Friday, February 22, 2019

या उन्हाळ्यात चला जंगलात वाघ पहायला !



या उन्हाळ्यात चला जंगलात वाघ पहायला !


कुठल्याहि जंगलाची समृद्धी हि तेथिल असणाऱ्या वाघांच्या संखेवर ठरवली जाते . जंगलाच्या अन्नसाखळीत वाघ हा शिरोमणी आहे . जितके वाघ जास्त तितके त्यांचे भक्क्ष प्राण्यांची संख्या जास्त असते व त्यामुळे या भक्क्षांना आवश्यक गवत व वृक्षसंपदेच्या बाबत जंगल संमृद्ध असते . साधारणतः आपण पावसाळा संपला की जंगल पर्यटनास जातो . परंतु यासाठी अत्यंत उत्तम कालावधी हा एप्रिल व मे महिना आहे . महाराष्ट्रात या महिन्यात प्रचंड उन्हाळा असतो . अनेक ठिकाणी जलस्त्रोत अटल्यामुळे दुष्काळ सुरू असतो व त्यामुळे पाणी असलेल्या शहरांत गावांतून स्थलांतर वाढते . हिच गोष्ट जंगलाला लागु होते . वाघाचा संचार साधारणतः १५० वर्ग किलोमिटर असतो . त्यामुळे वाघ दिसणे तसे दुर्मिळच . त्यात हिवाळ्यात जंगलात छोटे मोठे जलस्रोत अनेक ठिकाणी असल्याने त्यामुळे प्राणी विखुरलेले असतात व त्याचा परिणाम वाघ पण खुप मोठ्या परीसरात फिरुन शिकार करत असल्याने त्यांना शोधणे कठिण होते . उन्हाळ्यात सर्व छोटे जलस्रोत आटून गेलेले असतात संपुर्ण जंगलातील प्राण्यांना मोठ्या जलस्त्रोतांशिवाय पर्याय नसतो . त्यामुळे अश्या ठिकाणी शिकार व त्यांचे शिकारी वाघ जमा होतात व वाघ दिसण्याची शक्यता वाढते . महाराष्ट्रात एकुण ६ व्याघ्र प्रकल्प आहेत पुढिल काहि लेखांत आपण त्यांची सविस्तर माहिती घेवू .
भारतात १९७३ साली व्याघ्र प्रकल्पाची सुरुवात झाली. त्यावेळी देशात ९ व्याघ्र प्रकल्प होते. आता त्याची संख्या ३८ वर गेली आहे. नॅशनल टायगर कॉन्झरवेशन ॲथॉरिटीमुळे गेल्या दहा वर्षात वाघांची संख्या वाढण्याबरोबरच त्यांची माहिती संकलन करण्यात (डॉक्युमेंटेशन) ही आपला देश पुढे आहे.
स्टेटस् ऑफ टायगर्स इन इंडिया च्या अहवालानुसार देशात २००६ साली सुमारे १४११ च्या आसपास असलेली देशातील वाघांची संख्या २०१० साली १७०६ तर आज २०१४ साली झालेल्या सर्वेक्षणात ती २२२६ इतकी झाली आहे. वाघांची संख्या वाढणे हे एक प्रकारे चांगल्या वनसंवर्धनाचे द्योतक आहे. कारण वाघांची चांगली संख्या असण्यासाठी त्यांचा नैसर्गिक अधिवास उत्तम असणे आवश्यक आहे. म्हणजेच वाघांसाठी चांगले अन्न, निवारा असलेले जंगल असणे आवश्यक आहे. व्याघ्र संख्येमध्ये महाराष्ट्र देशात पाचव्या क्रमांकावर आहे.
केंद्र शासनाच्या याच अहवालानुसार महाराष्ट्रात २००६ साली १०३, २०१० साली १६९ आणि २०१४ साली झालेल्या सर्वेक्षणात सरासरी १९० वाघांचे अस्तित्व आढळून आल्याची नोंद आहे. व्याघ्र रक्षणासाठी महाराष्ट्रात विशेष व्याघ्र दलाची स्थापना करण्यात आली आहे. या दलाकडून व्याघ्र संरक्षणाचे काम अत्यंत जबाबदारीने पार पाडण्यात येत आहे. याशिवाय वनाधिकाऱ्यांना शस्त्र परवाने, व्याघ्र प्रकल्पात वायरलेस सेट देण्यात आले आहेत तर काही ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची व्यवस्था करण्यात येत आहे.
महाराष्ट्रातील सहा व्याघ्र प्रकल्प
१ ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प
२ पेंच व्याघ्र प्रकल्प, नागपूर
३ मेळघाट व्याघ्र प्रकल्प
४ सह्याद्री व्याघ्र प्रकल्प,कोल्हापूर
५ नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प
६ बोर व्याघ्र प्रकल्प

विनंती :- आपणास माहिती कशी वाटली प्रतिक्रिया जरुर द्या अन सदर ब्लॉग / फेसबुक पेज आपल्या मित्र परीवारात पण शेअर करा .   
शैलेश चौधरी(Shailesh Choudhari) 
( माहिती संकलक / ब्लॉगर / पर्यटण व्यवसायिक )
Blogger and Travel agent 
[Mobile number +919767591675]
WhatsApp number +918888741797
Languages :- Marathi,  Hindi and little bit English.
email address :-
Can Contact between:-
9a.m. to 9 p.m. ( Indian standard time )
Use Google Translate App. or web site to read this artical in your own language . Use Marathi as source language and translate  it in your own language.
पर्यटण एक चळवळ
पर्यटण विषयास वाहिलेला मराठी ब्लॉग
आमच्या फेसबुक पेज ला भेट द्या .
Visit our Facebook page 
Travelbirdindia
आम्हाला व्टिटर वर फॉलो करा .
Follow me on Twitter 
संदर्भ :- इंटरनेट , गुगल मॅप व यु ट्युब

No comments:

Post a Comment