे अनेक जुने फोटो लावलेले आहेत. येथेच मारुती मंदिर, व शिव पिंड आहे. सातत्याने येथे भजन कीर्तनाचे व आध्यात्मिक प्रवचनेही चालतात. त्रिकाल आरती होते. जवळच संस्थानचे ऑफिस आहे. भक्त द्रव्य रूपाने येथे सेवा अर्पण करू शकतात. सदर ट्रस्ट मार्फत येथे मंदिरालगत भक्त निवासाची व्य वस्था आहे. तसेच गाणगापूर रस्त्याला अद्ययावत असे भक्तनिवास ५-६ इमारती स्वरूपात भक्तांच्या सेवेस हजर आहे. तेथे छोटेखानी उपहार गृह आहे. येथेच स्वामींचे कायमस्वरूपी संग्रहालय आहे यात स्वामींच्या जीवनदर्शन घडवणारे फोटो व वस्तू आहेत. त्यातील काही फोटो अचम्बीत करतात. येथेही स्वामींची एक मूर्ती आहे. येथे पार्किंग व राहण्याची उत्तम सोय आहे.

श्री स्वामी समर्थांच्या मठांविषयी
परब्रह्म श्रीस्वामी समर्थ महाराज इ. स. १८५६ मध्ये अक्कलकोट येथे प्रकट झाले. त्यावेळीइ. स. १८५७ च्या स्वातंत्र्य युद्धानंतर इंग्रजांच्या पाशवी गुलामगिरीखाली भारतीय जनता चिरडून गेली होती. असंख्यवीरांना भारतमातेच्या स्वातंत्र्याचे संरक्षण करताना इंग्रजांच्या अमानुष छळाला (फाशी,जन्मठेप, हत्याकिंवा तोफेच्या तोंडी) बळीपडावे लागे. लोकआर्थिकदृष्ट्या दुर्बल, धार्मिकदृष्ट्या अवमानित झाले होते. अशाखडतर प्रसंगी श्रीस्वामी समर्थांनी बावीस वर्षांच्या वास्तव्यात (इ.स. १८५६ ते १८७८) लोकांचा गेलेला आत्मविश्र्वास परत आणून त्यांच्यामध्ये आध्यात्मिक पात्रता व आत्मविश्र्वास पुन्हा प्रस्थापित केला. त्यांनीविश्र्वसंचलनाचे कार्य तेथूनच सुरू केले.

अक्कलकोट परिसरातील भेट द्यावी अशी इतर ठिकाणे .

) श्रीगुरुमंदिर - बाळप्पा महाराज मठ, अक्कलकोट, ता. अक्कलकोट, जि. सोलापूर
धारवाड जिल्ह्यातील (कर्नाटकराज्य) श्रीमंत सराफ बाळप्पा वयाच्या ३० व्यावर्षी संसाराचा त्याग करून अक्कलकोटला गुरुशोधार्थ गेले. श्रींनीअनुग्रह देऊन आपल्या आत्मलिंग पादुका त्यांना देऊन मठ बांधण्याची आज्ञा केली आणि म्हटले, "माझ्या आत्मलिंग पादुका घेऊन त्यावर एखादा उत्तम मठ स्थापन कर. तेथे फुलझाडे लावून बाग कर व ठरलेले वार्षिक उत्सव करीत जा. म्हणजे चांगले फळ मिळेल." त्यानुसार बाळप्पांनी मठ स्थापन केला. प्रस्तुतमठात समर्थांचा दंड, छाटी, कंठमणी, माळ इत्यादी पवित्र वस्तू ठेवलेल्या आहेत. बाळप्पांनीश्रीसमाधीस्थ झाल्यानंतर भारतभर संचार करून शेवटी अक्कलकोटला स्वामी मठ स्थापन करून श्रींचा कीर्तीध्वज फडकविण्याचा मान मिळविला. त्यांच्यानंतर त्यांचे शिष्य गंगाधर महाराज व गजानन महाराज यांनी ती धुरा वाहून नेली. यामठात गुरुपौर्णिमा, दत्तजयंती,स्वामी जयंती वगैरे उत्सव मोठ्या उत्साहाने पार पाडले जातात.

गुगल पिन

https://maps.google.com/?cid=15155453367401059925

२) वटवृक्ष संस्थान मठ, अक्कलकोट
श्रींनी अक्कलकोटच्या बावीस वर्षांच्या वास्तव्यात बराच काळ जेथे घालवला त्या वटवृक्षाखालीच श्रींचे शिष्य जोतिबा पांडे यांनी स्वतःचे घरदार, जमीनविकून मंदिर बांधले. श्रीसमाधिस्थहोण्यापूर्वी जोतिबाने श्रींना विचारले, "माझे कसे होईल?' श्रीम्हणाले, "तुम्ही वडाच्या पारंब्या धरून बसा. मी सदैव वटवृक्षाखाली आहे. माझे स्मरण करताच तुमच्या सन्निध आहे." श्रींच्या हयातीत जोतिबाने 15 वर्षेव समाधीनंतर 41 वर्षेअनन्यभावे सेवा केली. आजमंदिराच्या समोर सभागृहात श्रींची मूर्ती असून, त्यांचेशिष्य जोतिबा यांची उभी मूर्ती आहे. अशीही गुरुशिष्यांची जोडी आहे. आताया मठाची व्यवस्था श्रीस्वामी समर्थ वटवृक्ष संस्थानामार्फत केली जाते. येणाऱ्याभाविकांस पूजा, नैवेद्य,अभिषेक तसेच राहण्याची, भोजनाचीव्यवस्था, खोल्यादेऊन या संस्थानामार्फत केली जाते. श्रीनेहमी म्हणत, "आमचे नाव नृसिंहभान - दत्तनगरमूळ' त्यातील सर्व गोष्टी येथे परिपूर्ण आहेत. यामठात श्रींच्या जागृत पादुका असून मठात गुरुपौर्णिमा, दत्तजयंती, स्वामी पुण्यतिथी वगैरे उत्सव संपन्न होतात.

गुगल पिन

https://maps.app.goo.gl/ekNVGmoCTMso1f1u6

३) श्रीस्वामी समाधी मठ, बुधवार पेठ, अक्कलकोट
पूर्व जन्मसुकृतामुळे श्रींनी ज्याच्या घरी बरीच वर्षे वास्तव्य केले त्या भक्त चोळप्पाच्या इच्छेप्रमाणे श्रीची समाधी या मठात आहे. चोळप्पाच्याघराजवळ समाधीमंदिर असून, त्यातश्रींनी दिलेल्या पादुका आहेत. अक्कलकोटसंस्थानचे प्रशासक विंचूरकर श्वेतकुष्ठ झाल्यावर दर्शनास आले असता त्यांनी श्रींना हिऱ्याची अंगठी अर्पण केली. तीविकून चोळप्पाने या पैशातून मठ बांधला.

गुगल पिन

https://maps.app.goo.gl/SogqadHWW8bbuc5A9

४) जोशीबुवांचा स्वामी मठ, अक्कलकोट
अक्कलकोटचे प्रशासक चिंतोपंत टोळ हे रोज नियमाने श्रींच्या चरणी सहस्र तुलसीपत्र वाहत असत. यानियमात खंड पडू नये हे अंतर्ज्ञानी श्रींनी जाणून या पाटावर आपली पावले उमटविली. त्यांनीत्या पादुकांवर तुलसीपत्रे वाहून आयुष्यभर सेवा केली. तोचश्रींचा जागृत अस्तित्व असलेला पाट या जोशी मठात होता. सध्यातो "गुरु मंदिरात' असल्याचेकळते.

५) शंकरराव राजेरायन यांचा मठ, अक्कलकोट
हैद्राबाद संस्थानातील गजांतलक्ष्मीचे जहागीरदार शंकरराव राजे रायन यांचा क्षय व ब्रह्मसमंध बाधा श्रींनी बरी केल्यावर त्यांनी श्रींच्या आज्ञेनुसार तीस हजार रुपये खर्चून हा श्रींच्या पादुकांचा हा मठ स्थापन केला. जुन्याराजवाड्याजवळ हा मठ आहे. 
स्वामींच्या वास्तव्याने परमपावन झालेली अक्कलकोटातील आणखीन काही प्रासादिक स्थळे:

६. महाराजांच्या चर्मपादुका
समाधी मठच्या शेजारीच शिष्य चोळप्पा यांच्या घरात आजही महाराजांच्या चर्मपादुका आहेत. सुमारे १ फुट लांबीचे पाउल आहे.

७. हाक्याचा मारुती
स्वामींनी सत् शिष्य बाळाप्पा यांना नामजप करण्यास सांगितले ते हे मंदिर.तळघरत आजही जाता येते.

८. जंगमांचे शिव मंदिर
स्वामींनी शिवलींगावर शेणी रचून अग्नी पेटविला. जंगम चिडले व स्वामींना मारण्यास आले. ३ दिवस अग्नी पेटत होता. ३ दिवसा नंतर शिवलींगाला काहीही हानी न होता, ते अधिच तेजस्वी झाले.

९. मुरलीधर मंदिर

मुंबईहून स्वामी दर्शनास आलेले 'स्वामीसुत' ह्या मंदिरात स्वामींची वाट पहात बसले होते. स्वामींच्या दर्शनास गेलेल्या एका श्रीमंत भक्तास स्वामी म्हणाले ''माझ्या समोर दिवे पेटवण्याऐवजी माझा सुत काळोखात बसला आहे तेथे रोषणई कर.'' गिरगावातील कांदेवाडी येथील मठ स्थापन करणारे तेच हे स्वामीसुत!

१०. शेखनूर दर्गा
 स्वामी कित्येकदा ह्या दर्ग्यावर येत. मन्नत मागण्याकरता आलेल्या कित्येकांना स्वामी सांगत की दर्ग्यावर चदर चढवा. तिथल्या फकीराना भोजन द्या.

गुगल पिन

https://maps.app.goo.gl/TPso7k1nagR8mi3a8

११. मालोजीराजांचा किल्ला
महा दरवाजावर असलेल्या गणपतीच्या मुर्तीस सहज हात लाऊन स्वामी जात असत्. आपला हात उडी मारुन देखील पोचत नाही. येथे एक लहानसे  शस्त्रास्त्रांचे संग्रहालयही आहे.

गुगल पिन

https://maps.app.goo.gl/QAw7PCUTavdNMpNs9

१२. शिवपुरी
सुर्योदय आणि सुर्यास्त ह्या वेळी अग्निहोत्र कसे करावे? अग्निहोत्र म्हणहजे काय? इ. महत्वाची माहिती यएथे सांगतात. सविस्तर माहिती आणि अग्निहोत्रात सहभाग घेण्याकरता शिवपुरी येथे सुर्यास्ताच्या साधारण १ तास आधी पोचावे. 
गुगल पिन


https://maps.app.goo.gl/MiwNoL3M9quD5g4JA

१३. श्रीमहारुद्ररावांची समाधी (श्रीचोळाप्पा महाराजांचे वाड्यातील श्रीमहाराजांच्या समाधी मठासमोर)
मोगलाई प्रांतात जोगाई आंब्यानजीक केज गावचे श्रीमंत महारुद्रराव देशपांडे यांचे निजाम सरकारने जप्त केलेले उत्पन्न श्रींचे कृपेने परत मिळाल्यानंतर तसेच घराच्या उकिरड्यावर द्रव्याने भरलेले हंडे सापडल्यानंतर ते अक्कलकोटला गेले. श्रींपुढे दहा हजार रुपये ठेवल्यानंतर श्री हसले व म्हणाले, "आम्हांस रुपये नको! जा नीघ घरी! घराचे उकिरड्यात नेऊन टाक आणि हा दगड तेथे नेऊन ठेव." पुढे देशपांडे यांनी श्रींच्या आज्ञेनुसार घरासमोर उकिरड्यावर पादुका मठ स्थापन केल्या. श्रीस्वामींच्या लौकिक समाधीलीलेनंतरही श्रीस्वामींनी महारुद्ररावांना वचन दिल्याप्रमाणे त्यांच्या केज येथील घरी जाऊन सगुण दर्शन दिले, ही बाब श्रीस्वामीरायांच्या 'हम गया नहीं, जिंदा है|'' ह्या वचनाची साक्षच देतात! आजही त्यांच्या वंशजांमार्फत मठाची सेवा अखंडित चालू आहे.

कसे जाल ?

अक्कलकोट हे सोलापूर शहरापासून ४० कि . मी . वर आहे . सोलापूर हे रस्ते , रेल्वे ने भारतातील महत्वाच्या शहरांबरोबर जोडले आहे .
अक्कलकोट साठी सोईचे विमानतळ पुणे अथवा मुंबई आहे .

अक्कलकोटची गुगल पिन

https://maps.google.com/?q=Akkalkot%2C+Maharashtra+413216&ftid=0x3bc6099850597ad9:0xb6bd8736c8c38347

अक्कलकोट, जि. सोलापूर
फोन- (०२१८१) २२०३२१, भक्त निवास-२२१९०९.

अक्कलकोट बाबत माहिती देणारा युट्युब

https://youtu.be/AUazV0VxOCc
https://youtu.be/gc6GLFayMh4
https://youtu.be/K88bRLauVHU

विनंती :- आपणास माहिती कशी वाटली प्रतिक्रिया जरुर द्या अन सदर ब्लॉग / फेसबुक पेज आपल्या मित्र परीवारात पण शेअर करा .  
शैलेश चौधरी(Shailesh Choudhari)
( माहिती संकलक / ब्लॉगर / पर्यटण व्यवसायिक )

Blogger and Travel agent
९७६७५ ९१६७५
[Mobile number +919767591675]
WhatsApp number +918888741797
Languages :- Marathi,  Hindi and little bit English.

email address :-
travelbirdindia@yahoo.com
Can Contact between:-
9a.m. to 9 p.m. ( Indian standard time )

Use Google Translate App. or web site to read this artical in your own language . Use Marathi as source language and translate  it in your own language.

पर्यटण एक चळवळ

पर्यटण विषयास वाहिलेला मराठी ब्लॉग
आमच्या फेसबुक पेज ला भेट द्या .

Visit our Facebook page
Travelbirdindia

आम्हाला व्टिटर वर फॉलो करा .

Follow me on Twitter
https://mobile.twitter.com/Shailesh1881975

संदर्भ :- विकीपिडिया , इंटरनेट , गुगल मॅप व यु ट्युब

No comments:

Post a Comment