Saturday, June 30, 2018

परळी वैद्यनाथ Parli Vaijnath Jyotirling

परळी वैद्यनाथ

नाव:वैद्यनाथ

मंदिर निर्माता:अज्ञात परंतु यादवकाळातील असावे असा अंदाज .

जीर्णोद्धारक:अहिल्याबाई होळकर

निर्माण काल :अति प्राचीन

देवता:शंकर

वास्तुकला:हेमाडपंथी

स्थान :  महाराष्ट्राच्या बीड जिल्ह्यामध्ये

परळी वैजनाथ हे बारा ज्योतिर्लिंग मंदिरांपैकी एक आहे. हे ज्योतिर्लिंग भारतातील बीड जिल्ह्यात असून परळी वैजनाथ हे दक्षिण मध्य रेल्वेवरील एक स्टेशनही आहे. वैजनाथ हे परळी वैद्यनाथ म्हणूनही ओळखले जाते.

परळी येथील वैद्यनाथ मंदिर प्रसिद्ध असून भारतातील १२ ज्योतिर्लिंगांत परळीच्या वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाचे स्थान जागृत समजले जाते. हे मंदिर देवगिरीच्या यादवांच्या काळात त्यांचा प्रधान श्रीकरणाधिप हेमाद्री याने बांधले आहे, असे म्हणतात. पुण्यश्लोक राणी आहिल्याबाई होळकरांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला. हे मंदिर चिरेबंदी असून भव्य स्वरूपाचे आहे. मंदिराच्या परिसरात लांबलचक असलेल्या पायर्‍या व भव्य प्रवेशद्वार ही लक्ष वेधून घेण्यासारखी ठिकाणे आहेत. मंदिराचा गाभारा व सभामंडप हे एकाच पातळीवर असल्यामुळे सभामंडपातून ज्योतिर्लिंगाचे दर्शन होऊ शकते. इतरत्र कोठेही नाही, पण फक्त वैद्यनाथ इथे देवाला स्पर्श करून दर्शन घेता येते. मंदिराच्या परिसरात तीन मोठी कुंडे आहेत. मंदिरापासून जवळच तीन किलोमीटर अंतरावर ब्रह्मनदीच्या किनारी ३०० फूट उंचावरील जिरेवाडी येथे सोमेश्वर मंदिर आहे.

कसे जाल :
परभणीपासून ६० कि.मी. अंतरावर आहे. या ठिकाणांपासून वैजनाथला जाण्यासाठी वाहनाची सतत सोय आहे. जवळच्या अंबेजोगाईपासून परळी वैजनाथ २५ कि. मी. अंतरावर आहे. तर परळी येथे एक औष्णिक विद्युतकेंद्र आहे. येथे औद्योगिक वसाहत आहे.

परळी वैजनाथ मंदिराची गुगल पिन .

https://goo.gl/maps/umncQYgztTy

येथे भेट देण्याची योग्य वेळ :
महाशिवरात्र , श्रावणातील सोमवार . तसे पहाता पुर्ण वर्षभरात कधिहि या क्षेत्रास भेट देता येते .

आणखी एक वैजनाथ

भारताच्या बिहार राज्यातल्या संथाल परगण्यामधील देवगढ गावात आणखी एक वैजनाथ मंदिर आहे. यालाही बैजनाथ किंवा वैद्यनाथ म्हटले जाते. काही लोकांच्या मते हेच खरे ज्योतिर्लिंग आहे, परळी वैजनाथ नव्हे. या बिहार मधिल वैद्यनाथ मंदिर परीसरात ५१ शक्ती पिठांपैकि एक शक्तिपिठ पण आहे . तेथे गेल्यावर वैद्यनाथ मंदिराचा कळस व शक्तिपिठाचा कळस यांना एक लांबलचक हाराने जोडण्याचा एक विधि केला जातो . तसे केल्याने शिव शक्ती चे मिलन घडवून आणल्याचे पुण्य मिळते असे म्हणतात .

महाराष्ट्रातील इतर ज्योतिर्लिंग : -
वेरूळ ( औरंगाबाद ) , भिमाशंकर (पुणे), त्र्यंबकेश्वर ( नासिक ) व औंढ्या नागनाथ  . या पाचहि जोतिर्लिंगाची यात्रा पुणे ते पुणे ४ दिवसांत करता येते .


शैलेश चौधरी
( माहिती संकलक / ब्लॉगर / पर्यटण व्यवसायिक )
९७६७५ ९१६७५

पर्यटण एक चळवळ

पर्यटण विषयास वाहिलेला मराठी ब्लॉग

आमच्या फेसबुक पेज ला भेट द्या .
Travelbirdindia

आम्हाला व्टिटर वर फॉलो करा .
https://mobile.twitter.com/Shailesh1881975


माहितीचा स्त्रोत: - इंटरनेट

Friday, June 29, 2018

औंढा नागनाथ Aundhya Nagnath Jyotirling

औंढा नागनाथ
 हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील हिंगोली जिल्ह्यातील एक गाव व तालुका आहे. आमर्दकपूर (औंढा-नागनाथ, जि. हिंगोली, ) हे ज्योतिर्लिंग क्षेत्र आहे. याचे प्राचीन नाव आमर्दक. ही एक शिवाची उपाधी असून, या नावाचा एक शैवपंथही अस्तित्वात होता. यातूनच या स्थलनामाची उत्पत्ती झाली. 'आमर्दक सन्तान' या नावाने ओळखल्या जाणार्‍या शैव अनुयायांचे हे मुख्य पीठ असून, त्याचा प्रसार सातव्या ते अकराव्या शतकात गुजराथ, राजस्थान आणि मध्य प्रदेश या भागांतही झाला होता.

भारतातील पवित्र बारा ज्योतिर्लिंगापैकी आद्य ज्योतिर्लिंग मानल्या जाणार्‍या नागनाथ (नागेश्वर) मंदिरासाठी औंढा हे गाव प्रसिद्ध आहे. या गावात एकेकाळी आमर्दक सरोवर होते. हे मंदिर एका विस्तीर्ण २९०X१९० फुटी आवारात असून त्याभोवती एक मोठा परकोट आहे. परकोटाला चार प्रवेशद्वारे असून त्यातील उत्तरेकडील प्रवेशद्वारावर नगारखाना आहे. तेच मुख्य प्रवेशद्वार होय. आवारातच एक पायविहीर असून तिचा नागतीर्थ असा उल्लेख केला जातो. सासू-सुनेची बारव असेही तिला म्हणतात. मुख्य मंदिराची लांबी १२६ फूट, रुंदी ११८ फूट आणि उंची ९६ फूट आहे. मंदिराच्या पश्चिमेस नामदेव महाराजांचे मंदिर व सभामंडप आहे. औंढा हे संत नामदेवाचे गुरु विसोबा खेचर यांचेही गाव आहे. त्यांची समाधी या परिसरातच आहे


इतिहास:

पौराणिक कथेनुसार, हे मंदिर युधिष्ठिर (वरिष्ठ पांडव) याने 14 वर्षे निर्वासित (वन यात्रा) दरम्यान बांधले होते.

हे मंदिर महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाचे (विठोबाचे भक्त) सन्मानित आहे. असे म्हणतात की एके दिवशी संतांना नामदेव, विसोबा खेर आणि ज्ञानेश्वर प्रभू यांचे भक्तीगीत गायले होते. मंदिराच्या पुजाऱ्या ना ते न आवडल्याने त्यांने मंदिराच्या मागे या लोकांना भजन किर्तन करायला सांगितले . संतांनीही असेच केले. तथापि, देव, आपल्या भक्तांचे भक्ती आणि गायन इतके सुंदर वाटत होतं की त्यांनी आपले संपूर्ण मंदिर आपल्या शक्तीने ऊलट्या दिशेस वळवले . नंदीचा पुतळा या मंदिराच्या मागे आहे, इतर शिवमंदिरांपेक्षा वेगळा आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, इतर हिंदू मंदिराच्या तुलनेत हे मंदिर पाश्चिम मुखी आहे.

आर्किटेक्चर: - मंदिराची रचना यादव सामंत यांच्या शासनकाळात 13 व्या शतकात झाली. मूलतः ती सात मजली इमारत होती, पण औरंगजेबच्या शासनकाळात मुगल सैन्य अत्याचारांनी बहुतेक मंदिर नष्ट केले.

या मंदिराची वास्तुशिल्प शैली हेमाडपंती आहे. खडकाळ भिंती व छतावर हिंदू देवतांची विविध शिल्पे आहेत. पुर्ननिर्मिती नंतर या देवळाचा कळस व मुख्यद्वार पांढऱ्या रंगात रंगवले आहे .

मुख्य मंदिर परिसरात - महर्षी वेद व्यास, भगवान गणेश, भगवान विष्णू, निळकंथेश्र्वर, पांडव, भगवान दत्तात्रेय आणि दशवत्र यासारख्या इतर देवतांसाठी 12 लहान मंदिरे आहेत. मंदिराच्या प्रवेशद्वारावर शिवा भक्तानी आणि मराठा साम्राज्य अहिल्याबाई होळकर यांचा पुतळा आहे. जवळच शनी मंदिरही आहे. या ठिकाणी दोन जलकुंड पण आहेत.

दिशानिर्देश: -

हवाई मार्गेः जवळचे विमानतळ औरंगाबाद विमानतळ आहे.

रेल्वेने: रेल्वे ने मुंबई, पुणे सारख्या शहरास आहे जोडले आहे.

रस्ते: हे ठिकाण मुंबई, नागपूर आणि औरंगाबाद अशा शहरांपर्यंत चांगल्या रस्त्यांनी जोडलेले आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या बसेस नांदेड, परभणी, चौंडी, हिंगोली पासून सुटतात .

औढा नागनाथ  गुगल पिन .
https://goo.gl/maps/H4vSnLz2bPk

जवळपासची ठिकाणे: -
 हुजर साहिब गुरुद्वारा - नांदेड

तुळजादेवी संस्थान तुळजापुर
महाराष्ट्रातील इतर ज्योतिर्लिंग : -
वेरूळ ( औरंगाबाद ) , भिमाशंकर (पुणे), त्र्यंबकेश्वर ( नासिक ) व परळी वैजनाथ . या पाचहि जोतिर्लिंगाची यात्रा पुणे ते पुणे ४ दिवसांत करता येते .


शैलेश चौधरी
( माहिती संकलक / ब्लॉगर / पर्यटण व्यवसायिक )
९७६७५ ९१६७५

पर्यटण एक चळवळ

पर्यटण विषयास वाहिलेला मराठी ब्लॉग

आमच्या फेसबुक पेज ला भेट द्या .
Travelbirdindia

आम्हाला व्टिटर वर फॉलो करा .
https://mobile.twitter.com/Shailesh1881975


माहितीचा स्त्रोत: - इंटरनेट

Thursday, June 28, 2018

घृष्णेश्वर महादेवाचे मंदिर Grishneshwer Jyotirling

नाव: घृष्णेश्वर

प्रथम बांधले : मालोजी राजे भोसले, शिवाजी महाराजांचे आजोबा,

जिर्णोद्धार: अहिल्याबाई होळकर

देव: शिव

स्थान: महाराष्ट्रातील औरंगाबादजवळील दौलताबाद जवळ .

महाराष्ट्रात, घृष्णेश्वर महादेवाचे मंदिर औरंगाबादजवळील दौलताबादपासून 11 किमी अंतरावर आहे. बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. काही लोक गुस्श्वमेश्वर या नावाचेही नाव देतात. या मंदिराच्या आजूबाजूच्या परिसरातील बौद्ध भिक्षूंनी तयार केलेल्या एलोराच्या प्रसिद्ध लेणी आहेत. देवी अहिल्याबाई होळकर यांनी हे मंदिर बांधले होते. शहरापासून दूर असलेले हे मंदिर साधेपणाने परिपूर्ण आहे. दारुण ज्योतिर्लिंगात हे शेवटचे ज्योतिर्लिंग आहे. याला गुहेश्मेश्वर, घोसरेश्वर किंवा घृष्णेश्वर असेही म्हटले जाते. हे महाराष्ट्र राज्यातील दौलताबादपासून थोड्याच अंतरावर वेरुळगांव जवळ आहे.


कथा

दक्षिण भारतातील देवगिरी पर्वताजवळील एक ब्राम्हण सुकमा तिच्या पती पारायण वाडो सुदेश यांच्याबरोबर राहत होती. दोघेही शिवभक्त होते, परंतु त्यांना मुले नसल्याने त्यांना चिंता होती. पत्नीच्या विनंतीवरून त्यांनी आपल्या पत्नीची बहिण घृष्मा बरोबर लग्न केलं, जी परम शिवचा भक्त होती. शिव यांच्या कृपेने, त्याला मुलगा रत्न प्राप्त झाले. यातून सुदेशने ईश्या करण्यास सुरुवात केली आणि त्याला सवतीचा मुलगा ला मारण्याची संधी मिळाली. तीने मुलास तळ्यात फेकुन  दिले , घृष्मा ने शिवाची आर्त प्रार्थना केली . देव शिवाच्या कृपेने  मुल पुन्हा जिवंत झाले .आणि त्यानंतर घृष्माने  शिवाची प्रार्थना व तेथेच शिवाने नेहमी रहावे असा आशीर्वाद मागितला  आणि तळ्याच्या नावावरून   ते  स्थान घृष्णेश्वर जोर्तीलिंग नावाने ओळखले जात आहेत.

कसे जाल

महाराष्ट्रातील औरंगाबाद शहरा पासुन हे ठिकाण जवळ आहे .औरंगाबाद शहर हे रस्ते , रेल्वे मार्ग व विमान मार्गाने मुंबई / पुण्यास जोडले गेले आहे .

घृष्णेश्वर महादेव मंदिर वेरूळ औरंगाबाद महाराष्ट्र गुगल पिन .

https://goo.gl/maps/ji1iuaGDLo22

योग्य वेळ :- सप्टेंबर ते मार्च .

महाराष्ट्रातील इतर ज्योतिर्लिंग : -
भिमाशंकर (पुणे), त्र्यंबकेश्वर (नासिक) औंढ्या नागनाथ व परळी वैजनाथ . या पाचहि जोतिर्लिंगाची यात्रा पुणे ते पुणे ४ दिवसांत करता येते .


शैलेश चौधरी
( माहिती संकलक / ब्लॉगर / पर्यटण व्यवसायिक )
९७६७५ ९१६७५

पर्यटण एक चळवळ

पर्यटण विषयास वाहिलेला मराठी ब्लॉग

Visit our Facebook page :- Travelbirdindia

Twitter
https://mobile.twitter.com/Shailesh1881975


माहितीचा स्त्रोत: - विकिपीडिया

Wednesday, June 27, 2018

त्र्यंबकेश्वर Trimbakeshwer Jyotirling

त्र्यंबकेश्वर हे नाशिक जवळचे बारा ज्योतिर्लिंगापैकी एक हिंदू तीर्थस्थान आहे. येथे सिंहस्थ कुंभमेळा भरतो. हिंदू धर्मातील वैष्णवांमध्ये दिगंबर अनी, निर्वाणी अनी आणि निर्मोही अनी असे तीन आखाडे सर्वोच्च स्थानी आहेत. याच तीन आखाड्यांच्या नेतृत्वाखाली नाशिकमध्ये दर बारा वर्षांनी सिंहस्थ कुंभमेळा भरतो. शैवांचे आखाडेही त्र्यंबकेश्वरात जमतात. येथे निवृत्तिनाथ महाराज समाधी मंदिर आहे.'

श्री त्र्यंबकेश्वर मंदिर (इतिहास)

दहाव्या शतकातील शिलाहार राजा झंझ याने गोदावरी ते भीमा दरम्यानच्या बारा नद्यांच्या उगमस्थळी एकूण बारा शिवालये बांधली. त्यांतील एक हे शिवालय आहे..

ती शिवालये अशी : गोदावरी नदीच्या उगमाशी त्र्यंबकेश्वर, वाकी नदीच्या उगमाशेजारचे त्रिंगलवाडीतले शिवालय, धारणा नदीच्या उगमाशेजारचे -तऱ्हेळे येथे, बाम नदीच्या उगमाशेजारचे - बेलगावला, कडवा नदीच्या उगमाशेजारचे - टाकेदला, प्रवरा नदीच्या उगमाशेजारी - रतनवाडीतील अमृतेश्वर, मुळाउगमस्थानी असलेल्या - हरिश्चंद्रगडावरील हरिश्चंद्रेश्वर, पुष्पावतीजवळ - खिरेश्वरातील नागेश्वर, कुकडीजवळ्च्या - पूरमधील कुकडेश्वर, मीना नदीच्या उगमाशेजारच्या - पारुंडेतील ब्रह्मनाथ, घोड नदीच्या उगमस्थानी - वचपे गावातील सिद्धेश्वर आणि भीमा नदीजवळचे -भवरगिरी. ही सर्व मंदिरे शिल्प सौंदर्याने नटलेली आहेत, कोरीव कलेने सजलेली आहेत. यातच त्र्यंबकेश्वराच्या मंदिराचा समावेश आहे.डोंगरामधून लहान असा एक रस्ता आहे.

नानासाहेब पेशवे यांनी इ.स. १७५५-१७८६ या कालावधीत हेमांडपंती स्थापत्यशैलीत श्री त्र्यंबकेश्वर मंदिर नव्याने बांधवले. भारत सरकारने या मंदिराला दिनांक ३० एप्रिल, इ.स. १९४१ रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारकम्हणून घोषित केलेले आहे. हे बारा ज्योतिर्लिंग मंदिरांपैकी एक मंदिर आहे. मंदिराच्या चहूबाजूस दगडी तटबंदी आहे. कळसावर पाच सुवर्णकलश असून ध्वजा पंचधातूंची आहे. कलश आणि ध्वजा अण्णासाहेब विंचुरकरांनी अर्पण केली आहे. मंदिराच्या बाजूस असलेल्या कुशावर्त तीर्थाचा जीर्णोद्धार होळकरांचेफडणीस असलेल्या पारनेरकरांनी केला.

गोदावरीतटी, एका ठायी नांदताती, ब्रह्मा, विष्णू, महेश वैकुंठचतुर्दशी, त्रिपुरीपौर्णिमा आणि महाशिवरात्रीस, भक्त लोटती, भावे भजती त्रिनेत्र ज्योतिर्लिंगास त्र्यंबकेश्वर महती जगती वर्णावी किती ॥ १० ॥

ब्रह्मगिरी पर्वताच्या निसर्गरम्य परिसरात वसलेले त्र्यंबकेश्वर हे तीर्थक्षेत्र असल्याने तेथे बाराही महिने भाविकांचा मोठा राबता असतो. श्रावण महिन्यात ही गर्दी अधिकच वाढते. श्रावणी सोमवारांना त्र्यंबकेश्वरी लक्षावधी भाविक हजेरी लावतात. श्रावण महिन्यातील पहिल्या तीन सोमवारी त्र्यंबकेश्वरास भाविकांची गर्दी वाढत जाते.

त्र्यंबकेश्वर मंदिराच्या चारही बाजूंना कोट बांधलेला असून त्याच्या पूर्व बाजूस मुख्य दरवाजा आहे. या दरवाजाला लागूनच गावातला प्रमुख रस्ता आहे. तर दक्षिण बाजूलाही आणखी एक छोटा दरवाजा आहे.

येथील कुशावर्तात स्नान करण्यासाठी भाविक भारतवर्षातून हजेरी लावतात. येथे ब्रह्मगिरी हे महाराष्ट्रातले उंचीने दुसऱ्या क्रमांकाचे स्थळ(?) आहे. निवृत्तीनाथांची यात्राही येथे भरते.

भारतात फक्त त्र्यंबकेश्वर या ठिकाणीच नारायण नागबली, त्रिपिंडी, कालसर्प शांती, विष्णुबली, उत्तरक्रिया, लघुरुद्र, जननशांती, सिंहस्थसिन्हास्त विधी, हे धार्मिक विधी केले जातात .

गावात अनेक प्राचीन देवळे आहेत. त्यावरील कोरीवकाम पाहण्याजोगे आहे. गावामध्ये राहण्याची उत्तम व्यवस्था आहे. नाशिकहून दर तासाला बसगाड्यांची सोय आहे. येथून ठाणे जिल्ह्यातील जव्हार येथे जाणारा नयनरम्य असा घाट रस्ता आहे.


त्र्यंबकेश्वर ला कसे जायचे .

त्र्यंबकेश्वर हे शहर भारत देशाच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यात नाशिक पासून १८ कि.मी. अंतरावर असलेल्या ब्रह्मगिरी पर्वताच्या पायथ्याशी आहे. मुंबई पासून १६५ कि.मी.अंतरावर असून जाण्यसाठी कसारा घाटातून इगतपूरी मार्गे तसेच भिवंडी - [[वाडा] मार्गे खोडाळ्यावरूनजाता येते. हे शहर समुद्रसपाटीपासून ३००० फूट उंचीवर आहे.

त्र्यंबकेश्वर नासिक येथिल गुगल पिन

https://goo.gl/maps/be5Et5qTRiN2

महाराष्ट्रातील इतर ज्योतिर्लिंग : -
वेरूळ ( औरंगाबाद ) , भिमाशंकर (पुणे), औंढ्या नागनाथ व परळी वैजनाथ . या पाचहि जोतिर्लिंगाची यात्रा पुणे ते पुणे ४ दिवसांत करता येते .


शैलेश चौधरी
( माहिती संकलक / ब्लॉगर / पर्यटण व्यवसायिक )
९७६७५ ९१६७५

पर्यटण एक चळवळ

Visit our Facebook page :- Travelbirdindia

Twitter
https://mobile.twitter.com/Shailesh1881975


माहितीचा स्त्रोत: - विकिपीडिया

Tuesday, June 26, 2018

भीमाशंकर ज्योतिर्लिंग (शिव मंदिर) Bhimashankar Jyotirling

नाव: भीमाशंकर शिव मंदिर

बांधकाम काल: अतिशय प्राचीन

देव: शिव

वास्तुतकला: हेमाडपंथी शैली

स्थान: भीमाशंकर, पुणे जवळ, महाराष्ट्र

भीमाशंकर मंदिर भोरगिरी गावात खेडपासून सुमारे 50 किमी अंतरावर आहे. उत्तर-पश्चिम पुणे पासून 110 किमी दूर स्थित. हे पश्चिम घाट च्या सह्याद्री पर्वत वर स्थित आहे. भीम नदी येथूनही वाहते. हे नैऋत्येकडे वाहत जाऊन रायचूर जिल्ह्यात कृष्णा नदीत सामील होते. येथे भगवान शिवचे ज्योतिर्लिंग प्रसिद्ध आहे.

भीमाशंकर मंदिरचा इतिहास

भीमाशंकर ज्योतिर्लिंग हे शिव पुराणात आढळते. शिव पुराण सांगतात की प्राचीन काळी कुंभकर्णचा मुलगा भीम नावाचा एक राक्षस होता. त्यांचा जन्म झाल्यानंतर त्यांचा जन्म झाला. भगवान राम यांच्या मृत्यूच्या घटनेची त्यांना कल्पना नव्हती. नंतर, आपल्या आईकडून या घटनेची माहिती मिळाल्यानंतर ते श्रीरामाचा वध करण्याच्या प्रयत्नात होते. आपला उद्देश पूर्ण करण्यासाठी त्यांनी बर्याच वर्षांपासून तपस्या केली आहे ज्यायोगे त्यांना ब्रह्माजींनी विजयची देणगी दिली. वरदान मिळाल्यानंतर, राक्षसाला वारंवार निर्दोष बनले. मानवांसोबतदेखील देवता आणि देवी भीतीमुळे भयभीत झाले. हळूहळू त्याच्या सर्व गोष्टींची चर्चित चर्चा सुरू झाली. युद्धात त्याने देवांनाही पराभूत करणे सुरू केले. त्याने सर्व प्रकारची उपासना बंद केली. अतिशय त्रासदायक झाल्यानंतर, सर्व देव शंकराचे आश्रयस्थानापर्यंत गेले. भगवान शिव सर्वांनाच आश्वासन देतात की त्यांना उपाय मिळेल. भगवान शिव एक राक्षस हुकूमशहा भीमशी लढा देण्याचा निर्धार करतात. लढाईत भगवान शिव यांनी दुष्ट राक्षस धुतले आणि अशा प्रकारे अत्याचारांची कथा संपली. भगवान शिव यांच्या सर्व दैवतांची प्रार्थना आहे की ते या ठिकाणी शिवलिंग पक्षात कुमारीच राहतील. त्याची प्रार्थना भगवान शिव यांनी स्वीकारली आणि तो अजूनही येथे भीमाशंकर ज्योतिर्लिंगच्या रूपात आहे.

भीमाशंकरला भेट देण्याची वेळ

इथे येणा-या यात्रेकरूंना किमान तीन दिवस थांबतात. यात्रेकरूंना थांबविण्यासाठी सर्व व्यवस्था करण्यात आली आहे. भीमाशंकर पासून शिनोली आणि घोरगांव पर्यंत एक लहान अंतर आहे, जिथे आपण सर्व प्रकारच्या सुविधा मिळवू शकाल. जर आपण भीमाशंकर मंदिरास जावे लागते तर ऑगस्ट आणि फेब्रुवारी महिन्यांदरम्यान जाते. आपण उन्हाळी हंगाम वगळता येथे कधीही येऊ शकता. तथापि, ज्यांना ट्रॅकिंग आवडते त्यांना सल्ला दिला जातो की पावसाळ्यात टाळवा . परंतू जे भाविक अथवा पर्यटक आहेत त्यांना पावसाळा अन हिवाळा हे ऋतु येथे भेट देण्यास ऊत्तम . पावसाळ्यात मार्ग वरील डोंगरांतून अनेक छोटे छोटे धबधबे वाहताना पाहता येतात . मात्र या वेळी चुकुन हि परीसरातील जंगलात जावू नये . कारण या जंगलात अनेक बिबटयांचं वास्तव्य आहे . त्यामुळे रस्ता सोडून आजूबाजूस जावू नये .

कसे पोहोचाल

आपण येथे जवळचे शहर पुणे येथे रस्ते ,रेल्वे अथवा विमानाने जाता येते . तेथून महाराष्ट्र राज्य मार्ग परीवाहन मंडळाच्या बसेस पहाटे   5 वाजल्या पासून ते दुपारी 4 वाजे पर्यत  सुटतात . आपण सहजपणे भीमाशंकर मंदिर पोहोचू शकता . प्रत्येक महिन्यात महाशिवरात्री किंवा शिवरात्री येण्यासाठी विशेष बसची व्यवस्था करण्यात आली आहे.
पुण्यातून भिमाशंकरला जायला भाड्याने कार / बस मिळतात . पहाटे लवकर निघाल्यास पावसाच्या दिवसात भिमाशंकर तसेच माळशेज घाटातील धबधब्यांचा आनंद घेत सहल एका दिवसात करता येते . परंतू पहाटे लवकर प्रवास सूरू करणे आवश्यक .

भिमाशंकर मंदिराची गुगल पिन ज्याच्या मदतीने जगातील कुठल्या हि ठिकाणाहुन तुम्हाला भिमाशंकर ला यायचा मार्गाचे मार्गदर्शन मिळेल .

https://goo.gl/maps/ix43MK91gfJ2

महाराष्ट्रातील इतर ज्योतिर्लिंग : -
वेरूळ ( औरंगाबाद ) , त्रंबकेश्वर ( नासिक ), औंढ्या नागनाथ व परळी वैजनाथ . या पाचहि जोतिर्लिंगाची यात्रा पुणे ते पुणे ४ दिवसांत करता येते .


शैलेश चौधरी
( माहिती संकलक / ब्लॉगर / पर्यटण व्यवसायिक )
९७६७५ ९१६७५

पर्यटण एक चळवळ


Visit our Facebook page :- Travelbirdindia

Twitter
https://mobile.twitter.com/Shailesh1881975


माहितीचा स्त्रोत: - इंटरनेट व इतर साहित्य .

Monday, June 25, 2018

माळशेज घाट ( Malshej Ghat)

माळशेज घाट

या घाटाचा घाटमाथ्यावरील भाग पुणे जिल्ह्यात तर घाटातील मुख्य भाग हा ठाणे जिल्ह्यात येतो.पुरातन काळापासून प्रसिद्ध असलेला महाराष्ट्रातील एक घाट. हा राष्ट्रीय महामार्ग २२२ वरील घाट आहे.

माळशेज घाट

आकाशाला भिडलेल्या उत्तुंग कड्यांवर कोसळणारा मुसळधार पाऊस आणि शुभ्र खळखळत फेसाळत येणारे धबधबे, हिरव्या गालिच्यांवर हळुवार सरकणाऱ्या दाट ढगांची गर्दी, त्यातून वळणे घेत मधेच बोगद्यात जाणारा रस्ता हे अनुभवायचे असेल तर नगर - कल्याण रस्त्यावरच्या माळशेज घाटात जायलाच हवे. जिथे घाट रस्ता सुरू होतो तिथे दरीत घुसलेल्या एका पठारावर पर्यटकांच्या सोयीसाठी एमटीडीसीचे रिझॉर्ट आहे. जवळच खुबी गावाजवळ पिंपळगांव धरणाचा सुंदर जलाशय आहे.


इथली खासियत म्हणजे ’रोहित पक्षी’. फ्लेमिंगो म्हणून ओळखले जाणारे हे परदेशी पाहुणे दरवर्षी या जलाशयात येतात. माळशेज हा मुख्य घाट रस्ता असल्याने एसटी च्या बऱ्याच गाड्या पुण्या-मुंबईहून ये-जा करत असतात. स्वतःच्या वाहनाने गेल्यास पुण्याहून एक दिवसाची पावसाळी सहल सहज घडेल.

माळशेज घाटातल्या रेस्ट हाऊसच्या मागे हरिश्‍चंद्र गडाची उत्तुंग डोंगररांग पसरलेली आहे. समोरच्या दरीच्या तळात घनदाट जंगलामुळे इथे ससा, घोरपड, मुंगूस, बिबळ्या अशा वन्य प्राण्यांचा वावर असतो. सैबेरियातून येणाऱ्या फ्लेमिंगो पक्ष्यांचे थवे घाटाच्या अलीकडे डोंगरवाडीजवळच्या शेतांमध्ये साचलेल्या पाण्यात भक्ष्य टिपायला जुलै ते सप्टेंबर महिन्यात येतात.

पावसाळ्यात माळशेज घाटाकडे जाताना दूर डावीकडे डोंगरात खूप उंचावरून कोसळणारा धबधबा आपल्याला दिसतो. तीन धारांमध्ये कोसळणारा हा धबधबा पहाण्यासाठी फक्त पावसाळ्यातच जावे लागेल.

कसे जाल?

पुण्याहून नारायणगाव मार्गे माळशेज घाटात जाता येते, किंवा मुंबईहून-कल्याण-मुरबाड मार्गे जाता येते. शहापुर वरून किन्हवली सरळगाव मार्गे माळशेज घाट ला जाता येते

पक्षी निरीक्षण

येथील पिंपळगाव जोगा धरणामध्ये स्थलांतरित पक्षी येतात.

राहण्याची सोय

कल्याण माळशेज रस्त्यावर घाटाच्या पायथ्याशी सावर्णे गावात रस्ता संपतो येथे हॉलिडे रिझॉर्ट झाले आहे. हॉटेलवर गाडी उभी करून पुढे थिदबी गावापर्यंत ३ कि.मी. कच्च्या रस्त्याने चालत जावे लागेल. स्थानिक वाटाड्या बरोबर असेल तर धबधब्यापर्यंत आपल्याला जाता येते .

माळशेज घाट ची गुगल पिन

Malshej Ghat Photography Point
Pune, Maharashtra 421401
https://maps.app.goo.gl/8F3FDaq1HvfDq5248

माळशेज घाट दाखवणारा युट्युब

https://youtu.be/S7WIa--d9Nc








माहिती संकलक / ब्लॉगर
शैलेश चौधरी
९७६७५ ९१६७५

पर्यटण एक चळवळ

पर्यटण विषयास वाहिलेला मराठी ब्लॉग



Visit our Facebook page :- Travelbirdindia

माहितीचा स्त्रोत: - विकिपीडिया



Sunday, June 24, 2018

महाबळेश्वर मार्गे गुहागर सहल (Mahabaleshwar and Konkan )

दिवस पहिला : पहाटे पुणे सोडूून . महाबळेश्र्वर कडे प्रयाण स्थानिक स्थलदर्शन मुक्काम महाबळेश्वर

दिवस दुसरा : महाबळेश्वर सोड पोलादपूर खेड मार्ग गुहागर येथे प्रयाण स्थानिक स्थलदर्शत मुक्काम .गुहागर .

पुढिल ४ दिवसांचा कार्यक्रम

गुहागर मध्ये ५/६ दिवस राहून पहाण्यासारखी नयनरम्य पर्यटनस्थळं व सागरकिनाऱ्यांची माहिती .

(पहिला तिसरा)>गुहागर येथील सर्वात मोठा "अरबीमहासागराचा"स्वच्छ व शांत बीच ,नयनरम्य सूर्यास्त,अष्टवणे डोंगरातील गणपती,बागबीच,श्री.दुर्गादेवी-व्याडेश्वर प्रसिद्ध प्राचीन मंदिर,उफराटा गणपती

(चौधा दिवस)> गुहागर>5 km.वर मोडका आगर येथे ऊजवी कडे वळूण पालशेत>अडुर बुधलची देवी व बीच >वेळणेश्वर शंकर मंदीर व आकर्षक समुद्रकिनारा >हेदवी येथील दशभुजा श्री.लक्ष्मी गणेश मंदिर>बामणघळ(समुद्राच्या पाण्याचे जोरदार धडकणे कारंजे) दुपारी गुहागरला विश्रांती नंतर दुपारी 3 ते 5 अंजनवेल 15 km.निसर्गरम्य गोपाळगड लाईट हाऊस संध्याकाळी गुहागर बीच

(पाचवा दिवस)> गुहागर ते आडिवरे महाकाली मंदिर पर्यंत अंदाजे 130 km)km.मोडकाआगर परत गुहागर

(सहावा  दिवस) > गुहागरहून  16 km. धोपवे जेटीतून कारसह दाभोळबंदर येथून > 5 km. वर ऊजवी कडे वळून चण्डिकामंदिर(गुहेमध्ये) > पंच नदी > कोळथरे बीच व कोळेश्वर मंदिर > बुरोंडी भगवान परशुरामा चा भव्य पुतळा > लाडघर तामसतीर्थ बीच व सुप्रसिद्ध एकमुखी दत्तमंदिर > दापोली येथे कोकण कृषी विद्यापीठ >करदे बीच > मुरुड बीच >आसूदचा डोंगरावरील केशवराज > हर्णे बीच व दीपगृह कनकदुर्ग किल्ला ,सुवर्णदुर्ग किल्ला,> आंजर्ले कड्यावरचा गणपती परत दाभोळमार्गे > गुहागर

( दिवस सातवा ) गुहागरहून चिपळूण अगोदर गोवळकोटची श्री.करंजेश्वरी देवी > श्री.परशुराम मंदिर > चिपळुणची विंध्यवासींनी देवी > डेरवण शिवसृष्टी(मुलांसाठी खास) > संगमेश्वरपासून 37 km.मार्लेश्वर मंदिर(509 पायऱ्या फ्लोटिंग आहेत) डोंगरावरील निसर्गरम्य ठिकाण परत हायवेने सावर्डे येथे बँक ऑफ इंडियासमोर डावी कडे वळण घेऊन गणेशखिंडमार्गे गुहागर

(दिवस  आठवा ): गुहागर सोड गणपतीपुळे करुन कोल्हापूर देवी दर्शन करून पुणे पोहच .

ब्लॉगर
शैलेश चौधरी
९७६७५ ९१६७५

पर्यटण एक चळवळ

पर्यटण विषयास वाहिलेला मराठी ब्लॉग
https://www.blogger.com/blogger.g?blogID=844112665234788640#allposts

Visit our Facebook page :- Travelbirdindia

लेखासाठी सौजन्य : - श्री गोखले , मु. गुहागर

Saturday, June 23, 2018

प्रस्तावना

पुर्वी हिंन्दूस्थानी माणूस देशाटण करायचा नाही . कारण काय तर धार्मिक गोष्टींचा पगडा , त्या वेळी संसाधनांची कमतरता . आणि चोर व हिंस्त्र पशु चे भय . पण आता या सर्व बाबी मागे पडल्यात . पुर्वी काशी यात्रेस जाताना आपण परत येणार नाही हाच विचाराने जाणारे सातासमुद्रापलिकडे फिरायला लागले . इतकेच काय तर राकेश शर्मा भारतीयाने ,सुनिता विल्यम अन कल्पना चावला या भारतिय वंशाच्या अंतराळविरांनी आकाशाला गवसणी घातली .

सध्या पर्यटण हा भारतातील च काय जगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या व्यवसायापैकी एक आहे . पण त्यामुळे जसे पर्यटण व्यवसायास फायदे झाले त्याच्या पेक्षा तोटेच जास्त झाले . आजचे पर्यटण म्हणजे कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त ठिकाणांना भेट देणे . अगदी युरोप अमेरिका च्या सहलींचा हिशोब टुर कंपन्या इतके दिवस तितके देश वैगेरे करतात . यात खर्चाचा विचारच जास्त असतो आपण तो देश अथवा ठिकाण पहातो पण अनुभवतो किती हा प्रश्नच आहे . कारण इंग्रजीत एक म्हण आहे " एखाद्याला पुर्ण लंडन पहायला पुर्ण आयुष्य पुरत नाही .

त्याबाबतीत मात्र मी दुबई अथवा सिंगापुर ला १०० मार्क देइन कारण हि शहरे तशी छोटीशीच पण त्यांच्या सहली ४/५ दिवसांच्या असतात त्यात तुम्हाला त्या शहरांच्या ठिकाणांना निट पहाता येते . तेथिल लाईफस्टाईल अनुभवता येते . देश अन दिवस यांच्या गुणोत्तरात हे थोडे महाग वाटते पण पर्यटणाचा मुळ ऊद्देश त्यातुन साध्य होतो .

भारतात पण प्रत्येक राज्याच्या दिवस अन ठिकाणे यांचे गुणोत्तर मांडणारे अनेक पर्याय ऊपलब्ध आहेत . ते पर्याय निवडणाऱ्यांना मी पर्यट्क न म्हणता प्रवासी म्हणणे पसंत करेल .

एक दोन ठिकाणी च ४/५ दिवस राहुन त्या ठिकाणच्या सर्व गोष्टीं जसे स्थळे , पदार्थ अन जिवनपद्धतीचा पुरेपुर अनुभव घेता येईल अशी पर्यटण स्थळांची माहिती आपण येत्या काहि दिवसांत घेऊ .


शैलेश चौधरी
९७६७५ ९१६७५